एक्स्प्लोर

Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर अनधिकृतपणे पार्क केलेली वाहने ठरतायत अपघातास कारणीभूत; पाच महिन्यात 13 जणांचा बळी  

जानेवारी ते 31 मे दरम्यान समृद्धी महामार्गावर पार्किंग केलेल्या वाहनाला धडकून झालेल्या अपघातात आतापर्यंत 13 जणांचा बळी गेला आहे . मात्र तरीही महामार्ग पोलीस आणि परिवहन विभाग याकडे दुर्लक्ष करत आहेत.

Samriddhi Highway Accident : महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग  (Samriddhi Highway) एरव्ही कायम चर्चेत राहतो तो यावर होणाऱ्या अपघातांमुळे (Samriddhi Highway Accident). त्यामागील कारण म्हणजे समृद्धी महामार्ग तयार झाल्यापासून सातत्याने त्यावर होणारे अपघात यामुळे हा महामार्ग चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र त्यामागील अनेक कारण तपासाअंती पुढे आले असून बेशिस्त आणि नियमांचे उल्लंघन केल्याने सर्वाधिक अपघात (Accident) झाल्याचे समोर आले आहे. उपराजधानी नागपूर ते मुंबईला जोडण्यासाठी सुमारे 55 हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त खर्च करून नागपूर- मुंबई असा 701 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला आहे. या महामार्गावरून वाहतूकही सुरू झाली आहे. मात्र महामार्गाचे नियम पाळले जात नसल्याने हकनाक नागरिकांचे बळी जाताना दिसत आहे. 

अनधिकृतपणे पार्क केलेली वाहने ठरताय अपघाताच कारण

समृद्धी महामार्गावर कुठल्याही वाहनाला थांबण्यास अथवा पार्किंग करण्यास बंदी असतानाही मेहकर जवळील पेट्रोल पंपाजवळ अनधिकृतपणे उभारण्यात आलेले फूड स्टॉल आणि  त्यामुळे थांबणारी अवजड वाहने, ट्रक्स, कार या समृद्धी महामार्गावरच पार्किंग केल्या जात आहेत आणि त्यामुळे सुसाट वेगाने जाणारी वाहन या पार्किंग केलेल्या वाहनांवर धडकत आहेत. परिणामी त्यामुळेही  अपघात होत आहेत.

 पाच महिन्यात 13 जणांचा बळी  

जानेवारी ते 31 मे दरम्यान समृद्धी महामार्गावर पार्किंग केलेल्या वाहनाला धडकून झालेल्या अपघातात आतापर्यंत 13 जणांचा बळी गेला आहे . मात्र तरीही महामार्ग पोलीस आणि परिवहन विभाग या बाबीकडे दुर्लक्ष करत आहेत. समृद्धी महामार्गावर चार लेन्स असून त्यातील सर्वात शेवटची ही इमर्जन्सी लेन असते. मात्र, या इमर्जन्सी लेनवरच ट्रक  आणि अवजड वाहने पार्किंग केल्यामुळे अपघात घडल्यास रुग्णवाहिका आणि अग्निशमनच्या वाहनाला जाण्यास अडथळा निर्माण होतो. शिवाय अनधिकृतपणे पार्किंग केलेल्या या वाहनांवर कार किंवा छोटी वाहने धडकून अनेक अपघात झाले.

मात्र अद्यापही परिवहन विभागाला याबाबत सोयर सुतक नाही. संभाव्य धोका लक्षात घेता या कृतीची दखल घेऊन वेळीच नियम अधिक कडक करण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. आता या गंभीर विषयी प्रशासन नेमकं काय कारवाई करतं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget