एक्स्प्लोर

Sambhajiraje Chhatrapati : ...अन्यथा अध्यादेश काढून दिलेले आरक्षण ही मराठ्यांची फसवणूक ठरेल; संभाजीराजे छत्रपती

सरकार मागासवर्गीय आयोग पुनर्गठीत करणार का ? त्या आयोगामार्फत मराठा समाज मागास ठरणार का?  आणि मग त्यानंतर कशा पद्धतीने आरक्षण देणार आहात, असे प्रश्न संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित केला आहे.

पुणे : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पुन्हा मागासवर्गीय आयोग गठीत करावा, त्याने मराठा समाजाला मागास ठरवावे आणि मग आरक्षणाची रचना ठरवावी. तरच मराठा आरक्षण टिकेल, अन्यथा अध्यादेश काढून दिलेले आरक्षण ही फसवणूक ठरेल, असं स्पष्ट मत संभाजीराजे छत्रपती  (Sambhaji Raje)  यांनी व्यक्त केलं आहे. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. 

जरांगे पाटील अनेक वर्षांपासून लढत आहेत. आधी त्यांची मागणी मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणात द्यावीत, आता ते म्हणतायत की संपूर्ण राज्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे द्यावीत.  पण असे दिलेले आरक्षण टिकेल का ? असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला आहे.

'उच्च न्यायालयाने दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने का रद्द केले'

संभाजीराजे छत्रपती पुढे म्हणाले की, सरकारने मराठा समाजाला सरसकट कुणबी सर्टिफिकेट देऊन दिलेले आरक्षण कोर्टात टिकणार असेल तरच द्यावे, अन्यथा ती समाजाची फसवणूक ठरेल. उच्च न्यायालयाने दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने का रद्द केले हे ध्यानात घ्यायला हवे. कारण सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण नाकारताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की तुम्ही पुढारलेले आहात,  मागासवर्गीय नाहीत.  मग आता कसे आरक्षण देणार हे आधी स्पष्ट करावे लागेल. 

आरक्षण देण्यासाठी मराठा समाजाचे सर्वेक्षण करुन, त्यासाठी आयोग गठीत करुन मराठा समाजाला मागास ठरवावे लागेल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सर्वोच्च न्यायालयात वकील बदलण्यात आले. मी याबाबत विचारले तर मला ऑफ रेकॉर्ड सांगण्यात आले की आधीचे महागडे वकील परवडत नाहीत. त्यामुळे आयोग गठीत करणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. 

न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने दिलेला अहवाल महत्वाचा आणि उत्तम आहे.  मला सरकारला प्रश्न आहे की तुम्ही मागासवर्गीय आयोग पुनर्गठीत करणार का ? त्या आयोगामार्फत मराठा समाज मागास ठरणार का?  आणि मग त्यानंतर कशा पद्धतीने आरक्षण देणार आहात, असे प्रश्नदेखील त्यांनी विचारले आहेत. 

 'सरकार लोकांच्या भावनांशी खेळत आहे'

मागील दीड- दोन वर्षांत केंद्र आणि राज्य सरकारला अनेकदा पत्रव्यवहार करुन याबाबत विचारणा केली. मात्र उत्तर देण्यात आले आहे. राज्य सरकारच्या मराठा आरक्षण समन्वय समितीने आतापर्यंत काय केले?, हे सांगावे. सरकार लोकांच्या भावनांशी खेळत आहे, अशी त्यांनी टीका केली आहे.

गेले दीड वर्ष फडणवीस गप्प का?

संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, मराठा समाजाला अध्यादेश काढून दिलेले आरक्षण टिकणार नाही. सरकारमधे अनेक जाणकार लोक आहेत. त्यांनी याची दखल घ्यावी. अन्यथा ही पुन्हा मराठा समाजाची फसवणूक ठरेल. शाहू महाराजांनी जी भूमिका घेतली ती महत्वाची की संपुर्ण बहुजन समाजाला मदत झाली पाहिजे. माझ्यापेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा आरक्षण बाबत दोन टक्के अधिक माहिती आहे.  मग गेले दीड वर्ष तुम्ही गप्प का? बसलात असा माझा त्यांना प्रश्न आहे.

हे ही वाचा :

Helavi Samaj History : गावागावांतील 700-800 वर्षांची वंशावळ नोंद ठेवणारा हेळवी समाज नेमका कोण? काय आहे त्यांचा इतिहास

 
 
 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
Rohit Arya : मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
Rohit Arya : मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Unveiling Ceremony : एकनाथ Shinde म्हणाले 'ठाण्यातील Vitthal मूर्ती भक्तांसाठी प्रेरणा'
Pigeon Feeding Row: मुंबईत कबूतरांना दाणे टाकण्यावर निर्बंध, फक्त ४ ठिकाणी सकाळी ७ ते ९ परवानगी
Sanjay Raut Health: 'प्रकृतीत गंभीर बिघाड', खासदार Sanjay Raut दोन महिने राजकारणापासून दूर
Maha Local Body Polls: 'पुढील आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता'- Ajit Pawar
EVM Protest: 'परवानगीशिवाय मोर्चा काढल्यास कारवाई', चंद्रशेखर बावनकुळेंचा MVA-MNS ला थेट इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
Rohit Arya : मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
Rohit Arya : मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
अकोल्यात शिंदेंना दे धक्का; शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, हर्षवर्धन सपकाळांकडून स्वागत
अकोल्यात शिंदेंना दे धक्का; शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, हर्षवर्धन सपकाळांकडून स्वागत
मोठी बातमी! महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक; अवैध शस्त्र तस्करीप्रकरणात कारवाई
मोठी बातमी! महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक; अवैध शस्त्र तस्करीप्रकरणात कारवाई
ड्रायव्हरच निघाला सूत्रधार; व्यापाऱ्याच्या 25 लाख रुपयांच्या लुटीचा 48 तासात उलगडा, पोलिसांनी अशी फत्ते केली मोहिम
ड्रायव्हरच निघाला सूत्रधार; व्यापाऱ्याच्या 25 लाख रुपयांच्या लुटीचा 48 तासात उलगडा, पोलिसांनी अशी फत्ते केली मोहिम
ICC Women's World Cup Final: 'जर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर आम्ही...', मेगा फायनलला काही तास बाकी असतानाच बीसीसीआयची मोठी घोषणा! चाहते सुद्धा नक्की खूश होतील
'जर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर आम्ही...', मेगा फायनलला काही तास बाकी असतानाच बीसीसीआयची मोठी घोषणा! चाहते सुद्धा नक्की खूश होतील
Embed widget