एक्स्प्लोर

Sambhajiraje Chhatrapati : ...अन्यथा अध्यादेश काढून दिलेले आरक्षण ही मराठ्यांची फसवणूक ठरेल; संभाजीराजे छत्रपती

सरकार मागासवर्गीय आयोग पुनर्गठीत करणार का ? त्या आयोगामार्फत मराठा समाज मागास ठरणार का?  आणि मग त्यानंतर कशा पद्धतीने आरक्षण देणार आहात, असे प्रश्न संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित केला आहे.

पुणे : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पुन्हा मागासवर्गीय आयोग गठीत करावा, त्याने मराठा समाजाला मागास ठरवावे आणि मग आरक्षणाची रचना ठरवावी. तरच मराठा आरक्षण टिकेल, अन्यथा अध्यादेश काढून दिलेले आरक्षण ही फसवणूक ठरेल, असं स्पष्ट मत संभाजीराजे छत्रपती  (Sambhaji Raje)  यांनी व्यक्त केलं आहे. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. 

जरांगे पाटील अनेक वर्षांपासून लढत आहेत. आधी त्यांची मागणी मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणात द्यावीत, आता ते म्हणतायत की संपूर्ण राज्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे द्यावीत.  पण असे दिलेले आरक्षण टिकेल का ? असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला आहे.

'उच्च न्यायालयाने दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने का रद्द केले'

संभाजीराजे छत्रपती पुढे म्हणाले की, सरकारने मराठा समाजाला सरसकट कुणबी सर्टिफिकेट देऊन दिलेले आरक्षण कोर्टात टिकणार असेल तरच द्यावे, अन्यथा ती समाजाची फसवणूक ठरेल. उच्च न्यायालयाने दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने का रद्द केले हे ध्यानात घ्यायला हवे. कारण सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण नाकारताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की तुम्ही पुढारलेले आहात,  मागासवर्गीय नाहीत.  मग आता कसे आरक्षण देणार हे आधी स्पष्ट करावे लागेल. 

आरक्षण देण्यासाठी मराठा समाजाचे सर्वेक्षण करुन, त्यासाठी आयोग गठीत करुन मराठा समाजाला मागास ठरवावे लागेल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सर्वोच्च न्यायालयात वकील बदलण्यात आले. मी याबाबत विचारले तर मला ऑफ रेकॉर्ड सांगण्यात आले की आधीचे महागडे वकील परवडत नाहीत. त्यामुळे आयोग गठीत करणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. 

न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने दिलेला अहवाल महत्वाचा आणि उत्तम आहे.  मला सरकारला प्रश्न आहे की तुम्ही मागासवर्गीय आयोग पुनर्गठीत करणार का ? त्या आयोगामार्फत मराठा समाज मागास ठरणार का?  आणि मग त्यानंतर कशा पद्धतीने आरक्षण देणार आहात, असे प्रश्नदेखील त्यांनी विचारले आहेत. 

 'सरकार लोकांच्या भावनांशी खेळत आहे'

मागील दीड- दोन वर्षांत केंद्र आणि राज्य सरकारला अनेकदा पत्रव्यवहार करुन याबाबत विचारणा केली. मात्र उत्तर देण्यात आले आहे. राज्य सरकारच्या मराठा आरक्षण समन्वय समितीने आतापर्यंत काय केले?, हे सांगावे. सरकार लोकांच्या भावनांशी खेळत आहे, अशी त्यांनी टीका केली आहे.

गेले दीड वर्ष फडणवीस गप्प का?

संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, मराठा समाजाला अध्यादेश काढून दिलेले आरक्षण टिकणार नाही. सरकारमधे अनेक जाणकार लोक आहेत. त्यांनी याची दखल घ्यावी. अन्यथा ही पुन्हा मराठा समाजाची फसवणूक ठरेल. शाहू महाराजांनी जी भूमिका घेतली ती महत्वाची की संपुर्ण बहुजन समाजाला मदत झाली पाहिजे. माझ्यापेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा आरक्षण बाबत दोन टक्के अधिक माहिती आहे.  मग गेले दीड वर्ष तुम्ही गप्प का? बसलात असा माझा त्यांना प्रश्न आहे.

हे ही वाचा :

Helavi Samaj History : गावागावांतील 700-800 वर्षांची वंशावळ नोंद ठेवणारा हेळवी समाज नेमका कोण? काय आहे त्यांचा इतिहास

 
 
 

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe: आषाढी यात्रेवरही तुकाराम मुंढेंचं लक्ष; वारकऱ्यांना स्वच्छ अन् चांगले अन्नपदार्थ मिळावे, पालकमंत्री फोन करणार
आषाढी यात्रेवरही तुकाराम मुंढेंचं लक्ष; वारकऱ्यांना स्वच्छ अन् चांगले अन्नपदार्थ मिळावे, पालकमंत्री फोन करणार
खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ,आता ह्याच्या कपाळावरचा 'गद्दार' डाग कधी पुसणार; उद्धव ठाकरेंची ओमराजेंवर घणाघाती टीका
खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ,आता ह्याच्या कपाळावरचा 'गद्दार' डाग कधी पुसणार; उद्धव ठाकरेंची ओमराजेंवर घणाघाती टीका
TET पेपर फुटीप्रकरणी आरोपींना 8 दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात काय झालं? आरोपीचे वकील अन् पोलिसांचा तपास
TET पेपर फुटीप्रकरणी आरोपींना 8 दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात काय झालं? आरोपीचे वकील अन् पोलिसांचा तपास
Maharashtra Live Breaking News Updates: नागपुरातील न्यू एरा हॉस्पिटलवर एफडीएची कारवाई; 20 लाखांचा औषधसाठा जप्त
Maharashtra Live Breaking News Updates: नागपुरातील न्यू एरा हॉस्पिटलवर एफडीएची कारवाई; 20 लाखांचा औषधसाठा जप्त

व्हिडीओ

Anandache Paan : 'खोचक रेषा' या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा
Uddhav Thackeray UNCUT PC : ईमान राखवा हे बेईमानचं म्हणतोय... ज्याने शिवसेनेसोबत बेईमानी केली
Rajabhau Waje Majha Katta : निष्ठेचा नवा झेंडा रोवणारा खासदार, राजाभाऊ वाजे 'माझा कट्टा'वर
Mira Road Accidet Special Report : जीव वाचवणारी एअरबॅग ठरली जीवघेणी
Candle march to pay tribute to Ketan Agarwal : केतन अगरवालला श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅण्डल मार्च

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND W vs AUS W : चॅम्पियन होण्याचं स्वप्न पुन्हा अधुरंच! शेवटच्या टप्प्यात भारताचा घात; ऑस्ट्रेलियाने दाखवला बाहेरचा रस्ता
चॅम्पियन होण्याचं स्वप्न पुन्हा अधुरंच! शेवटच्या टप्प्यात भारताचा घात; ऑस्ट्रेलियाने दाखवला बाहेरचा रस्ता
Tukaram Mundhe: आषाढी यात्रेवरही तुकाराम मुंढेंचं लक्ष; वारकऱ्यांना स्वच्छ अन् चांगले अन्नपदार्थ मिळावे, पालकमंत्री फोन करणार
आषाढी यात्रेवरही तुकाराम मुंढेंचं लक्ष; वारकऱ्यांना स्वच्छ अन् चांगले अन्नपदार्थ मिळावे, पालकमंत्री फोन करणार
Ketan Agrawal Death Case : सिया गोयलनं फूड कोर्टवरच केतनचा पासपोर्ट काढून घेतला,पुणे- मुंबई प्रवासात काय घडलं? साक्षीदारानं कॅमेऱ्यासमोर येत सगळं सांगितलं  
सिया गोयल आणखी गोत्यात,  तिनेच केतन अग्रवालचा पासपोर्ट फूड कोर्टवर काढून घेतला, साक्षीदार थेट कॅमेऱ्यासमोर
France Plane Crash : फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू , सौदी अरेबियात हेलिकॉप्टर क्रॅश, 14 जणांनी जागेवरच जीव सोडला
फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू , सौदी अरेबियात हेलिकॉप्टर क्रॅश, 14 जणांचा जागीच अंत
धक्कादायक! तुरुंगातील लाचखोर अधिकाऱ्याच्या बंद घरातून मध्यरात्री दोघांना अटक; पुरावे नष्ट करण्यासाठी पाठवल्याचा संशय
धक्कादायक! तुरुंगातील लाचखोर अधिकाऱ्याच्या बंद घरातून मध्यरात्री दोघांना अटक; पुरावे नष्ट करण्यासाठी पाठवल्याचा संशय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2026 | रविवार
उद्धव ठाकरेंच्या गळ्यात कवड्याची माळ, हाती भवानी तलवार; धाराशिवमधून ठाकरेंचा ओमराजेंना म्हणाले, हा 'गद्दार'
उद्धव ठाकरेंच्या गळ्यात कवड्याची माळ, हाती भवानी तलवार; धाराशिवमधून ठाकरेंचा ओमराजेंना म्हणाले, हा 'गद्दार'
Rain Update: मान्सूच्या पहिल्या पावसाचा आनंद, परशुराम घाटातील धबधबा वाहू लागला; पर्यंटकांनी, प्रवाशांनी आनंद लुटला
मान्सूच्या पहिल्या पावसाचा आनंद, परशुराम घाटातील धबधबा वाहू लागला; पर्यंटकांनी, प्रवाशांनी आनंद लुटला
Embed widget