एक्स्प्लोर

आंदोलनावरून खोत-शेट्टी भिडले, खोत म्हणतात, 'हे काजू शेट्टी' तर शेट्टी म्हणाले, 'खोत भ्रमिष्ट झाले'

महायुतीच्या वतीने आज राज्यभर दूध दरवाढीच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनावरून माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी माजी कृषिमंत्री कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आमदार भुयार म्हणतात, महाविकास आघाडीकडून मंत्रीपदाची ऑफर होती, पण...

सांगली : एकीकडे दूध दरावरून राज्यात आंदोलन पेटले असताना दुसरीकडे माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यात टोकाचे शाब्दिक युद्ध रंगले आहे. राजू शेट्टी म्हणजे काजू शेट्टी असून या भंपक माणसाला शेतकऱ्यांनी देवाला सोडलेल्या वळू सारखी अवस्था झाल्याची घणाघात टीका माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी माजी खासदार राज्य शेट्टी यांच्यावर केली आहे. तर खोत हे भ्रमिस्थासारखे बोलत असल्याची टीका शेट्टी यांनी केली आहे.

महायुतीच्या वतीने आज राज्यभर दूध दरवाढीच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनावरून माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी माजी कृषिमंत्री कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज शेट्टीं यांचा खरपूस समाचार घेतला आहे. "राजू शेट्टी आता हे काजू शेट्टी झाली आहेत आणि या भंपक माणसाला आता कोणी किंमत देत नाही. तसेच त्यांची अवस्था आता गावात देवाला सोडलेल्या वळू प्रमाणे झालेली आहे. शेतकऱ्यांनी शेट्टी यांना रेड्याप्रमाणे सोडले आहे. त्यामुळे आता काय करावं आणि काय नाही, हे सुचत नाही.या उलट राजू शेट्टी यांनी दूध दराच्या आंदोलनाचं नाटक केले आहे. बारामतीमध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी पायी गेलो आणि त्याच ठिकाणी राजू शेट्टी मात्र आपल्या आमदारकीसाठी पाय चाटायला गेले. मात्र अजूनही राष्ट्रवादीने त्यांना आमदारकी दिलेली नाही. कारण राजू शेट्टी जाईल तिथे खंजीर खुपसतात हे त्यांना माहित आहे", अशी टीका खोत यांनी केली आहे. तसेच मला कोंबडीचोर म्हणणाऱ्या राजू शेट्टींनी चारशे एकर जमीन घेऊन ठेवली आहे. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांना मंत्रीपद मिळणार होतं. मात्र राजू शेट्टी यांनी स्वतःला मंत्रीपद हवे असल्याने भुयार यांना मंत्री पद मिळू दिले नाही, असा आरोप खोत यांनी केला आहे.

यावर राजू शेट्टी म्हणाले, सदाभाऊ खोत यांच आंदोलन फसलं. त्यांच्या आंदोलनाचा फज्जा उडाला आहे. शेतकऱ्यांचा सहभाग नव्हता त्यामुळेच ते पिसाळले आहेत. आंदोलन केंद्र सरकार विरोधात आहे की राज्य सरकार विरोधात की राजू शेट्टी यांच्या विरोधात आहे ते आधी ठरवा. प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा आलेल्या अपयशाला कोणाला तरी जबाबदार धरण्यासाठी भ्रमिस्थासारख बोलले असावेत. माझी तीनशे एकर जमीन दाखवून द्या. ती विकून कडकनाथ मधील लोकांचे पैसे परत करतो.

आमदार भुयार म्हणतात, महाविकास आघाडीकडून मंत्रीपदाची ऑफर होती, पण... 

महाविकास आघाडीकडून मंत्रीपदाची ऑफर होती. पण महाविकास आघाडी सरकारमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एका मंत्रिपदाची ऑफर होती. मात्र त्यावेळी संघटनेने काही भूमिका घेतली नाही. मंत्रिपद मिळालं असतं तर माझ्यासारख्या फाटक्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला असता, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांनी एबीपी माझा डिजिटलशी बोलताना म्हटलंय. ते म्हणाले की, मंत्रिमंडळात मंत्रिपदाची ऑफर होती. मात्र त्यावेळी राजू शेट्टी आणि संघटनेने कुठलीही भूमिका घेतली नाही. अर्थात यामुळं मी राजू शेट्टी किंवा संघटनेवर आजिबात नाराज नाही, कारण शेवटी ती संघटनेची भूमिका आहे. मी शेवटपर्यंत माझा मतदारसंघ आणि शेतकऱ्यांसाठी काम करत राहील, असंही भुयार यांनी म्हटलंय. आज आमदार तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी देवेंद्र भुयारांना मंत्रिपद मिळत असताना राजू शेट्टी यांनी मिळू दिलं नाही, असा आरोप केला आहे. त्यावर बोलताना भुयार यांनी ही प्रतिक्रिया दिली.

संबंधित बातम्या :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India vs South Africa, 2nd Test: गुवाहाटी कसोटीत DRS वरुन फुल्ल ड्रामा; तिसऱ्या पंचांनी निर्णय उलटवला, जडेजा स्तब्ध राहिला
Video: गुवाहाटी कसोटीत DRS वरुन फुल्ल ड्रामा; तिसऱ्या पंचांनी निर्णय उलटवला, जडेजा स्तब्ध राहिला
Share Market : रिलायन्सचे गुंतवणूकदार मालामाल, पाच दिवसात 36000 कोटी रुपयांची कमाई, सेन्सेक्सवरील 7 कंपन्यांचं बाजारमूल्य वाढलं
रिलायन्सचे गुंतवणूकदार मालामाल, पाच दिवसात 36000 कोटी रुपयांची कमाई, सेन्सेक्सवरील 7 कंपन्यांचं बाजारमूल्य वाढलं
Pankaja Munde on Gauri Garje death: 'मला अनंतचा फोन आला, खूप रडत होता'; गौरीच्या मृत्यूनंतर पीए पंकजा मुंडेंना फोनवर काय म्हणाला?
'मला अनंतचा फोन आला, खूप रडत होता'; गौरीच्या मृत्यूनंतर पीए पंकजा मुंडेंना फोनवर काय म्हणाला?
Gauri Palwe Death Case : एका बहिणीचा जीव गेला, तिला न्याय मिळाला पाहिजे; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीच्या आत्महत्येवर बजरंग सोनवणे काय म्हणाले?
एका बहिणीचा जीव गेला, तिला न्याय मिळाला पाहिजे; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीच्या आत्महत्येवर बजरंग सोनवणे काय म्हणाले?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Smriti Mandhana Marriage Postpond : वडिलांची प्रकृती बिघडली, स्मृती मानधनाचा विवाहसोहळा पुढे ढकलला
Smriti Mandhana Father News : विवाहसोहळ्यात स्मृती मानधनाच्या वडिलांची तब्येत बिघडली
Hasan Mushrif Kolhapur Speech : नेत्याने घेतलेला निर्णय पटो न पटो तो मान्य करायचा
Amit Thackeray Navi Mumbai : अमित ठाकरे नेरुळमध्ये, शिवरायांच्या पुतळ्याच्या उद्घाटनप्रकरणी गुन्हा
Pankja Munde PA Wife : तो म्हणतो की गळफास घेतला मग त्याने थांबवलं  का नाही?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India vs South Africa, 2nd Test: गुवाहाटी कसोटीत DRS वरुन फुल्ल ड्रामा; तिसऱ्या पंचांनी निर्णय उलटवला, जडेजा स्तब्ध राहिला
Video: गुवाहाटी कसोटीत DRS वरुन फुल्ल ड्रामा; तिसऱ्या पंचांनी निर्णय उलटवला, जडेजा स्तब्ध राहिला
Share Market : रिलायन्सचे गुंतवणूकदार मालामाल, पाच दिवसात 36000 कोटी रुपयांची कमाई, सेन्सेक्सवरील 7 कंपन्यांचं बाजारमूल्य वाढलं
रिलायन्सचे गुंतवणूकदार मालामाल, पाच दिवसात 36000 कोटी रुपयांची कमाई, सेन्सेक्सवरील 7 कंपन्यांचं बाजारमूल्य वाढलं
Pankaja Munde on Gauri Garje death: 'मला अनंतचा फोन आला, खूप रडत होता'; गौरीच्या मृत्यूनंतर पीए पंकजा मुंडेंना फोनवर काय म्हणाला?
'मला अनंतचा फोन आला, खूप रडत होता'; गौरीच्या मृत्यूनंतर पीए पंकजा मुंडेंना फोनवर काय म्हणाला?
Gauri Palwe Death Case : एका बहिणीचा जीव गेला, तिला न्याय मिळाला पाहिजे; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीच्या आत्महत्येवर बजरंग सोनवणे काय म्हणाले?
एका बहिणीचा जीव गेला, तिला न्याय मिळाला पाहिजे; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीच्या आत्महत्येवर बजरंग सोनवणे काय म्हणाले?
Umesh Patil on Rajan Patil: विरोधात आवाज उठवला म्हणूनच तुमच्या शिवसैनिकाला संपवलं, उमेश पाटलांचा शिंदेंसमोरच राजन पाटलांवर गंभीर आरोप; एकनाथ शिंदे म्हणाले...
विरोधात आवाज उठवला म्हणूनच तुमच्या शिवसैनिकाला संपवलं, उमेश पाटलांचा शिंदेंसमोरच राजन पाटलांवर गंभीर आरोप; एकनाथ शिंदे म्हणाले...
Amit Thackeray: पोलिस नोटीस द्यायला शिवतीर्थावर, पण वाट पाहून रिकाम्या हाती परतले; अमित ठाकरेंकडून पहिली केस अंगावर घेताच नवी मुंबईत विराट शक्तीप्रदर्शन
पोलिस नोटीस द्यायला शिवतीर्थावर, पण वाट पाहून रिकाम्या हाती परतले; अमित ठाकरेंकडून पहिली केस अंगावर घेताच नवी मुंबईत विराट शक्तीप्रदर्शन
Eknath Shinde : देवेंद्र फणडवीस कार्यक्रमात दोन खुर्च्यांचं अंतर ठेवून बसले; दुराव्याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा; एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, म्हणाले...
देवेंद्र फणडवीस कार्यक्रमात दोन खुर्च्यांचं अंतर ठेवून बसले; दुराव्याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा; एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, म्हणाले...
बिहार निवडणुकीत अकल्पनीय घडलं, वास्तवात आकडे जुळत नाहीत; एनडीएनं मतांवर प्रभाव पाडण्यासाठी महिलांना 10 हजार वाटले, प्रशांत किशोरांनी अखेर मौन सोडलं
बिहार निवडणुकीत अकल्पनीय घडलं, वास्तवात आकडे जुळत नाहीत; एनडीएनं मतांवर प्रभाव पाडण्यासाठी महिलांना 10 हजार वाटले, प्रशांत किशोरांनी अखेर मौन सोडलं
Embed widget