एक्स्प्लोर

लग्न ठरवायच्या बैठकीतच एवढी भांडणं, तर संसार नीट कसा होणार? रोहित पवारांचा सेना-भाजपला टोला

राज्यातील जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला विरोधात बसण्याचा कौल दिला, आम्ही त्याचा स्वीकार करुन कामाला देखील लागलो आहोत. मात्र भाजप-शिवसेना युतीमध्ये सध्या सुरु असणारा वाद हा लोकशाहीचा अपमान करणारा आहे, असं रोहित पवारांनी म्हटलं.

मुंबई : राज्यात कोणता पक्ष सत्ता स्थापन करणार यांची उत्सुकता सर्वांनाचा लागली आहे. सध्या राज्यातील अनेक भागात ओला दुष्काळ सदृष परिस्थिती आहे, त्यामुळे लवकरात लवकर सरकार स्थापन होणे गरजेचं आहे. राज्यातील राजकीय परिस्थितीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी आपलं मत मांडल आहे. सरकार स्थापनेला होत असलेल्या उशीरामुळे राज्याचा एक नागरिक म्हणून मी चिंताग्रस्त आहे, असं  रोहित पवार यांनी म्हटलं आहे. लग्न ठरवायच्या बैठकीतच एवढी भांडणं होत असतील तर संसार नीट कसा होणार, असा टोलाही रोहित पवारांनी शिवसेना-भाजपला लगावला.

राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या तडाख्यातून सावरायच्या आधीच त्याला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील जनतेला अनेक समस्या भेडसावत आहेत. लवकरात लवकर सरकार स्थापन करुन सर्वांनी मिळून जनतेला आधार देण्याची गरज आहे. सत्ता स्थापनेला होत असलेला उशीर पाहून एक नागरिक म्हणून चिंताग्रस्त आहे. राज्यातील जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला विरोधात बसण्याचा कौल दिला, आम्ही त्याचा स्वीकार करुन कामाला देखील लागलो आहोत. मात्र भाजप-शिवसेना युतीमध्ये सध्या सुरु असणारा वाद हा लोकशाहीचा अपमान करणारा आहे, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

VIDEO | सरकार बनवण्याचा पेच लवकर सुटेल : मुख्यमंत्री

या वादाची दुसरी बाजू म्हणजे सरकार स्थापन करताना या दोन पक्षात असलेले मतभेद पाहता पुढच्या पाच वर्षात खरंच भाजप-शिवसेना राज्याला एक स्थिर सरकार देऊ शकतील का? यापूर्वी देखील एकत्र सत्तेत असताना युतीमध्ये होणारा वाद राज्याने बघितला आहे. आतादेखील संख्याबळाच्या जोरावर भाजप ज्याप्रकारे शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे, त्यातून नवीन वाद उद्भवून पुन्हा एकदा राज्यातील जनतेच्या नशिबात सत्ताधारी पक्षांची भांडणेच बघायची आहेत, अस दिसतंय. कारण लग्न ठरवायच्या बैठकीतच जर एवढी भांडण झाली तर पुढं जाऊन संसार कसा नीट होणार? असा टोला  रोहित पवारांनी लगावला.

महाराष्ट्राला असे अनेक नेते लाभले आहेत, ज्यांच्याबद्दल संपूर्ण राज्याला नेहमीच आदर राहिला. आदरणीय स्व. बाळासाहेब ठाकरे त्यापैकीच एक. माझ्या मनात बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदर असण्याची अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक म्हणजे देशाच्या राजकारणात त्यांचं असलेलं वजन. निवडणूकीपूर्वी युती करताना सत्तेतला वाटा समान असेल, असा शब्द शिवसेनेला देऊन देखील सध्या भाजप ज्याप्रकारे आपला शब्द फिरवत आहे, हे बघता प्रश्न पडतो की आज जर बाळासाहेब ठाकरे हयात असते तर भाजपचं एवढं धाडस झालं असत का? असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला.

VIDEO | शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याचा शिवतीर्थावर शपथविधी : संजय राऊत 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
Prashant Jagtap: मला काँग्रेसमध्ये घेऊ नये त्यासाठी अनेकांनी फोनाफोनी; शरद पवार भेटले तर मी त्यांना....; प्रशांत जगतापांनी सगळंच काढलं बाहेर
मला काँग्रेसमध्ये घेऊ नये त्यासाठी अनेकांनी फोनाफोनी; शरद पवार भेटले तर मी त्यांना....; प्रशांत जगतापांनी सगळंच काढलं बाहेर
कल्याणमध्ये मोठा ट्विस्ट, दोन्ही शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची भेट; नॉट रिचेबल नगरसेवकांवरही कारवाई सुरू
कल्याणमध्ये मोठा ट्विस्ट, दोन्ही शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची भेट; नॉट रिचेबल नगरसेवकांवरही कारवाई सुरू
NCP: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं म्हणजे बिर्याणीत गुळवणी मिसळण्यासारखं; दादांना सत्तेतून बाहेर यावे लागेल, शरद पवारांच्या आमदाराचा एकत्र येण्याला विरोध
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं म्हणजे बिर्याणीत गुळवणी मिसळण्यासारखं; दादांना सत्तेतून बाहेर यावे लागेल, शरद पवारांच्या आमदाराचा एकत्र येण्याला विरोध

व्हिडीओ

Akshay Kumar Car Accident : जूहूत 3 गाड्यांचा अपघात, अपघातग्रस्त रिक्षाची अक्षय कुमारच्या कारला धडक
Samadhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर
KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
Prashant Jagtap: मला काँग्रेसमध्ये घेऊ नये त्यासाठी अनेकांनी फोनाफोनी; शरद पवार भेटले तर मी त्यांना....; प्रशांत जगतापांनी सगळंच काढलं बाहेर
मला काँग्रेसमध्ये घेऊ नये त्यासाठी अनेकांनी फोनाफोनी; शरद पवार भेटले तर मी त्यांना....; प्रशांत जगतापांनी सगळंच काढलं बाहेर
कल्याणमध्ये मोठा ट्विस्ट, दोन्ही शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची भेट; नॉट रिचेबल नगरसेवकांवरही कारवाई सुरू
कल्याणमध्ये मोठा ट्विस्ट, दोन्ही शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची भेट; नॉट रिचेबल नगरसेवकांवरही कारवाई सुरू
NCP: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं म्हणजे बिर्याणीत गुळवणी मिसळण्यासारखं; दादांना सत्तेतून बाहेर यावे लागेल, शरद पवारांच्या आमदाराचा एकत्र येण्याला विरोध
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं म्हणजे बिर्याणीत गुळवणी मिसळण्यासारखं; दादांना सत्तेतून बाहेर यावे लागेल, शरद पवारांच्या आमदाराचा एकत्र येण्याला विरोध
Devendra Fadnavis Maharashtra Jobs: दावोसमध्ये महाराष्ट्राला गुंतवणुकीचं घबाड गवसलं, 15 लाख नोकऱ्या मिळणार, पहिल्याच दिवशी मोठे करार
दावोसमध्ये महाराष्ट्राला गुंतवणुकीचं घबाड गवसलं, 15 लाख नोकऱ्या मिळणार, पहिल्याच दिवशी मोठे करार
Eknath Shinde: मुंबईचं महापौरपद मिळालं नाही तर 'या' दोन महानगरपालिकांमध्ये शिंदे सेनेकडून भाजपला शह देण्याच्या हालचाली
मुंबईचं महापौरपद मिळालं नाही तर 'या' दोन महानगरपालिकांमध्ये शिंदे सेनेकडून भाजपला शह देण्याच्या हालचाली
Avinash Jadhav: 'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
Mohit Kamboj on Raj Thackeray : राज ठाकरे मर्द माणूस, आमचे संबंध खूप चांगले, मोहित कंबोज यांनी केलं कौतुक
राज ठाकरे मर्द माणूस, आमचे संबंध खूप चांगले, मोहित कंबोज यांनी केलं कौतुक
Embed widget