एक्स्प्लोर
Advertisement
राजू शेट्टींची आत्मक्लेश यात्रा, मुंबईत वाहतूक कोंडी
मुंबई: स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काढलेल्या आत्मक्लेश यात्रेमुळे मुंबईतील सायन-पनवेल महामार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे.
खासदार राजू शेट्टी आज चेंबूरच्या शिवाजी पुतळ्याला अभिवादन करुन लालबागच्या दिशेने रवाना झाले आहेत. पण त्यांच्यासोबत असलेल्या समर्थकांमुळे मुंबईत येणाऱ्या वाहनांच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे.
आत्मक्लेश यात्र काल मुंबईत दाखल झाली. या यात्रेमुळे पनवेलहून मुंबईत येणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. वाशीच्या खाडी पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.
दरम्यान सदाभाऊ खोत सध्या सत्तेत आहेत आणि त्यांची तब्येत बरी नाही, म्हणूनच ते स्वागताला येऊ शकले नाहीत, असा टोला यावेळी राजू शेट्टींनी लगावला.
आत्मक्लेश यात्रेत राजू शेट्टींच्या पायांना सूज आणि फोड!
पुण्यातून 22 मे रोजी खासदार राजू शेट्टींच्या आत्मक्लेश यात्रेला सुरुवात झाली. पुण्यातील फुले वाड्यात अभिवादन करुन आत्मक्लेश यात्रा मुंबईच्या दिशेने रवाना झाली होती.
शेतकऱ्यांचा सात-बारा उतारा कोरा करा, कर्जमुक्ती द्या, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा इत्यादी मागण्या घेऊन खासदार राजू शेट्टी यांनी आत्मक्लेश यात्रेला सुरुवात केली आहे. संबंधित बातम्या खासदार राजू शेट्टींची आत्मक्लेश यात्रा मुंबईत दाखलशेतकऱ्यांकडून पाय धुवून घेण्याची भाजप नेत्यांची लायकी नाही : शेट्टी
खासदार राजू शेट्टींचा मुलगा सौरभही राजभवनावर धडकणार
आत्मक्लेश यात्रेत राजू शेट्टींच्या पायांना सूज आणि फोड!
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्राईम
राजकारण
भविष्य
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion