एक्स्प्लोर

अतिवृष्टी, महापूर ते ओला दुष्काळ, राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, दिवाळी आधी शेतकऱ्यांना पैसे द्या, अन्यथा...

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) ज्यावेळी विरोधी पक्षनेते होते त्यावेळी त्यांनी स्वतः ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केळी होती असे वक्तव्य राजू शेट्टी यांनी केले.

Raju Shetti :  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) ज्यावेळी विरोधी पक्षनेते होते त्यावेळी त्यांनी स्वतः ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केळी होती. आता तेच म्हणतात की ओला दुष्काळ जाहीर करता येणार नाही. त्यांनी दुष्काळ जाहीर करावा एवढी आमची मागणी आहे, ओला कोरडा त्यांनी पाहावं असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टींनी टीका केली.  दुष्काळ जाहीर करता येतं नाही तर विरोधी पक्षनेता असताना त्यांनी का दिशाभूल केली? असा सवलाही शेट्टींनी केला. विरोधी पक्षात असताना शेतकऱ्याची बाजू घ्यायची आणि सत्तेत आल्यावर मात्र विसरायचं हे राज्यकर्त्यांचे कामं झाल्याचे शेट्टी म्हणाले. 

राज्यात अतिवृष्टीने थैमाण घातलं आहे. शेतकरी मोडून पडला आहे. धाराशिवमध्ये राणी बारकूल नावाच्या महिला आंदोलन करत आहेत. त्यांच्या सासऱ्याला अतिवृष्टीमुळे धक्का बसला आणि त्यांचा मृत्यू झाला. त्या भगिनीची समजूत घालून उपोषण सोडायला लावलं. पाच ते सहा आत्महत्याग्रस्त कुटुंबातील लोकांची भेट घेतल्याचे राजू शेट्टी म्हणाले. शेतकऱ्याला आता आधाराची गरज आहे. पण सरकार मीठ चोळण्याचे काम करत आहे.  सोलापुरात देखील प्रचंड नुकसान झाले आहे, माती वाहून गेलीय, विहिरी बुजल्यात. पिकांची गिनती करता येणार नाही अशी स्थिती आहे. जलसंपदा आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयाचा अभाव यामुळे हे झाल्याचे शेट्टी म्हणाले. 

जिल्हा प्रशासन मात्र गाफिल राहिलं

अहिल्यानगरमध्ये अतिवृष्टी होणार याचा अलर्ट होता. पाणी सोलापूरला यायला 18 तास लागतात याची सर्व माहिती घेऊन नियोजन करता आलं असतं. जिल्हा प्रशासन मात्र गाफिल राहिलं किंवा जलसंपदा विभागाने त्याबद्दल माहिती दिली नाही. सरकारने अत्यंत तुटपुंजी मदत देण्याचं सांगितलं आहे असे शेट्टी म्हणाले. 

माढा तालुक्यातील एका केळी उत्पादक शेतकऱ्याचे  25 लाख रुपयांचे नुकसान झाले

माढा तालुक्यातील एका केळी उत्पादक शेतकरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.  त्या शेतकऱ्याला किमान 25 लाख रुपये मिळाले असते. पण आता सगळं गेलं जमीन साफ करायला 30 हजार खर्च येईल असे शेट्टी म्हणाले. पण त्याला सरकार फक्त 17 हजार देईल, 25 लाख गेले साफ करायला लागणारे 30 हजार ही मिळणार नाहीत असे शेट्टी म्हणाले. 

एकनाथ शिंदे यांना कळलं आहे की शेतकऱ्यांपेक्षा जास्त पैसा रस्त्यात आहे

सरकारमध्ये बसलेल्या लोकांचं आणि शेतकऱ्यांचा काही संबंध आहे का? हे तपसायला पाहिजे. एकनाथ शिंदे यांना कळलं आहे की शेतकऱ्यांपेक्षा जास्त पैसा रस्त्यात आहे. अजित पवार यांच्या लीला काय सांगाव्यात? असा टोला देखील शेट्टींना लगावला.  ऊस उत्पदक शेतकऱ्याकडून 15 रुपये कमी करण्याचा निर्णय यांनी घेतलाय. आधीच उसाचा उत्पादन घटलंय त्यामुळे हा फटका बसलाय. त्यात अजित पवार यांचा जिजया कर आहे असे शेट्टी म्हणाले. 

केवळ सभा घेणं आणि आश्वासन यापलीकडे काहीही केले नाही. यांच्यावर आता कोणाचा विश्वास राहिलेला नाही.  शेतकरी आत्महत्या करतायेत आणि हे कोटी रुपये मंडपला खर्च करून केवळ कार्यक्रम करतायेत. एवढ्या पैशात एखाद्या गावाचा प्रश्न सुटला असता. जर असं राहिलं तर नेपाळ, बांगलादेश सारखा देश पेटून उठल्याशिवाय राहणार नाही असा इशारा शेट्टींनी दिला. 

दिवाळी आधी शेतकऱ्यांना पैसे द्या अन्यथा मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना दिवाळी करु देणार नाही

अजित दादा म्हणतात पैशाचे सोंग करता येतं नाही.  सरकारकडे पैसा नसतील तर शक्तीपीठ महामार्गाला विरोध असताना का रेटण्याचा प्रयत्न होत आहे. सर्वाधिक महाग कर्ज घेऊन तुम्ही करताय. ह्या रस्त्याचा विषय बाजूला ठेवा ना आणि तेच पैसे पूरग्रस्ताना द्या. शेतकऱ्यांना दिवाळी आधी हे पैसे द्या. जर दिवाळी आधी शेतकऱ्यांना पैसे दिले नाहीत तर आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अधिकारी कोणालाच दिवाळी करु देणारं नाही असा इशारा शेट्टींनी दिला. 

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील सहा वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील चार वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी कार्यरत. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anant Garje and Gauri Garje Case: गौरीचा मृत्यू झाल्याचं समजताच अनंतने स्वत: भिंतीवर डोकं आपटून घेतलं; शरीरावर एकूण 28 जखमा, पोलिसांनी प्रेयसीचाही जबाब नोंदवला
गौरीचा मृत्यू झाल्याचं समजताच अनंतने स्वत: भिंतीवर डोकं आपटून घेतलं; शरीरावर एकूण 28 जखमा, पोलिसांनी प्रेयसीचाही जबाब नोंदवला
Chhatrapati Sambhajinagar: पद्मश्री पुरस्काराची 'ऑफर' देऊन राजकीय नेत्यांना चुना लावला, नागपूरच्या नेत्याला राज्यसभेचं स्वप्न दाखवलं, संभाजीनगरमधील तोतया IAS अधिकाऱ्याचे चक्रावणारे कारनामे
पद्मश्री पुरस्काराची 'ऑफर' देऊन राजकीय नेत्यांना चुना लावला, नागपूरच्या नेत्याला राज्यसभेचं स्वप्न दाखवलं, संभाजीनगरमधील तोतया IAS अधिकाऱ्याचे चक्रावणारे कारनामे
Share Market : स्टेट बँक ऑफ इंडिया ते कॅनरा बँक, 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
स्टेट बँक ऑफ इंडिया ते कॅनरा बँक, 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
Maharashtra Live Updates: वसईत हार्पिक–डेटॉलसह नामांकित कंपन्यांचा बनावट माल मोठ्याप्रमाणावर जप्त
Maharashtra Live Updates: वसईत हार्पिक–डेटॉलसह नामांकित कंपन्यांचा बनावट माल मोठ्याप्रमाणावर जप्त
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Municipal Election 2025 : जिल्हा परिषदांऐवजी महापालिका निवडणूक आधी होणार?
Santosh Banger Hingoli : बांगरांचा कारनामा, बातमीनंतर गुन्हा Special Report
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : चांदा ते बांदा; जिल्ह्यात कुठे कुठे राडा? Special Report
Maharashtra Local Body Election Result :निवडणुकांच्या निकालाचा नवा' कायदेशीर मुहूर्त' Special Report
Zero Hour Full : आधी निवडणुका, आता निकालही पुढे ढकललं, राजकीय आरोप-प्रत्यारोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anant Garje and Gauri Garje Case: गौरीचा मृत्यू झाल्याचं समजताच अनंतने स्वत: भिंतीवर डोकं आपटून घेतलं; शरीरावर एकूण 28 जखमा, पोलिसांनी प्रेयसीचाही जबाब नोंदवला
गौरीचा मृत्यू झाल्याचं समजताच अनंतने स्वत: भिंतीवर डोकं आपटून घेतलं; शरीरावर एकूण 28 जखमा, पोलिसांनी प्रेयसीचाही जबाब नोंदवला
Chhatrapati Sambhajinagar: पद्मश्री पुरस्काराची 'ऑफर' देऊन राजकीय नेत्यांना चुना लावला, नागपूरच्या नेत्याला राज्यसभेचं स्वप्न दाखवलं, संभाजीनगरमधील तोतया IAS अधिकाऱ्याचे चक्रावणारे कारनामे
पद्मश्री पुरस्काराची 'ऑफर' देऊन राजकीय नेत्यांना चुना लावला, नागपूरच्या नेत्याला राज्यसभेचं स्वप्न दाखवलं, संभाजीनगरमधील तोतया IAS अधिकाऱ्याचे चक्रावणारे कारनामे
Share Market : स्टेट बँक ऑफ इंडिया ते कॅनरा बँक, 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
स्टेट बँक ऑफ इंडिया ते कॅनरा बँक, 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
Maharashtra Live Updates: वसईत हार्पिक–डेटॉलसह नामांकित कंपन्यांचा बनावट माल मोठ्याप्रमाणावर जप्त
Maharashtra Live Updates: वसईत हार्पिक–डेटॉलसह नामांकित कंपन्यांचा बनावट माल मोठ्याप्रमाणावर जप्त
Nanded Crime Love Story: बर्थडेला काटेरी गुलाबाचं झाड दिलं, आचलच्या भावांनी सक्षमला मनातील गोष्टींचा थांगपत्ताही लागून दिला नाही अन् वेळ येताच काटा काढला
बर्थडेला काटेरी गुलाबाचं झाड दिलं, आचलच्या भावांनी सक्षमला मनातील गोष्टींचा थांगपत्ताही लागून दिला नाही अन् वेळ येताच काटा काढला
Santosh Bangar : निवडणूक आयोगानं संतोष बांगर यांची आमदारकी रद्द करावी, ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाची मागणी
निवडणूक आयोग जिवंत असेल तर आमदार संतोष बांगर यांच्यावर कारवाई करेल, ठाकरेंची शिवसेना आक्रमक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
Embed widget