एक्स्प्लोर

कोण कुणाला कॉल करणार?

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मोठं वक्तव्य केलं आहे. "युतीचा प्रस्ताव आल्यास यावेळी नक्की विचार करेन", असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं. राज यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कारण एरव्ही 'एकला चलो'चा नारा देणारे राज ठाकरे आता युतीबाबत बोलत असल्यामुळे, ते नेमकं कोणासोबत युती करण्यास उत्सुक आहेत अशी चर्चा सुरु झाली आहे. प्रस्ताव आल्यास युतीसाठी तयार : राज ठाकरे यापूर्वी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी शिवसेनेसोबत युती करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी फोन न केल्याचा गौप्यस्फोट राज यांनी 'माझा कट्टा'वर केला होता. विधानसभा निवडणुकीदरम्यान गौप्यस्फोट यापूर्वी विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी इच्छुक होतो, असा गौप्यस्फोट राज ठाकरे यांनी 'माझा कट्टा'वर 2014 मध्ये केला होता. शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर मी शिवसेनेसोबत जाण्याची तयारी दाखवली होती. उद्धवशी तसं बोलणंही झालं होतं. त्यासाठी अर्जवाटपही थांबवलं होतं. पण त्यानंतर उद्धवनं प्रतिसादच दिला नाही. साधा फोनही केला नाही. त्यामुळंच सगळं फिसकटलं,' असा खळबळजनक गौप्यस्फोट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 2014 मध्ये 'माझा कट्टा'वर केला होता. राज ठाकरे त्यावेळी (2014) काय म्हणाले होते? 'शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर दैनिक सामनाचे वितरक बाजीराव दांगट माझ्या घरी आले. तुम्ही एकत्र यायला हवं. मी उद्धवशी बोलतो, असं म्हणाले. मी होकार दिला. म्हटलं बोला. त्यानंतर त्याच रात्री दांगटांच्या फोनवरून उद्धवचा फोन आला. विचारपूस झाल्यानंतर उद्धवनं भाजपचा विषय काढला. फसवणूक झाल्याचं म्हणाला. त्यावर मी म्हणालो, मला जे बाहेर राहून कळत होतं, ते तुला आत राहून कळलं नाही. बरं मग आता काय करायचं, असं त्याला विचारलं. त्यानं तीन पर्याय माझ्यापुढं ठेवले. एकतर आपण चर्चा करायची. दुसरं म्हणजे निवडणूक प्रचारात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करायचे नाहीत आणि तिसरा पर्याय निवडणुकीनंतर काय तो निर्णय घ्यायचा. अर्ज भरायला दोनच दिवस बाकी होते म्हणून पहिल्या पर्यायाची चाचपणी केली. मी लगेचच चर्चेसाठी बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांची नावं सुचवली. उद्धवने अनिल देसाई आणि दुसरा कोणीतरी चर्चा करेल, असं सांगितलं. अनिल देसाई बाळाला फोन करेल असं उद्धवनं सांगितलं. दुसऱ्या दिवशी म्हणजे, २६ तारखेला सकाळी साडेसात, पावणेआठ वाजता स्वत: बाळानेच फोन केला. पण फोन बंद. पुन्हा केला. उचलला नाही. तिसऱ्यांदा उचलला तेव्हा अनिल देसाई म्हणाले, मी फॉर्म भरायला जातोय. दुपारी फ्री होईन. तीन वाजता बोलू. त्यावर बाळाने सांगितलं, आता तुमचं काम आटोपल्यावर फोन तुम्हीच करा. आम्ही फोनची वाट बघत होतो. दुपारपासूनच राज्यभरातले उमेदवार एबी फॉर्मसाठी माझ्या घराबाहेर जमले होते. पण चर्चा होणार म्हणून मी फॉर्मवाटप थांबवलं. आमच्या पक्षातही उलटसुलट चर्चा सुरू झाली. त्यांना समजेना फॉर्म वाटप बंद का झालं म्हणून? पण चार वाजले तरी फोन नाही. शेवटी मी त्यांचा नाद सोडला आणि फॉर्म वाटून टाकले. म्हटलं मरा, आपलं आपण बघून घेऊ. यापेक्षा आणखी मी काय करायला हवं होतं. म्हणजे यांनी मला झुलवत ठेवून माझ्याच लोकांमध्ये माझ्याबद्दल संशय निर्माण करायचा. मी काय एवढा येडा आहे', असा सवाल राज यांनी केला. उद्धव ठाकरे काय म्हणाले होते? राज यांनी केलेल्या गौप्यस्फोटाबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना 2014 मध्ये 'माझा कट्टा'वर विचारण्यात आलं होतं. त्यावेळी उद्धव म्हणाले, "ज्यांना माझ्या फोनची अपेक्षा आहे, त्यांनी मला मॅसेज किंवा कॉल करा, मी त्यांना रिप्लाय देईन". उद्धव ठाकरेंना पाठिंबा हवा होता, तर त्यांनी फोन का केला नाही, असा सवाल राज ठाकरे यांनी केला होता, त्याला उद्धव यांनी उत्तर दिलं. कोणाशी संपर्क ठेवायचं हे मी जाणतो. ज्यांना माझ्या फोनची अपेक्षा आहे, त्यांनी मला मेसेज करा, मी कॉल किंवा मेसेज करेन असं उद्धव म्हणाले होते.  राज-उद्धव एकत्र येणं याबाबत आता मी फुल स्टॉप दिला आहे, त्यानेही दिला आहे आणि तुम्हीही द्या. मी जागेवरच आहे. मी कोणालाही सोडून गेलो नाही. त्यामुळे जे सोडून गेलेत त्यांना हा प्रश्न विचारा असं आवाहन उद्धव यांनी केलं होतं. संबंधित बातम्या
प्रस्ताव आल्यास युतीसाठी तयार : राज ठाकरे

महत्त्वाच्या बातम्या

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget