एक्स्प्लोर

सरकार मागच्या दाराने सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करतंय : विखे-पाटील

बाजार समित्यांसंदर्भातील नव्या निर्णयाबाबत विधानसभेत आवाज उठवणार असून न्यायालयात देखील जाणार असल्याचं विखे-पाटलांनी स्पष्ट केलं.

मुंबई : महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई, पुणे, लातूर आणि नागपूरसह काही बाजार समित्या राष्ट्रीय बाजार समित्या घोषीत करण्यात येणार आहेत. मात्र ही सरकारची मक्तेदारी असून सरकार मागच्या दाराने सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र आम्ही त्यांचा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलं.

एकीकडे सरकार शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देत आहे, तर दुसरीकडे बाजार समित्या राष्ट्रीय घोषित करुन याच शेतकऱ्यांचे अधिकार काढून घेत आहे. याबाबत विधानसभेत आवाज उठवणार असून न्यायालयात देखील जाणार असल्याचं विखे-पाटलांनी स्पष्ट केलं.

माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटलांकडून निर्णयाचं स्वागत

बाजार समित्यांसंदर्भातील नव्या निर्णयाचं माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी स्वागत केलं आहे. बाजार समित्या राष्ट्रीय बाजार समित्या केल्याचा निर्णय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. भविष्यात शेतकऱ्यांना याचा फायदा होईल, असं नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केलं.

या निर्णयामुळे बाजार वाढून याचा फायदा शेतकरी आणि कामगारांना देखील होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बाजार समित्यांच्या विकासासाठी राज्य सरकारचा निधी देखील मिळू शकेल. यामागे कोणतेही राजकारण नसून प्रत्येक गोष्ट राजकारणाच्या दृष्टीने बघणे चुकीचे असल्याचा टोलाही पाटील यांनी लगावला.

राज्यपालांच्या सहीनिशी सरकारडून अध्यादेश जारी

राज्यातील मुंबई, पुणे, नवी मुंबई, लातूर, नागपूरसह काही बाजार समित्या राष्ट्रीय बाजार म्हणून घोषित करण्याचा घाट राज्य सरकारने घातला आहे. सध्या विधीमंडळाचे अधिवेशन सुरु नसल्यामुळे 25 ऑक्टोबरच्या रात्रीच राज्यपालांच्या सहीने हा अध्यादेश सरकारने जारी केला आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांमधून बाजार समित्यांवर निवडण्यात आलेले सर्व संचालक मंडळ बरखास्त होणार आहे. राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशानुसार आता राष्ट्रीय बाजार समित्यांचे सभापती राज्यातील पणन मंत्री असतील.

दरम्यान या निर्णयाचा सर्वाधिक फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादीला होणार आहे. राज्यातील बहुतेक बाजार समित्या या दोन्ही पक्षांच्या ताब्यात आहे.

राज्यपालांच्या सहीने 25 ऑक्टोबरला अध्यादेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या बाजार समित्यांचे संचालक मंडळ बरखास्त होणार आहे. या बाजार समित्यांमध्ये यापुढे निवडणुका होणार नाहीत, तर त्याऐवजी सरकार 23 जणांचं प्रशासकीय मंडळ नियुक्त करेल.

राज्यातील एकूण आवकीपैकी 30 टक्के आवक परराज्यातून किंवा बाजार समित्यांमध्ये तीन परराज्यातून शेतमाल येतो त्या राष्ट्रीय बाजार आता राष्ट्रीय बाजार म्हणून घोषित झाल्या आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरातचा VSR कंपनीशी संबंध आहे का? अजितदादांच्या घराबाहेर झालेल्या पुजेचं कनेक्शन काय? मिटकरींचे सवाल
भोंदूबाबा अशोक खरातचा VSR कंपनीशी संबंध आहे का? अजितदादांच्या घराबाहेर झालेल्या पुजेचं कनेक्शन काय? मिटकरींचे सवाल
पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना राज्यावर 2 लाख कोटींचं कर्ज, आज 11 लाख कोटी, राज ठाकरेंचा फडणवीसांना टोला
पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना राज्यावर 2 लाख कोटींचं कर्ज, आज 11 लाख कोटी, राज ठाकरेंचा फडणवीसांना टोला
भारताला मदत करणाऱ्या इराणला साथ द्यायला पाहिजे होती,  भविष्यात फटका बसणारच, राज ठाकरेंची रोखठोक भूमिका
भारताला मदत करणाऱ्या इराणला साथ द्यायला पाहिजे होती,  भविष्यात फटका बसणारच, राज ठाकरेंची रोखठोक भूमिका
एका बाजुला उन्हाचा तडाखा तर दुसऱ्या बाजूला अवकाळीसह गारपीट, रब्बी पिकांना मोठा फटका, शेतकरी चिंतेत
एका बाजुला उन्हाचा तडाखा तर दुसऱ्या बाजूला अवकाळीसह गारपीट, रब्बी पिकांना मोठा फटका, शेतकरी चिंतेत

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar Special Report : सुधीर मुनगंटीवार म्हणतात... मी पुन्हा येईन!
Share Market Update : गुढीपाडव्याच्या दिवशी शेअर बाजारात पडझड, निफ्टीमध्ये 450 हून अधिक अंकानी पडझड
Rupali Thombare Pune : नाशिक कॅप्टन खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या
Gold And Silver Rate Today Gold Rate News Today News Update ABP Majha
Captain Ashok Kharat Case Today News Update Nashik Crime News ABP Majha

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : महाराष्ट्रावर 11 लाख कोटींचं कर्ज, शेतकरी आत्महत्या ते शहरांचं बकालपण, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, राज ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
महाराष्ट्रावर 11 लाख कोटींचं कर्ज, तीनवेळा कर्जमाफी तरी दररोज शेतकरी आत्महत्या, शहरांचं बकालपण, राज ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
Global Energy Crisis : इराण-इस्त्रायल युद्धामध्ये टॉपचे दोन गॅस केंद्र भक्ष्यस्थानी, भारतासह जगावर ऊर्जासंकट
इराण-इस्त्रायल युद्धामध्ये टॉपचे दोन गॅस केंद्र भक्ष्यस्थानी, भारतासह जगावर ऊर्जासंकट
FASTag Annual Pass : 1 एप्रिलपासून फास्टॅग टोल पास महागणार; नवा पास कसा मिळवायचा? 
1 एप्रिलपासून फास्टॅग टोल पास महागणार; नवा पास कसा मिळवायचा? 
IPL 2026 : आयपीएल सुरु होण्याअगोदरच चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का,ऑस्ट्रेलियन खेळाडू स्पर्धेबाहेर, CSK नव्या खेळाडूच्या शोधात
IPL सुरु होण्याअगोदरच चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का,ऑस्ट्रेलियन खेळाडू स्पर्धेबाहेर, CSK नव्या खेळाडूच्या शोधात
Atanu Chakraborty Resigns: एचडीएफसी बँकेच्या अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा पडताच शेअर्स तब्बल 5 टक्क्यांनी घसरले; अतनु चक्रवर्तींचे बँकेच्या कारभारावर गंभीर आरोप
एचडीएफसी बँकेच्या अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा पडताच शेअर्स तब्बल 5 टक्क्यांनी घसरले; अतनु चक्रवर्तींचे बँकेच्या कारभारावर गंभीर आरोप
Dhananjay Munde : नगरपालिका निवडणुकीच्या काळात मला मोठे मोठे नेते संपवायला निघाले होते, धनंजय मुंडे यांचा गौप्यस्फोट
नगरपालिका निवडणुकीच्या काळात मला मोठे मोठे नेते संपवायला निघाले होते, धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट
Share Market : शेअर बाजारातील घसरणीमुळं गुंतवणूकदारांचं दिवाळं निघालं, सेन्सेक्स 2400 अंकांनी कोसळला, 12 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारातील घसरणीमुळं गुंतवणूकदारांचं दिवाळं निघालं, तब्बल 12 लाख कोटी बुडाले
Satara ZP Election : सातारा जिल्हा परिषदेवर कोणाची सत्ता? राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना युती की भाजपची? चार मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
सातारा जिल्हा परिषदेवर कोणाची सत्ता? राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना युती की भाजपची? चार मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
Embed widget