एक्स्प्लोर

Pune-Satara Highway Toll Tax: कामाची बोंबाबोंब, वसुली मात्र जोरात! पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर आजपासून टोलमध्ये पाच टक्के वाढ

Pune-Satara Road Toll Tax : पुणे आणि सातारा दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याची सदोष बांधणी, सर्व्हिस रोड आणि इतर सुविधांच्या नावाने  बोंबाबोंब असताना या रस्त्यावर आजपासून पाच टक्के टोल वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

पुणे : गेली आठ वर्ष काम रखडलेल्या पुणे आणि सातारा दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावर आजपासून टोलमध्ये पाच टक्के वाढ करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे. या रस्त्याचे काम 31 मार्च 2013 ला पूर्ण केले जाईल असा करार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रस्त्याचे काम करणार्या रिलायन्स इन्फ्रा या कंपनीमध्ये झाला होता. कालच याला आठ वर्ष पूर्ण झाली. मात्र अनेक ठिकाणी रखडलेले काम, अनेक ठिकाणी रस्त्याची सदोष बांधणी, सर्व्हिस रोड आणि इतर सुविधांच्या नावाने  बोंबाबोंब असताना या रस्त्यावर आजपासून  पाच टक्के टोल वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

पुणे आणि सातारा दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग 31 मार्च 2013 रोजी बांधून पूर्ण होणं अपेक्षित होता. तसा करार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि हा रस्ता बांधणाऱ्या रिलायन्स कंपनीमध्ये झाला होता. मात्र या कराराला आज आठ वर्ष पूर्ण होत असताना देखील हा रस्ता अजूनही अर्धवट अवस्थेत आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी हा रस्ता बांधणाऱ्या कंपनीला ॲक्सेस बँकेने कर्ज न दिल्याने रस्त्याचे काम रखडल्याचे कारण दिले.  परंतु टोलच्या माध्यमातून वसूल होणारा पैसा रस्ते बांधणीसाठी का वापरण्यात आला नाही? हा प्रश्न अनुत्तरित आहे. शेकडो कोटी रुपये खर्च होऊन, टोलमधे वेळोवेळी वाढ होऊन देखील अजूनही रस्त्याचं काम अनेक  ठिकाणी अपूर्ण आहे तर अनेक ठिकाणी रस्त्यांची बांधणी चुकल्याने तिथं सातत्यानं अपघात होत आहेत. 

काय झाला होता करार
पुणे आणि सातारा दरम्यानच्या  115 किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि  रिलायन्स इन्फ्रा कंपनीदरम्यान जो करार झाला होता त्या करारानुसार 31 मार्च 213 मध्ये या रस्त्याच्या सहापदरीकरणाचं संपूर्ण काम पूर्ण होणं अपेक्षित होतं. या कामामध्ये बाजूचे सर्व्हिस रोड, उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर यासारख्या कामांचाही समावेश होता. परंतु कराराची मुदत संपून तब्ब्ल आठ वर्ष होत असतानाही हा रस्ता अजूनही पूर्ण झालेला नाही आणि या रस्त्यावरून प्रवास करणारे अजूनही जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. 

मागील आठ वर्ष पुणे आणि सातारा दरम्यानचा हा राष्ट्रीय महामार्ग कधीतरी काम पूर्ण होऊन या वाहतूक कोंडीतून सुटका होईल या प्रतीक्षेत आहे. रस्त्याची बांधणी चुकल्यानं,  सर्व्हिस रोडचं नसल्यानं, उड्डाणपुलाची कामं राखडल्यानं 120 किलोमीटर लांबीच्या या महामार्गावर अनेक ठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत. या रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांची तर गणतीच नाही . मागील आठ वर्षांमध्ये या सगळ्यांमध्ये सुधारणा होण्याऐवजी रस्त्याची अवस्था अधिकच खराब होत गेली आहे.

या रस्त्याचं काम वेळेत पूर्ण न केल्यानं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मागे रिलायन्स इन्फ्रा कंपनीला तब्बल पासष्ट कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. मात्र त्यापैकी वसूल मात्र एक रुपयाही करण्यात आला नाही. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ता बांधणाऱ्या कंपनीला कर्ज देणाऱ्या एक्सिस बँकेने पतपुरवठा बंद केल्यानं रस्त्याचं काम रखडल्याचं कारण दिलं होतं. मग टोलच्या माध्यमातून जे पैसे वसूल केले गेले ते कुठं गेले असा सवाल विचारला जातोय.

या महामार्गावर पुण्यातील नवले पुलाचा भाग असेल किंवा सातारा जिल्ह्यातील खंडाळा घाटाचा परिसर या ठिकाणी सातत्याने अपघात होऊन शेकडोंचे आतपर्यंत प्राण गेलेत. या ठिकाणी रस्त्याची बांधणीच चुकल्याने सातत्याने अपघात होत आहेत असं संस्थांच्या अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. मात्र इथल्या रस्त्यांची रचना अजूनही बदलण्यात आलेली नाही. ठिकठिकाणी पडलेले खड्डे, अर्धवट राहिलेली कामं हे चित्र या रस्त्यावरून प्रवास करणारे वर्षानुवर्षे अनुभवतायतच आणि नजीकच्या काळात त्यात बदल होण्याची चिन्हंही नाहीत. आठ वर्ष एखाद्या  राष्ट्रीय महामार्गाचे कामही पूर्ण होऊ शकत नसेल तर तो रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणण्याच्या लायकीचा उरतो का? हा प्रश्नच आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog: अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील मालमत्तेचा लिलाव; केंद्र सरकारकडून कारवाईसंदर्भात प्रक्रिया पूर्ण
Maharashtra Live blog: अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील मालमत्तेचा लिलाव; केंद्र सरकारकडून कारवाईसंदर्भात प्रक्रिया पूर्ण
Ashok Kharat Nashik Crime News: मोठी बातमी: अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांनंतर आणखी एक नेता पोलिसांच्या रडारवर, दीपक केसरकरांच्या निकटवर्तीयाची एसआयटीकडून कसून चौकशी
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांनंतर आणखी एक नेता पोलिसांच्या रडारवर, दीपक केसरकरांच्या निकटवर्तीयाची एसआयटीकडून कसून चौकशी
Ashok Kharat Case: भारतीय लष्करातील कॅप्टन हे अत्यंत सन्मानाचे पद, नकळत आपल्या सैन्यदलांचा अपमान...; भोंदू खरात प्रकरणावरून संभाजीराजे छत्रपती पुन्हा कडाडले
भारतीय लष्करातील कॅप्टन हे अत्यंत सन्मानाचे पद, नकळत आपल्या सैन्यदलांचा अपमान...; भोंदू खरात प्रकरणावरून संभाजीराजे छत्रपती पुन्हा कडाडले
Satara Zilla Parishad: साताऱ्यात महायुतीत जुंपली, जिल्हा परिषद निवडणुकीचे पडसाद कॅबिनेट बैठकीत उमटणार; भाजप मंत्र्यांबाबत शिवसेना अन् राष्ट्रवादी नाराजी नोंदवणार
साताऱ्यात महायुतीत जुंपली, जिल्हा परिषद निवडणुकीचे पडसाद कॅबिनेट बैठकीत उमटणार; भाजप मंत्र्यांबाबत शिवसेना अन् राष्ट्रवादी नाराजी नोंदवणार

व्हिडीओ

Praful Patel On Rupali Chakankar Ashok Kharat Case मोठी बातमी: अशोक खरात अतिशय घाणेरडा, जे कुणी त्याच्यासोबत...; प्रफुल पटेल यांचं मोठं विधान
Sushma Andhare : चाकणकर रात्री दोन वाजता फोन करून पीडितांना धमक्या द्यायच्या; खरात अन् चाकणकरांमध्ये कोणत्या वेळी काय बोलणं झालं
Iran vs US Israel Conflict : नजर अमेरिकेवर, युद्ध उंबरठ्यावर? Special Report
Raj Thackeray MNS Melava Speech|इराणची बाजू,महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार, प्रत्येकाने ऐकावं असं भाषण
Sudhir Mungantiwar Special Report : सुधीर मुनगंटीवार म्हणतात... मी पुन्हा येईन!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gautam Singhania Accident : रेमंड ग्रुपचे चेअरमन गौतम सिंघानियांची स्पीडबोट मालदीवमध्ये उलटली, तातडीने मुंबईत आणलं, उपचार सुरू; रशियन महिलेसह चौर भारतीय वाहून गेले, नेमकं काय घडलं?
रेमंड ग्रुपचे चेअरमन गौतम सिंघानियांची स्पीडबोट मालदीवमध्ये उलटली, तातडीने मुंबईत आणलं, उपचार सुरू; रशियन महिलेसह चौर भारतीय वाहून गेले, नेमकं काय घडलं?
Thane News : ठाण्यात संतापजनक घटना, येऊरच्या जंगलात चिमुकल्या माकडावर बाण सोडला, पैशांच्या मस्तीत प्राण्यांच्या जीवाशी खेळ
ठाण्यात संतापजनक घटना, येऊरच्या जंगलात चिमुकल्या माकडावर बाण सोडला, पैशांच्या मस्तीत प्राण्यांच्या जीवाशी खेळ
Maharashtra Live blog: मोठी बातमी! राज्य सरकारकडून भाजपला दिलासा; नरिमन पॉइंट येथील राज्य मुख्यालयासाठी 15 हजार चौ. फूट जागा मंजूर
Maharashtra Live blog: मोठी बातमी! राज्य सरकारकडून भाजपला दिलासा; नरिमन पॉइंट येथील राज्य मुख्यालयासाठी 15 हजार चौ. फूट जागा मंजूर
Ashok Kharat : अशोक खरात ओशनो जल बनवून त्यात कुटून-कुटून व्हायग्रा टाकायचा, गाड्या पाठवून राजकारणी हे जल मागवून घ्यायचे, दमानियांचा नवा गौप्यस्फोट
अशोक खरात ओशनो जल बनवून त्यात कुटून-कुटून व्हायग्रा टाकायचा, गाड्या पाठवून राजकारणी हे जल मागवून घ्यायचे, दमानियांचा नवा गौप्यस्फोट
Satara : साताऱ्यात इतक्या खालच्या पातळीचं राजकारण झालं नव्हतं, फुटलेल्यांवर अपात्रतेची कारवाई करणार: मकरंद पाटील
साताऱ्यात इतक्या खालच्या पातळीचं राजकारण झालं नव्हतं, फुटलेल्यांवर अपात्रतेची कारवाई करणार: मकरंद पाटील
Rupali Chakankar Somvati Amavasya: सोमवती अमावस्येला खरोखरच तंत्रमंत्रासाठी अनामिका कापली होती का? रुपाली चाकणकरांनी अखेर मौन सोडलं, म्हणाल्या...
सोमवती अमावस्येला खरोखरच तंत्रमंत्रासाठी अनामिका कापली होती का? रुपाली चाकणकरांनी अखेर मौन सोडलं, म्हणाल्या...
Rupali Chakankar : अरविंद शिंदे म्हणतात, रुपाली चाकणकरांची बदनामी करु नका, गरज पडल्यास काँग्रेसमध्ये घेण्यासाठी शिफारस करु, यावर अतुल लोंढे म्हणाले...
रुपाली चाकणकरांची बदनामी करु नका, पुणे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांची भूमिका; अतुल लोंढे म्हणतात ती शिंदेंची वैयक्तिक भूमिका
Mahesh Shinde : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या निवडणुकीनंतर साताऱ्याच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न,आमदार महेश शिंदे नेमके कोणाचे?”
साताऱ्याच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न,आमदार महेश शिंदे नेमके कोणाचे?”
Embed widget