एक्स्प्लोर

Sachin Ahir on Eknath Shinde : कोणाचं मानसिक आणि राजकीय संतुलन बिघडलं हे जनताच ठरवेल; सचिन अहिर यांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

उद्धव ठाकरे यांनी चिखलीमधील सभेत केलेल्या हल्लाबोलनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याची टीका केली होती. या टीकेनंतर शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर यांनी पलटवार केला आहे.

Sachin Ahir on Eknath Shinde : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चिखलीमधील सभेत केलेल्या हल्लाबोलनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याची टीका केली होती. या टीकेनंतर शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर यांनी पलटवार केला आहे. 

कोणाचं मानसिक आणि राजकीय संतुलन बिघडले आहे हे जनताच ठरवेल, असा पलटवार शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आमदार सचिन अहिर यांनी केला. अहिर यांनी कोल्हापूरमध्ये बोलतांना शिंदे गटावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कोणताही समन्वय नसून कोणताही मंत्री कोणत्याही खात्यावर बोलतो. उद्योगमंत्री कृषी खात्यावर बोलतात, मंत्र्यांमध्ये ताळमेळ नाही. उदय सामंत हे उद्योगमंत्री आहेत की उद्योग करणारे मंत्री आहेत? 

आश्वासनांची पूर्तता करता येत नसल्याने मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. भाजपचे 105 आमदार खासगीत सत्ता कोणासाठी आणि कशासाठी असल्याचे विचारतात. मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांना स्वतःचे भविष्य बघण्यात रस आहे. संपूर्ण महाराष्ट्र व जनतेचे ते काय भविष्य बघणार ? असा प्रश्न अहिर यांनी उपस्थित केला. हिवाळी अधिवेशनापूर्वी वीज बिल माफीचा निर्णय घेतला नाही तर विधिमंडळाचे कामकाज पहिल्या दिवसापासून रोखून धरू असा इशाराही अहिर यांनी दिला.

जनतेच्या प्रश्नांची चर्चा नाही‌, मंत्रिमंडळ विस्तार नाही

ते म्हणाले की, हिवाळी अधिवेशन होऊ घातले असताना जनतेच्या प्रश्नांची चर्चा होऊन धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतात. मात्र, शिंदे फडणवीस सरकार अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांची चर्चा करत नाही.  मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. अहिरे यांनी राज्यपालांवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, राज्यपाल हा जनतेचा आवाज व्हायला पाहिजे. मात्र, राज्यपाल सतत वादग्रस्त विधाने करत आहेत. ज्या पक्षाकडून नियुक्ती झाली ते त्यांचा निषेधही करत नाहीत. त्यांना प्रोत्साहन दिले जाते की काय अशी स्थिती आहे. राज्यपाल हटाव ही शिवसेनेची मागणी आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यपाल हटाव भूमिकेचं स्वागत आहे. 

उद्धव ठाकरे यांचा शेतकरी मेळाव्यातून हल्लाबोल 

उद्धव ठाकरे यांनी शनिवारी शेतकरी मेळाव्यात शिंदे सरकारवर चांगलाच हल्ला चढवला. ते म्हणाले, तुम्ही घेतलेले पन्नास खोके शेतकऱ्यांना दिले तर त्यांचे भले होईल. परंतु, मिंधे सरकारकडून काही अपेक्षा नाही. तुम्ही खोके घेतलेत हे आम्ही म्हणत नाही. तुमचेच आमदार सांगतर आहेत. बच्चू कडू यांनी या आधी देखील सांगितलं की, कोणाच्या लग्नात गेलो, तरी लोक खोक्यांवरून बोलत आहेत. परंतु, हे खोके पचणार नाहीत. जनता याची भरपाई करेल. आम्ही तुम्हाला सोडलेलं नाही. बोक्यांना खोक्यांची भूक होती म्हणून गद्दारी करुन गेले. देशात तुमच्या कपाळावर गद्दाराची ओळख कायम राहिल. ही ओळख पुसता येणार नाही.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Suman Kalyanpur : भावगीतांची सम्राज्ञी हरपली! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; संगीत क्षेत्रावर शोककळा
भावगीतांची सम्राज्ञी हरपली! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; संगीत क्षेत्रावर शोककळा
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन
व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन
Monsoon Updates : मोठी बातमी! राज्यात मान्सूनचे आगमन लांबणार, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये; हवामान खात्याने आता पावसाची नवी तारीख सांगितली
मोठी बातमी! राज्यात मान्सूनचे आगमन लांबणार, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये; हवामान खात्याने आता पावसाची नवी तारीख सांगितली

व्हिडीओ

Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha
Hinjawadi IT Company Shock : रातोरात कंपनी बंद, 700 फ्रेशर इंजिनिअर्स बेरोजगार? | ABP Majha
Mahayuti Seat Sharing Special Report:विधानपरिषदेत भाजपनं दाखवलं मोठं मन, मित्रपक्षांना दिल्या 6 जागा
Manoj Jarange Protest Special Report : जरांगेंचे उपोषण मागे; पुन्हा पेटणार ओबीसी विरुद्ध मराठा वाद?
Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : धनंजय देशमुखांविरोधातील जीवे मारण्याची तक्रार खोटी निघाली, समाधान खिंडकरचा बनाव समोर
धनंजय देशमुखांविरोधातील जीवे मारण्याची तक्रार खोटी निघाली, समाधान खिंडकरचा बनाव समोर
Kagiso Rabada: आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
Vaibhav Sooryavanshi: गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
Virat Kohli Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी; कुठे गारा, कुठे वादळवारा, उकाड्यापासून नागरिकांना सुटका
मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी; कुठे गारा, कुठे वादळवारा, उकाड्यापासून नागरिकांना सुटका
Josh Hazlewood: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Josh Hazlewood Video: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
Embed widget