एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
बेळगावात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन; शिवसेना, कनसे वाद चिघळण्याची शक्यता
कन्नड संघटनेच्या भीमाशंकर पाटील या पदाधिकाऱ्याने दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याविरोधात शिवसेनेने आंदोलन केले. याचे पडसाद बेळगावात उमटले असून कन्नड संघटनांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्यात.
![बेळगावात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन; शिवसेना, कनसे वाद चिघळण्याची शक्यता Protest against Chief Minister Uddhav Thackeray in Belgaum बेळगावात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन; शिवसेना, कनसे वाद चिघळण्याची शक्यता](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/12/28195924/uddhav-putala.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बेळगाव : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर शिवसैनिकांनी कन्नड ध्वजाचे दहन केल्याचे पडसाद बेळगावात उमटले. दोन दिवसांपूर्वी भीमाशंकर पाटील या कन्नड संघटनेच्या पदाधिकाऱ्याने समिती नेत्याविषयी वक्तव्य केले होते. त्याचा निषेध म्हणून शिवसैनिकांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर शनिवारी आंदोलन केले. त्याची बातमी बेळगावात पोचल्यावर कन्नड संघटनांनी एकत्र येऊन सर्किट हाऊस परिसरात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
बेळगाव दौऱ्यावर आलेले निजद नेते आणि माजी मंत्री बसवराज होरट्टी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नव्हे तर उपदव्यापी ठाकरे अशी टीका कर्नाटकचे माजी मंत्री आणि निजद नेते बसवराज होरट्टी यांनी केली आहे. सीमाप्रश्नाच्या बाबतीत महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकने एक पाऊल पुढे टाकले पाहिजे, असेही होरट्टी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
बेळगावात म्हादइ बाबत आंदोलन करण्यासाठी सभा घेण्यासाठी बेळगावात आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. बेळगावचे खासदार स्वतःच्या स्वार्थासाठी सीमाप्रश्नाबाबत बोलत नाहीत. म्हादइ असो किंवा सीमाप्रश्न या बाबत राज्याच्या हितासाठी सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र यायला पाहिजे. सीमाप्रश्नाच्या बाबत दोन मंत्री नेमून सरकारने योग्य ती पावले उचलायला पाहिजेत. मी भाजपात जाणार म्हणून चार वर्षे झाली चर्चा सुरू आहे. येडीयुरप्पा यांनी दोन वेळा भाजपात येण्याचे आमंत्रण दिले होते पण मी निजद सोडून कुठे जाणार नाही, असेही होरट्टी म्हणाले.
शिवसेना खासदार धैर्यशील माने यांचा इशारा -
महाराष्ट्र एकीकरण समितीमधील एकाही कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर गाठ शिवसेनेशी आहे. असा इशारा शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी कर्नाटक नवनिर्माण सेनेला दिला आहे. तसेच, या मुद्द्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेऊन पुढील भूमिका ठरवणार असल्याचंही धैर्यशील मानेंनी म्हटलं आहे. तसेच या विकृत संघटनेवर बंदीची घालण्याचीही मागणी धैर्यशील माने यांनी केली आहे.
हेही वाचा - महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का लागला तर गाठ शिवसेनेशी : धैर्यशील माने
Dhairyasheel Mane | शिवसेना खासदार धैर्यशिल मानेंचा कर्नाटक नवनिर्माण सेनेला इशारा | ABP Majha
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion