एक्स्प्लोर

केंद्राच्या कृषी कायद्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध म्हणजे 'नौटंकी' आणि 'तमाशा' : प्रकाश आंबेडकर

केंद्राच्या सध्याच्या शेतकरी कायद्यांची मुळं काँग्रेसनं 2006 मध्ये आणलेल्या 'करार शेती कायद्या'त असल्याचं असल्याचं मत आंबेडकरांनी व्यक्त केलं आहे.

अकोला : नवी दिल्लीतील शेतकरी आंदोलनात झालेल्या हिंसेवर देशभरात केंद्र आणि भाजपवर टीका होत आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर टीका करतांनाच काँग्रेस-राष्ट्रवादीवर गंभीर आरोप लावले आहेत. केंद्राच्या शेतकरी कायद्यांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध म्हणजे निव्वळ 'नौटंकी' आणि 'तमाशा' असल्याची बोचरी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते अकोला येथे बोलत होते.

केंद्राच्या सध्याच्या शेतकरी कायद्यांची मुळं काँग्रेसनं 2006 मध्ये आणलेल्या 'करार शेती कायद्या'त असल्याचं असल्याचं मत आंबेडकरांनी व्यक्त केलं आहे. केंद्रानं आणलेले कायदे काँग्रेस-राष्ट्रवादीच्याच विचारांचं रूप आहे. त्यामुळे आजच्या परिस्थितीला भाजप-संघापेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच अधिक जबाबदार असल्याचा टोला यावेळी आंबेडकरांनी लगावलाय. सध्याच्या कायद्यांना असलेला विरोध आजच्या दिल्लीतील घटनेमुळे काँग्रेसला मोडून तर काढायचा नाही ना?, असा उलट सवाल आंबेडकरांनी काँग्रेसला केला आहे. त्यामुळेच काँग्रेस-राष्ट्रवादी ही संघ-भाजपाची 'बी टीम' तर नाही ना?, असा तिरकस सवालही यावेळी प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला आहे.

...तर ही 'वेळ' आली नसती : प्रकाश आंबेडकर

संसदेमध्ये शहाणपण-समंजसपणा चालतो, दादागिरी चालत नाही. सुदृढ लोकशाहीसाठी बहुमत असलं तरी दादागिरी चालताही कामा नये, असं आंबेडकर म्हणालेत. या विधेयकासंदर्भात कायदा करण्याआधी देशव्यापी चर्चा केंद्र सरकारला घडवून आणता आली असती. या चर्चेवरूनच संसदीय समिती आणि त्यानंतर सरकारला हे विधेयक आणि त्यानंतरचा कायदा हवा की नको?, हा निर्णय घेता आला असता. यामूळे देश ज्या परिस्थितीतून आज जात आहे, ती वेळ देशावर आली नसती असं आंबेडकर म्हणालेत. मात्र, भाजपला पतपुरवठा करणाऱ्या काही भांडवलदार घराण्यांना फायदा पोहोचविण्यासाठीच सरकारनं या कायद्याद्वारे त्यांच्यााठी फायदेशीर तरतुदी केल्याचा गंभीर आरोप यावेळी आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे.

 कायद्यासंदर्भातील प्रश्नांची उत्तर द्यायला सरकार का घाबरते? : प्रकाश आंबेडकर

केंद्राच्या या तिन्ही कायद्यासंदर्भात शेतकऱ्यांना ज्या प्रमुख बाबींवर आक्षेप आणि असंतोष आहे त्यावर केंद्र सरकार भूमिका का स्पष्ट करीत नाही?, असा सवाल यावेळी आंबेडकरांनी केंद्राला केला आहे. किमान आधारभूत मुल्य, बाजार समित्यांची व्यवस्था मोडीत निघणार का?, करार शेतीबद्दल शेतकऱ्यांच्या मनात असलेले प्रश्न आणि कायद्यामुळे अन्न सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल का?, यावर सरकार ठोस भूमिका मांडत नसल्यानेच हा प्रश्न चिघळल्याचा आरोप यावेळी आंबेडकरांनी केला आहे. यातून आज झालेला हिंसाचार आणि शेतकर्यांनी लाल किल्ल्यावर मांडलेलं ठाण यावर आंबेडकरांनी चिंता व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार

व्हिडीओ

Sanjay Raut vs Navnath Ban : राऊतांची कारकीर्द काळवंडलेली,नवनाथ बन यांचा राऊतांवर हल्लाबोल
Imtiaz Jaleel Sambhajinagar डान्सबारमध्ये लोकं नोटा उधळतात, मी ते करत नाही; नोटा उधळण थांबवणार नाही
Vinayak Raut On Kalyan Dombivli : विनायक राऊत यांनी नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवल्याची प्राथमिक माहिती
Nandurbar Kalicharan Maharaj : राजकारणी हिंदूवादी नाहीत ते मुस्लिमांसमोर कुत्र्यासारखी शेपूट हलवतात
Satej patil On Shivsena : कोल्हापुरात काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येण्याची शक्यता

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
DGP अधिकाऱ्याचा कथित व्हिडिओ व्हायरल, ऑफिसमध्ये अश्लील चाळे; मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश
DGP अधिकाऱ्याचा कथित व्हिडिओ व्हायरल, ऑफिसमध्ये अश्लील चाळे; मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश
मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी
मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी
कर्नल सोफिया अपमान प्रकरणात मध्य प्रदेशच्या मंत्र्याला 'सर्वोच्च' फटकार; 'माफी मागण्यास उशीर झाला' दोन आठवड्यांत खटला चालवण्यास मंजुरी देण्याचे राज्य सरकारला निर्देश
कर्नल सोफिया अपमान प्रकरणात मध्य प्रदेशच्या मंत्र्याला 'सर्वोच्च' फटकार; 'माफी मागण्यास उशीर झाला' दोन आठवड्यांत खटला चालवण्यास मंजुरी देण्याचे राज्य सरकारला निर्देश
Eknath Shinde VIDEO : बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदे म्हणाले, ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते!
बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदे म्हणाले, ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते!
Embed widget