एक्स्प्लोर

केंद्राच्या कृषी कायद्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध म्हणजे 'नौटंकी' आणि 'तमाशा' : प्रकाश आंबेडकर

केंद्राच्या सध्याच्या शेतकरी कायद्यांची मुळं काँग्रेसनं 2006 मध्ये आणलेल्या 'करार शेती कायद्या'त असल्याचं असल्याचं मत आंबेडकरांनी व्यक्त केलं आहे.

अकोला : नवी दिल्लीतील शेतकरी आंदोलनात झालेल्या हिंसेवर देशभरात केंद्र आणि भाजपवर टीका होत आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर टीका करतांनाच काँग्रेस-राष्ट्रवादीवर गंभीर आरोप लावले आहेत. केंद्राच्या शेतकरी कायद्यांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध म्हणजे निव्वळ 'नौटंकी' आणि 'तमाशा' असल्याची बोचरी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते अकोला येथे बोलत होते.

केंद्राच्या सध्याच्या शेतकरी कायद्यांची मुळं काँग्रेसनं 2006 मध्ये आणलेल्या 'करार शेती कायद्या'त असल्याचं असल्याचं मत आंबेडकरांनी व्यक्त केलं आहे. केंद्रानं आणलेले कायदे काँग्रेस-राष्ट्रवादीच्याच विचारांचं रूप आहे. त्यामुळे आजच्या परिस्थितीला भाजप-संघापेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच अधिक जबाबदार असल्याचा टोला यावेळी आंबेडकरांनी लगावलाय. सध्याच्या कायद्यांना असलेला विरोध आजच्या दिल्लीतील घटनेमुळे काँग्रेसला मोडून तर काढायचा नाही ना?, असा उलट सवाल आंबेडकरांनी काँग्रेसला केला आहे. त्यामुळेच काँग्रेस-राष्ट्रवादी ही संघ-भाजपाची 'बी टीम' तर नाही ना?, असा तिरकस सवालही यावेळी प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला आहे.

...तर ही 'वेळ' आली नसती : प्रकाश आंबेडकर

संसदेमध्ये शहाणपण-समंजसपणा चालतो, दादागिरी चालत नाही. सुदृढ लोकशाहीसाठी बहुमत असलं तरी दादागिरी चालताही कामा नये, असं आंबेडकर म्हणालेत. या विधेयकासंदर्भात कायदा करण्याआधी देशव्यापी चर्चा केंद्र सरकारला घडवून आणता आली असती. या चर्चेवरूनच संसदीय समिती आणि त्यानंतर सरकारला हे विधेयक आणि त्यानंतरचा कायदा हवा की नको?, हा निर्णय घेता आला असता. यामूळे देश ज्या परिस्थितीतून आज जात आहे, ती वेळ देशावर आली नसती असं आंबेडकर म्हणालेत. मात्र, भाजपला पतपुरवठा करणाऱ्या काही भांडवलदार घराण्यांना फायदा पोहोचविण्यासाठीच सरकारनं या कायद्याद्वारे त्यांच्यााठी फायदेशीर तरतुदी केल्याचा गंभीर आरोप यावेळी आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे.

 कायद्यासंदर्भातील प्रश्नांची उत्तर द्यायला सरकार का घाबरते? : प्रकाश आंबेडकर

केंद्राच्या या तिन्ही कायद्यासंदर्भात शेतकऱ्यांना ज्या प्रमुख बाबींवर आक्षेप आणि असंतोष आहे त्यावर केंद्र सरकार भूमिका का स्पष्ट करीत नाही?, असा सवाल यावेळी आंबेडकरांनी केंद्राला केला आहे. किमान आधारभूत मुल्य, बाजार समित्यांची व्यवस्था मोडीत निघणार का?, करार शेतीबद्दल शेतकऱ्यांच्या मनात असलेले प्रश्न आणि कायद्यामुळे अन्न सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल का?, यावर सरकार ठोस भूमिका मांडत नसल्यानेच हा प्रश्न चिघळल्याचा आरोप यावेळी आंबेडकरांनी केला आहे. यातून आज झालेला हिंसाचार आणि शेतकर्यांनी लाल किल्ल्यावर मांडलेलं ठाण यावर आंबेडकरांनी चिंता व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 जून 2026 | गुरुवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 जून 2026 | गुरुवार
Mumbai Goa Highway : 31 मे ची डेडलाईन देऊन गडकरी फसले! मुंबई-गोवा महामार्गाचं काम अजूनही अपूर्णच; टोल वसुलीमुळे कोकणवासीयांचा संताप उफाळला
31 मे ची डेडलाईन देऊन गडकरी फसले! मुंबई-गोवा महामार्गाचं काम अजूनही अपूर्णच; टोल वसुलीमुळे कोकणवासीयांचा संताप उफाळला
Prashant jagtap : शरद पवार गटाने काँग्रेसचा विश्वासघात केला; श्रीकांत पाटलांच्या माघारीनंतर पुणे काँग्रेसच्या शहराध्यक्षांचा गंभीर आरोप
शरद पवार गटाने काँग्रेसचा विश्वासघात केला; श्रीकांत पाटलांच्या माघारीनंतर पुणे काँग्रेसच्या शहराध्यक्षांचा गंभीर आरोप
Maharashtra Live News Updates: विधान परिषद निवडणुकीचे अर्ज मागे घेण्याची मुदत संपली
Maharashtra Live News Updates: विधान परिषद निवडणुकीचे अर्ज मागे घेण्याची मुदत संपली

व्हिडीओ

Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report
MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
Nitesh Rane on Vidhan Parishad : ठाकरेंचा उमेदवार फोडला की फुटला?नितेश राणे म्हणाले...
Bal Mane Konkan Vidhan Parishad Election 2026: ठाकरेंनी विश्वास दाखवला, राणेंनी उमेदवार फोडला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
Ulhasnagar : उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Bala Mane : ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
Congress Rajya Sabha List: भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
Virat Kohli: 'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
KS Bharat: वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
Embed widget