एक्स्प्लोर

केंद्राच्या कृषी कायद्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध म्हणजे 'नौटंकी' आणि 'तमाशा' : प्रकाश आंबेडकर

केंद्राच्या सध्याच्या शेतकरी कायद्यांची मुळं काँग्रेसनं 2006 मध्ये आणलेल्या 'करार शेती कायद्या'त असल्याचं असल्याचं मत आंबेडकरांनी व्यक्त केलं आहे.

अकोला : नवी दिल्लीतील शेतकरी आंदोलनात झालेल्या हिंसेवर देशभरात केंद्र आणि भाजपवर टीका होत आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर टीका करतांनाच काँग्रेस-राष्ट्रवादीवर गंभीर आरोप लावले आहेत. केंद्राच्या शेतकरी कायद्यांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध म्हणजे निव्वळ 'नौटंकी' आणि 'तमाशा' असल्याची बोचरी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते अकोला येथे बोलत होते.

केंद्राच्या सध्याच्या शेतकरी कायद्यांची मुळं काँग्रेसनं 2006 मध्ये आणलेल्या 'करार शेती कायद्या'त असल्याचं असल्याचं मत आंबेडकरांनी व्यक्त केलं आहे. केंद्रानं आणलेले कायदे काँग्रेस-राष्ट्रवादीच्याच विचारांचं रूप आहे. त्यामुळे आजच्या परिस्थितीला भाजप-संघापेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच अधिक जबाबदार असल्याचा टोला यावेळी आंबेडकरांनी लगावलाय. सध्याच्या कायद्यांना असलेला विरोध आजच्या दिल्लीतील घटनेमुळे काँग्रेसला मोडून तर काढायचा नाही ना?, असा उलट सवाल आंबेडकरांनी काँग्रेसला केला आहे. त्यामुळेच काँग्रेस-राष्ट्रवादी ही संघ-भाजपाची 'बी टीम' तर नाही ना?, असा तिरकस सवालही यावेळी प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला आहे.

...तर ही 'वेळ' आली नसती : प्रकाश आंबेडकर

संसदेमध्ये शहाणपण-समंजसपणा चालतो, दादागिरी चालत नाही. सुदृढ लोकशाहीसाठी बहुमत असलं तरी दादागिरी चालताही कामा नये, असं आंबेडकर म्हणालेत. या विधेयकासंदर्भात कायदा करण्याआधी देशव्यापी चर्चा केंद्र सरकारला घडवून आणता आली असती. या चर्चेवरूनच संसदीय समिती आणि त्यानंतर सरकारला हे विधेयक आणि त्यानंतरचा कायदा हवा की नको?, हा निर्णय घेता आला असता. यामूळे देश ज्या परिस्थितीतून आज जात आहे, ती वेळ देशावर आली नसती असं आंबेडकर म्हणालेत. मात्र, भाजपला पतपुरवठा करणाऱ्या काही भांडवलदार घराण्यांना फायदा पोहोचविण्यासाठीच सरकारनं या कायद्याद्वारे त्यांच्यााठी फायदेशीर तरतुदी केल्याचा गंभीर आरोप यावेळी आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे.

 कायद्यासंदर्भातील प्रश्नांची उत्तर द्यायला सरकार का घाबरते? : प्रकाश आंबेडकर

केंद्राच्या या तिन्ही कायद्यासंदर्भात शेतकऱ्यांना ज्या प्रमुख बाबींवर आक्षेप आणि असंतोष आहे त्यावर केंद्र सरकार भूमिका का स्पष्ट करीत नाही?, असा सवाल यावेळी आंबेडकरांनी केंद्राला केला आहे. किमान आधारभूत मुल्य, बाजार समित्यांची व्यवस्था मोडीत निघणार का?, करार शेतीबद्दल शेतकऱ्यांच्या मनात असलेले प्रश्न आणि कायद्यामुळे अन्न सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल का?, यावर सरकार ठोस भूमिका मांडत नसल्यानेच हा प्रश्न चिघळल्याचा आरोप यावेळी आंबेडकरांनी केला आहे. यातून आज झालेला हिंसाचार आणि शेतकर्यांनी लाल किल्ल्यावर मांडलेलं ठाण यावर आंबेडकरांनी चिंता व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget