एक्स्प्लोर

मराठा आरक्षणासाठी सरकार कुणबी नोंदीचा सांगत असलेला 54 लाखांचा आकडा फसवा : प्रकाश आंबेडकर

गरीब मराठ्यांचा नवीन वर्ग उभा करायचा आहे.त्यामूळे जरांगेंनी लोकसभेच्या रिंगणात उतरून भूमिका घ्यावी. 35 वर्षांपासून सुरू असलेल्या गरीब मराठ्यांच्या लढ्याला श्रीमंत मराठ्यांनी आकार, स्वरूप येवू दिलं नाही.

अकोला : मराठा आरक्षणासाठी (Maratha Aarakshan) सरकार कुणबी नोंदीचा (Maratha Reservation ) सांगत असलेला 54 लाखांचा आकडा फसवा असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे. ते अकोला येथे पत्रकार परिषदेत बोलत होतेय.  सरकारला दंगली भडकवायच्या असल्याचा आरोप यावेळी आंबेडकरांनी केलाय. दरम्यान, मनोज जरांगेंनी (Manoj Jarange Patil ) आगामी लोकसभा किंवा विधानसभा लढवण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलंय. 

समाजात दंगली पेटवण्याचा अजेंडा -

मनोज जरांगे यांच्यासारखं गरीब मराठ्यांचं नेतृत्व उभे राहलं. मनोज जरांगेंच्या नेतृत्वामुळे श्रीमंत मराठा हादरला आहे. त्यामुळे मनोज जरांगेंचे आंदोलन दडपण्यासाठी सरकारवर दबाव आहे. सरकारकडून सांगण्यात येणारे आकडे फसवे आहेत. दोन समाजात दंगली पेटवण्याचा अजेंडा  राबवण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. ओबीसींना उचकवण्याचं सरकारचे प्रयत्न आहेत, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. 

मराठ्यांनी जरांगेंच्या मागे उभं राहावं -

मनोज जरांगेंच्या पाठीमागे गरीब मराठ्यांनी पूर्णपणे उभं राहावं. मुंबईतील आंदोलनात गरीब मराठ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं. जरांगे पाटलांना झुरवण्याचं काम सुरू आहे. आगामी निवडणुकींमुळे सरकारचा हात दगडाखाली असल्याचं जरांगेंनी लक्षात घ्यावं. जरांगेंनी येणाऱ्या लोकसभेत कुणाला पाठिंबा देण्याची भूमिका घेवू नये. जरांगेंनी राजकीय भूमिका घ्यावी, असे प्रकाश आंबेकर म्हणाले. 

जरांगेंनी निवडणुकीच्या रिंगणात उतरावे - 

गरीब मराठ्यांचा नवीन वर्ग उभा करायचा आहे.त्यामूळे जरांगेंनी लोकसभेच्या रिंगणात उतरून भूमिका घ्यावी. 35 वर्षांपासून सुरू असलेल्या गरीब मराठ्यांच्या लढ्याला श्रीमंत मराठ्यांनी आकार, स्वरूप येवू दिलं नाही. जरांगेंच्या आंदोलनाच्या रुपाने त्याला एक स्वरूप आलं, आकार आला आणि एक महत्त्वाची मागणी समोर आली. ज्याला समाजात सहानूभुती आहे, प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

आरक्षणाचं वेगळं ताट निर्माण करायचं असल्यास जरांगेंनी आंदोलनाबरोबर राजकीय भूमिका घेतली पाहिजे. लोकसभेच्या संदर्भातील भूमिका जरांगेंनी घेतली पाहिजे.
गरीब मराठ्यांचा आवाज लोकसभेत जाण्यासाठी जरांगेंनी भूमिका घ्यावी. आंदोलन सुरू असतांना राजकीय भूमिकेवर जरांगे गांभीर्याने विचार करतील अशी अपेक्षा आहे, असेही आंबेडकर म्हणाले.  

मराठ्यांच्या आंदोलनाला वंचितचा पाठिंबा - 

मुंबईतील गरीब मराठ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे. गरिब मराठ्यांनी जरांगेंच्या पाठीमागे मोठ्या ताकदीने उभं राहावं अन्यथा इथला श्रीमंत मराठा (निजामी) झुकणार नाही हे लक्षात घ्यावं, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

जरांगे पाटलांनी ताकद निर्माण केली आहे, त्यामुळे ते ताकदीच्या जोरावर संसदेत पोहचू शकतात याची आम्हाला खात्री आहे. संसदेत गेल्यानंतर तुमच्या प्रश्नांचा निकाल लावता येतो.निजामी मराठा हा सल्ला जरांगेंना देणार नाहीत.दोन तीन महिन्यांत लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. तो कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर गरीब मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही, पुढील पाच वर्ष हे आंदोलन जिरवू शकतो अशी भूमिका निजामी मराठ्यांची आहे, असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. 

 इंडिया आघाडीवर काय म्हणाले आंबेडकर ?
राज्यात सुरू असलेली ठेकेदारी पद्धत बंद व्हावी. मतांच्या ध्रुवीकरणाचा मी कधी विचार करत नाही, ज्या प्रश्नांसाठी लढतोय ते सोडवण्यासाठी संसदेत कसं पोहचायला हवे याकडे बघतो.इंडिया आघाडीतील बोलनी अद्याप पुढे सरकली नाहीत. वर्षभरापूर्वी जिथे होतो तिथेच थांबलेलं आहे. इंडिया आघाडीत जाण्यासाठी शेवटपर्यंत वाट पाहणार, असेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget