एक्स्प्लोर

परमबीर सिंह यांचा लेटर बाँम्ब! जाणून घ्या या प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं...

परमबीर सिंह यांच्या पत्रानंतर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. अनिल देशमुखांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपनं केली आहे तर देशमुखांची चौकशी व्हावी असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. तर हे केवळ आकसापोटी केलं जात असल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांचं म्हणणं आहे. 

मुंबई :  मुंबईच्या माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली, असा दावा परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. या पत्रानंतर अनिल देशमुख यांनीही एक पत्रक काढत आपली बाजू मांडली असून आरोप सिद्ध करावेत अन्यथा परमबीर सिंह यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं म्हटलं आहे.  या पत्रानंतर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. अनिल देशमुखांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपनं केली आहे तर देशमुखांची चौकशी व्हावी असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. तर हे केवळ आकसापोटी केलं जात असल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांचं म्हणणं आहे. 

परमबीर सिंहांनी काय लिहिलंय पत्रात

दोन दिवसांपूर्वी लोकमत आणि एबीपी माझाच्या मुलाखतीत गृहमंत्र्यांना मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांगडी का केली असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी अनिल देशमुख म्हणाले होते की, "परमबीर सिंह यांची बदली रुटीन नव्हती. एनआयएच्या तपासात काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या. पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांकडून काही अक्षम्य चुका झाल्या ज्या माफ करण्यासारख्या नव्हत्या."  याच मुलाखतीचा उल्लेख करत परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. पत्रात परमबीर सिंह यांनी म्हटलं आहे की, "सचिन वाझे यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या सरकारी बंगल्यावर गेल्या काही महिन्यात फंड जमा करण्यासाठी अनेकदा बोलावलं होतं. फेब्रुवारीच्या दरम्यान या भेटी झाल्या. अशा भेटीदरम्यान अनेकद एक-दोन स्टाफ मेंबर आणि देशमुख यांचे स्वीय सहाय्यक पालांडे देखील तिथे उपस्थित होते. गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी रुपये जमा करण्याचं टार्गेट दिलं होतं. टार्गेट पूर्ण करण्यासाठी जवळपास 1 हजार 750 बार, रेस्टॉरंट आणि मुंबईतील काही बाबींचा समावेश होता. ज्यातून प्रत्येकाकडून 2-3 लाख रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते. म्हणजेच महिन्याकाठी 40-50 कोटी रुपये जमा होतील. उर्वरित पैसे हे इतर बाबीतून मिळवता येतील, असं म्हणता येईल." परमबीर सिंह यांनी आपल्या पत्रात दादरा नगर हवेलीची खासदार मोहल डेलकर आत्महत्या प्रकरणात अनिल देशमुख यांनी दबाव टाकल्याचाही उल्लेख केला आहे. परमबीर सिंह यांच्या मते, 22 फेब्रुवारीला जेव्हा मुंबईतील हॉटेलमध्ये मोहन डेलकर यांच्या मृतदेहासह सुसाईड नोटही मिळाली. या नोटमध्ये कीही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कंटाळून आत्महत्या केल्याचं डेलकर यांनी म्हटलं आहे. परंतु अनिल देशमुख सातत्याने आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यासाठी मुंबई पोलिसांवर दबाव टाकत होते.

परमबीर सिंह यांनी आरोप सिद्ध करावेत, मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार : गृहमंत्री

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे आरोप फेटाळले आहेत. दरम्यान, आता एक प्रसिद्ध पत्रका जारी करुन परमबीर सिंह यांनी हे आरोप सिद्ध करावे अन्यथा अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचा इशारा देशमुख यांनी दिलाय. परमबीर सिंह यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून स्वतःचा बचाव करण्यासाठी मला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेले हे षडयंत्र आहे. पुढील महत्त्वाच्या गोष्टींवर मी आपले लक्ष वेधू इच्छितो त्यावरून परमबीर सिंह हे कसे खोटे बोलत आहेत, ही बाब आपल्या लक्षात येईल.  सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर परमबीर सिंह एवढे दिवस शांत का बसले होते? त्याचवेळी त्यांनी आपले तोंड का उघडले नाही? आपणास उद्या म्हणजे दिनांक 17 मार्च रोजी पोलीस आयुक्त पदावरून हटविण्यात येणार आहे हे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंह यांनी दिनांक 16 मार्चला एसीपी पाटील यांना व्हॉटसअप चॅटवरून काही प्रश्न विचारले आणि त्यांना अपेक्षित असलेली उत्तरे मिळविली. हा परमबीर सिंह यांच्या मोठ्या कटाचा भाग होता. या चॅटच्या माध्यमातून परमबीर सिंह यांना पध्दतशीरपणे पुरावे जमा करायचे होते. या चॅटवरून उत्तरे मिळविताना परमबीर सिंह किती अधीर झाले होते हे त्यांच्या चॅटवरून आपल्या लक्षात येईल. परमबीर सिंह हे एसीपी पाटील यांच्याकडून वारंवार वदवून घेत आहेत. याचा अर्थ काय? 18 मार्च रोजी मी लोकमतच्या कार्यक्रमामध्ये परमबीर सिंह यांच्याविरुद्ध काही गंभीर स्वरूपाच्या बाबी पुढे आल्यामुळे त्यांना पदावरून हटविले असल्याचे म्हटल्यानंतर परमबीर सिंह यांनी स्वतःला वाचविण्याच्या दृष्टीने 19 मार्च रोजी पुन्हा व्हाट्सअप वर संभाषणाचे पुरावे तयार करण्याचा प्रयत्न केला.पोलीस खात्यातील सर्वांना माहीत आहे की सचिन वाझे व एसीपी संजय पाटील हे परमबीर सिंह यांच्या अत्यंत जवळचे आहेत. 16 वर्षे निलंबित असलेल्या वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय परमवीर सिंह यांनी स्वतःच्या अधिकारात घेतला. परमबीर सिंह यांचे आरोप धादांत खोटे आहेत त्यांनी आपले आरोप सिद्ध करावेत. मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करीत आहे. स्वतःला वाचविण्यासाठी परमबीर सिंह यांनी हे खोटे आरोप केले आहेत.सचिन वाझे यांनी जर फेब्रुवारीमध्ये परमबीर सिंह यांना भेटून हे सर्व सांगितल्याचे परमबीर सिंह म्हणतात तर त्याचवेळी त्यांनी का सांगितले नाही. एवढे दिवस शांत का होते? विस्फोटक प्रकरणात आपण अडचणीत येऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंह यांनी असे खोटे आरोप करून सरकारला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आहे.स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरण यांचा संशयास्पद मृत्यू या गंभीर प्रकरणाचा तपास भरकटविण्यासाठी परमबीर सिंह यांनी रचलेले हे षडयंत्र आहे  मुख्यमंत्री यांनी परमबीर सिंह यांच्या आरोपाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणीही अनिल देशमुख यांनी केली आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्टीकरण

दरम्यान परमबीर सिंह यांच्या पत्राबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मुख्यमंत्री कार्यालयानं पत्राबाबत म्हटलं आहे की, गृहरक्षक दलाचे कमांडट जनरल परम बीर सिंग यांच्या नावाने मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकृत इमेलवर आज (20 मार्च) दुपारी 4.37 वाजता पत्र प्राप्त झाले आहे. paramirs3@gmail.com या ईमेल पत्त्यावरून परम बीर सिंग असे केवळ नाव लिहिलेले व स्वाक्षरी नसलेल्या या पत्राचा ईमेल पत्ता तपासून घेण्यात येत आहे , त्याचप्रमाणे परम बीर सिंग यांना गृहविभागामार्फत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वास्तविक पाहता परम बीर सिंग यांनी अधिकृतरीत्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या यादीसाठी दिलेला वैयक्तिक ईमेल पत्ता parimbirs@hotmail.com असा आहे त्यामुळे आज प्राप्त झालेला ईमेल तपासून घेणे आवश्यक आहे असे मुख्यमंत्री कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात आलं आहे. 

मुख्यमंत्री कारवाई करत नसतील तर हे गंभीर - देवेंद्र फडणवीस
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. परमबीर सिंह यांचे पत्र धक्कादायक आणि खळबळजनक आहे. एका डीजी रँकच्या अधिकाऱ्याने असे पत्र गृहमंत्र्यांबद्दल लिहिण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे फडणवीस म्हणाले. या पत्रासोबत एक चॅटही जोडली असून गृहविभागात नियुक्ती किंवा बदलीबद्दल जे काही घडत होते, त्याचा हा कळस असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली.  मुंबई पोलीस दलाचं खच्चीकरण करणारी, मानहानी करणारी ही घटना आहे. गृहमंत्री पदावर राहिल्यानंतर याची चौकशी कशी होईल? कोणी छोट्या मोठ्या व्यक्तीने लावलेला आरोप नाही. एका डीजी रँकच्या अधिकाऱ्यांनी आरोप केला आहे. पुरावा म्हणून चॅटही सोबत जोडलेलं आहे, तो पुरावाच आहे. परमबीर सिंह यांनी लक्षात आणून दिल्यानंतरही जर मुख्यमंत्री कारवाई करत नसतील तर हे गंभीर आहे. आपलं सरकार वाचवण्यासाठी त्यानी दुर्लक्ष केलं असल्याची गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

राज ठाकरेंकडून उच्चस्तरीय चौकशीची मागणी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सदर प्रकरणी ट्विट करत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली. ही घटना पाहता महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमाच लागला आहे, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. 'मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र अत्यंत धक्कदायक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे. गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा आणि ह्या प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशी देखील व्हायला हवी', असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं.  राज ठाकरे यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासमवेत या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचीही मागणी केली आहे.

काय म्हणाले राष्ट्रवादीचे नेते

परमबीर सिंह यांचे पत्र म्हणजे सचिन वाझे आणि मनसुख हिरण प्रकणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जी कडक भूमिका घेतली त्यावर आलेली प्रतिक्रिया असल्याचे राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले. तर हसन मुश्रीफ म्हणाले की, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप खोटे आहेत. परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाऊन आले आणि आज हे पत्र समोर आलं. त्यामुळे संशय बळावला आहे. वाझे प्रकरणात परमबीर यांना माफीचा साक्षीदार करण्याचा यांचा प्रयत्न आहे. डेलकर प्रकरण समोर आणलं त्यानंतर मुद्दाम भाजपने हे कारस्थान केलंय. संपूर्ण चौकशी झाल्याशिवाय कोणतीही कारवाई करू नये, अशी प्रतिक्रिया मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलीय.

आकसापोटी आरोप- एकनाथ खडसे

या आरोपांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. खडसे म्हणाले, की या घटनेची बातमी मी काही वेळापूर्वी माध्यमातून पाहिली आहे. त्यामुळे याबाबत आताच अधिक बोलणे उचित होणार नाही. मात्र, याबाबत चौकशी मधून काय तथ्य आहे ते समोर येईलच. एखाद्या पोलीस अधिकाऱ्याची आक्षेपानंतर बदली केली जात असेल आणि त्यानंतर जर असे आरोप पोलीस अधिकाऱ्याकडून होत असतील तर ते आकसापोटीही असू शकतात. याबाबत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री काय तो खुलासा करतील. मला अजून जास्तीची माहिती नाही, माहिती होईपर्यंत अधिक बोलणे उचित होणार नाही, अशा प्रकारची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

डेलकर प्रकरण दाबण्यासाठी हे कुभांड रचलं गेलंय; सचिन सावंत यांचा आरोप

या आरोपानंतर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातही विनोद राय प्रवृत्तीचे लोक प्रशासनात आहेत. सत्यपाल सिंह आघाडी सरकारला कळले नाही. जे पत्र दिसत आहे, त्यामध्ये पश्चात बुध्दी दिसत आहे. जे संभाषण आज दाखवले जात आहे ते वर्षभरापूर्वीच झाले असते. अँटीलिया प्रकरण झाल्यानंतर कोणीही सामान्य बुद्धीचा व्यक्ती ही असे करणार नाही, असे सचिन सावंत यांनी म्हटलंय. जे खंडणीचे आरोप सांगितले जात आहेत ते भाजपाने आधीच कसे केले? सुशांत सिंह राजपूत याची केस पटणा येथे नोंदवली जाऊ शकते तर मोहन देलकर यांची मुंबईत आत्महत्या झाली तिथे का नाही? जीथे गुन्हा घडला तिथेच CRPC प्रमाणे तपास होतो. SMS हे स्वतःला वाचवण्यासाठी दिसत असल्याचेही सावंत म्हणाले. अगोदर काही अधिकारी दिल्लीच्या दबावात आहेत, असे गृहमंत्र्यांनी महिनाभरापूर्वी सांगितले होते. केंद्रीय यंत्रणांच्या दबावाखाली अधिकाऱ्यांना आणून भाजपने मविआ सरकारविरोधात अत्यंत कुटील षडयंत्र केलेलं दिसत आहे. भाजप नेत्यांना माहिती आधीच मिळते व ज्या सुसुत्रपणे ते प्रतिक्रिया लागलीच देतात त्यातून हे स्पष्ट होत असल्याचाही दावा सावंत यांनी केलाय. जी तत्परता अंबानी प्रकरणात केंद्राने दाखवली ती देलकर प्रकरणात का नाही? डेलकर यांनी मोदी शाह यांना पत्र लिहून व्यथा मांडली. पण त्याकडे लक्ष दिले नाही. त्यांनी राजीनामा दिला का? डेलकर प्रकरणात भाजपचे हात अडकले असून हे दाबण्यासाठी कुभांड रचलं गेले आहे हे पत्रातून स्पष्ट होत असल्याचा आरोप सचिन सांवत यांनी केलाय.


    

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime: बीड हादरले! भावकीतील लोकं घरात घुसले, बापासह पोरांना बेदम मारहाण, मुलीला विष पाजलं, बेशुद्ध अवस्थेत टाकून फरार
बीड हादरले! भावकीतील लोकं घरात घुसले, बापासह पोरांना बेदम मारहाण, मुलीला विष पाजलं, बेशुद्ध अवस्थेत टाकून फरार
Kolhapur News: कोल्हापुरात महिलेशी वादातून भररस्त्यात कोयता नाचवला अन् पोलिसांनी तिथंच नेत गुडघ्यावर वाकवत मस्ती जिरवली
कोल्हापुरात महिलेशी वादातून भररस्त्यात कोयता नाचवला अन् पोलिसांनी तिथंच नेत गुडघ्यावर वाकवत मस्ती जिरवली
IND vs AUS Semi Final Mumbai Weather : मुंबईतील पावसामुळे टीम इंडियाचं विश्वचषकाचं स्वप्न भंगणार, ऑस्ट्रेलियाविरुद्धची सेमी फायनल ड्रॉ झाल्यास सगळं संपणार, काय आहे समीकरण?
मुंबईतील पावसामुळे टीम इंडियाचं विश्वचषकाचं स्वप्न भंगणार, ऑस्ट्रेलियाविरुद्धची सेमी फायनल ड्रॉ झाल्यास सगळं संपणार, काय आहे समीकरण?
Bachchu Kadu: श्रीमंत अन् सरकारी नोकरी करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नको, सातबारा कोरा करण्यासाठी बच्चू कडूंचा फॉर्म्युला
श्रीमंत अन् सरकारी नोकरी करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नको, सातबारा कोरा करण्यासाठी बच्चू कडूंचा फॉर्म्युला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bachchu Kadu Nagpur : सरकारसोबत चर्चेसाठी बच्चू कडू मुंबईकडे रवाना, श्रेयवादाची लढाई आडवी येऊ नये
Ranji Trophy 2025: रविंद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड दिग्गज खेळणार, क्रिकेट प्रमेमींची उत्सुकता शिगेला
Infra Update: ठाणेकरांना मोठा दिलासा! आता 15 डब्यांची Local धावणार, Platform 2, 3, 4 होणार मोठे
Pune Land Deal: 'गैरव्यवहाराची चौकशी करा', Ravindra Dhangekar यांची पोलिसात तक्रार
Beed Crime: 'गळ्याला चाकू लावून...'; बीडच्या Wadwani मध्ये लग्नघरावर दरोडा, 11 लाखांचा ऐवज लंपास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime: बीड हादरले! भावकीतील लोकं घरात घुसले, बापासह पोरांना बेदम मारहाण, मुलीला विष पाजलं, बेशुद्ध अवस्थेत टाकून फरार
बीड हादरले! भावकीतील लोकं घरात घुसले, बापासह पोरांना बेदम मारहाण, मुलीला विष पाजलं, बेशुद्ध अवस्थेत टाकून फरार
Kolhapur News: कोल्हापुरात महिलेशी वादातून भररस्त्यात कोयता नाचवला अन् पोलिसांनी तिथंच नेत गुडघ्यावर वाकवत मस्ती जिरवली
कोल्हापुरात महिलेशी वादातून भररस्त्यात कोयता नाचवला अन् पोलिसांनी तिथंच नेत गुडघ्यावर वाकवत मस्ती जिरवली
IND vs AUS Semi Final Mumbai Weather : मुंबईतील पावसामुळे टीम इंडियाचं विश्वचषकाचं स्वप्न भंगणार, ऑस्ट्रेलियाविरुद्धची सेमी फायनल ड्रॉ झाल्यास सगळं संपणार, काय आहे समीकरण?
मुंबईतील पावसामुळे टीम इंडियाचं विश्वचषकाचं स्वप्न भंगणार, ऑस्ट्रेलियाविरुद्धची सेमी फायनल ड्रॉ झाल्यास सगळं संपणार, काय आहे समीकरण?
Bachchu Kadu: श्रीमंत अन् सरकारी नोकरी करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नको, सातबारा कोरा करण्यासाठी बच्चू कडूंचा फॉर्म्युला
श्रीमंत अन् सरकारी नोकरी करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नको, सातबारा कोरा करण्यासाठी बच्चू कडूंचा फॉर्म्युला
Pune Jain Boarding: गोखले बिल्डर्सने व्यवहार रद्द केला पण धंगेकर पिच्छा सोडेनात, जैन बोर्डिंग डीलप्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार देणार
मला राजकारणात अजून कोणी मर्द भेटलाच नाही, थोडे दिवस द्या सगळ्यांची औकात काढतो: रवींद्र धंगेकर
कोल्हापुरात ऊस दरासाठी आंदोलन पेटले;  स्वाभिमानी, आंदोलन अंकुशच्या आंदोलनाचा भडका, किसान सभेकडून ऊस दर जाहीर केल्यावरच कारखाने सुरू करण्याची मागणी
कोल्हापुरात ऊस दरासाठी आंदोलन पेटले; स्वाभिमानी, आंदोलन अंकुशच्या आंदोलनाचा भडका, किसान सभेकडून ऊस दर जाहीर केल्यावरच कारखाने सुरू करण्याची मागणी
थेट अजित पवारांची बनवट सही केली, शिक्का मारून पत्र नियोजन कार्यालयात धाडलं, बीडच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ
थेट अजित पवारांची बनवट सही केली, शिक्का मारून पत्र नियोजन कार्यालयात धाडलं, बीडच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ
Maharashtra Local Body Elections: होऊ दे खर्च! निवडणूक आयोगानं वाढवला निवडणुकीतील खर्चाचा 'कोटा'! नगरसेवक, थेट नगराध्यक्ष किती लाखांनी खर्च वाढवला?
होऊ दे खर्च! निवडणूक आयोगानं वाढवला निवडणुकीतील खर्चाचा 'कोटा'! नगरसेवक, थेट नगराध्यक्ष किती लाखांनी खर्च वाढवला?
Embed widget