एक्स्प्लोर

डहाणू वाढवण बंदर प्रकल्पात केंद्र सरकारचे एक पाऊल मागे; घेतला 'हा' निर्णय

Dahanu Vadhavan Port : डहाणू तालुक्यातील वाढवण बंदराला मच्छिमारांसह स्थानिकांचा विरोध आहे. त्यातच आता केंद्र सरकारने एक पाऊल मागे घेतले आहे.

Palghar Vadhavan Port project : पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील प्रस्तावित वाढवण बंदराच्या नियोजित प्रकल्पाला पुन्हा एकदा खीळ बसण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. डहाणू तालुक्याच्या पर्यावरण रक्षण व संवर्धनासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या सुचनेनुसार स्थापन केलेल्या डहाणू तालुका पर्यावरण संरक्षक प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायाधीशांऐवजी प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक केल्याची अधिसूचना केंद्र सरकारने अचानकपणे मागे घेतली आहे. कृषी विधेयकांसंदर्भात घेतलेल्या भूमिकेचे पाठोपाठ केंद्र सरकारने वाढावण बंदर उभारणी संदर्भात एक पाउल मागे घेतल्याचे दिसून येत आहे.

डहाणू येथे औष्णिक ऊर्जा प्रकल्प सुरू झाल्यानंतर डहाणू तालुक्यातील पर्यावरण रक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली होती. त्या याचिकेच्या अनुषंगाने डहाणू तालुक्‍यातील पर्यावरण परिस्थितीवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी 19 डिसेंबर 1996 रोजी डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरण स्थापन करण्यात आले होते. या प्राधिकरणाचे अध्यक्षपद निवृत्त न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी त्यांच्या निधनापर्यंत (३ जानेवारी 2019) भूषवले होते. त्यानंतर 19 जुलै 2020 पर्यंत हे प्राधिकरण कार्यक्षम नव्हते.

राज्य सरकारच्या विनंतीवरून डहाणू पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाला क्रियाशील करण्यासाठी 27 ऑक्टोबर 2020 रोजी केंद्रीय वन व पर्यावरण विभागाने समितीची हंगामी स्वरूपात पुनर्रचना करून त्याचे अध्यक्षपद नागरी विकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे सोपविले होते. या समितीमध्ये अधिकतर शासकीय अधिकार्‍यांचा सहभाग आल्याने प्राधिकरणाची मूळ उद्दिष्ट बोथट करण्याचा तसेच वाढवण बंदराला चालना देण्यासाठी हे फेरबदल केल्याचे आरोप वाढवण बंदराला विरोध करणाऱ्या घटकांनी तसेच मच्छिमार संघटनांनी केला होता. याच आदेशामध्ये या समितीचा कार्यकाळ तीन वर्षाकरिता निश्चित करण्यात आल्याचे नमूद असून ही बाब मुंबई उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे.

दरम्यान बंदरे, गोदी, जेट्टी हे प्रदूषणाच्या दृतिकोणातून घातक मानल्या जाणाऱ्या 'रेड कॅटेगिरी' मधून वगळून त्यांना सौम्य प्रवर्गात (ऑरेंज कॅटेगिरी) वर्गवारीत करण्याचा केंद्र शासनाने घेतला होता. हा निर्णय हा वाढवण बंदर उभारण्याच्या दृष्टीने पोषक असल्याचा आरोप करून या निर्णया विरुद्ध वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान समितीतर्फे बाजू मांडताना पर्यावरण संरक्षण प्राधिकरणामध्ये केंद्राने केलेल्या फेरबदलाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायाधीश यांच्याऐवजी प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्तीबाबत काढलेल्या आदेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाने नापसंती व्यक्त केली होती. सर्वोच्च न्यायालयाची भूमिका लक्षात घेऊन केंद्र सरकारने यासंदर्भातील 27 ऑक्टोबर 2020 रोजी जारी केलेले आदेश मागे घेत असल्याचे प्रतिज्ञापत्र 7 डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान सादर करून त्याची तातडीने अमंलबजावणी करत असल्याचे सांगितले. 

वाढवण बंदराच्या उभारणीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने प्राधिकरणा मध्ये केलेले बदल मागे घेतल्याने या प्रताविक बंदराला स्थानिकांचा असलेला विरोध व त्यासाठी वाढवण संघर्ष समिती व मच्छिमार संघटना देत असणाऱ्या कायदेशीर लढाईला यश आले असल्याची प्रतिक्रिया परिसरात उमटली आहे. केंद्र सरकारने बंदर उभारणी चंग बांधला असताना त्यासाठी विविध मार्ग अवलंबिले जात असताना संघटना आणि स्थानिक जनतेसाठी प्राधिकरणाबाबतचा निर्णय मागे घेणे ही दिलासादायक बाब असल्याचे वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीतर्फे सांगण्यात आले.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील शाळांसाठी उन्हाळी सुट्टी जाहीर, 2 मे पासून ते 14 जून पर्यंत शाळा राहणार बंद 
राज्यातील शाळांसाठी उन्हाळी सुट्टी जाहीर, 2 मे पासून ते 14 जून पर्यंत शाळा राहणार बंद 
कोणीही आमदार उठतो आणि आम्ही एकत्र होणार म्हणतो, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरुन गिरीश महाजनांचा सुनील शेळकेंना टोला
कोणीही आमदार उठतो आणि आम्ही एकत्र होणार म्हणतो, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरुन गिरीश महाजनांचा सुनील शेळकेंना टोला
गरीब शेतकरी कसा निवडणार? कर्जमुक्तीची योग्य अंमलबजावणी न झाल्यास बँका डबघाईस येतील, शेतकरी कर्जबाजारी होतील, पटोलेंचा हल्लाबोल
गरीब शेतकरी कसा निवडणार? कर्जमुक्तीची योग्य अंमलबजावणी न झाल्यास बँका डबघाईस येतील, शेतकरी कर्जबाजारी होतील, पटोलेंचा हल्लाबोल
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मार्च 2026 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मार्च 2026 | रविवार

व्हिडीओ

Nagpur Crime : नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीने प्रियकराला व्हिडीओ कॉल करुन जीवन संपवलं
Ashok Kharat Police Custody | अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Kolhapur : कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान Special Report
Surat Railway Station : सूरतचा चेहरा बदलला, दीड हजार कोटींचा रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्प
Iran Israel Conflict Effect on E-Vehicles : युद्धामुळे इलेक्ट्रिक बाईक्सना चांगले दिवसSpecial Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada Lottery 2026 : म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2640 घरांसाठी सोडत जाहीर, मुंबईत घर घेण्यासाठी अर्ज कसा करायचा?
म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2640 घरांसाठी सोडत जाहीर, म्हाडाच्या घरांसाठी अर्ज कसा करायचा?
Pope Leo on War: देव कधीही युद्धाचे समर्थन करत नाही आणि युद्धाचे समर्थन करण्यासाठी धर्माचा किंवा देवाचा नावाचा वापर करणं साफ चुकीचं; पोप लिओंनी युद्धखोर नेत्यांना फटकारलं
देव कधीही युद्धाचे समर्थन करत नाही आणि युद्धाचे समर्थन करण्यासाठी धर्माचा किंवा देवाचा नावाचा वापर करणं साफ चुकीचं; पोप लिओंनी युद्धखोर नेत्यांना फटकारलं
Share Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं 4 दिवसात मोठं नुकसान, पावणे दोन लाख कोटी स्वाहा, रिलायन्सला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं 4 दिवसात मोठं नुकसान, पावणे दोन लाख कोटी स्वाहा, रिलायन्सला सर्वाधिक फटका
Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांना प्रश्न, देवेंद्र फडणवीस सुनेत्राताई पवार यांचं नाव घेत म्हणाले...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांना प्रश्न, देवेंद्र फडणवीस सुनेत्राताई पवार यांचं नाव घेत म्हणाले...
पाकिस्तान युद्ध थांबवण्यासाठी जोरदार हालचाली, काल इराणी राष्ट्राध्यक्षांसोबत एक तास फोनाफोनी; आज सौदी, तुर्की आणि इजिप्तचे परराष्ट्र मंत्री इस्लामाबादमध्ये पोहोचले, काय घडलं?
पाकिस्तान युद्ध थांबवण्यासाठी जोरदार हालचाली, काल इराणी राष्ट्राध्यक्षांसोबत एक तास फोनाफोनी; आज सौदी, तुर्की आणि इजिप्तचे परराष्ट्र मंत्री इस्लामाबादमध्ये पोहोचले, काय घडलं?
Gold Silver Rate : 4 लाखांवर पोहोचलेली चांदी 2 लाखांनी स्वस्त, सोने चादींच्या दरात पुन्हा वाढ सुरु, जाणून घ्या नवे दर
4 लाखांवर पोहोचलेली चांदी 2 लाखांनी स्वस्त, सोने चादींच्या दरात पुन्हा वाढ सुरु, जाणून घ्या नवे दर
'NO Kings' इराणची राजवट उलथून टाकण्यासाठी निघालेल्या ट्रम्प राजवटीलाच धडकी भरवणारा अमेरिकन जनतेचा एल्गार, सर्व 50 राज्यातील 3300 शहरात 80 लाखांहून अधिक जनता एकटवली
'NO Kings' इराणची राजवट उलथून टाकण्यासाठी निघालेल्या ट्रम्प राजवटीलाच धडकी भरवणारा अमेरिकन जनतेचा एल्गार, सर्व 50 राज्यातील 3300 शहरात 80 लाखांहून अधिक जनता एकटवली
Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: काल 'विराट' शो अन् आज रो'हिट' दिसणार! वानखेडेवर मुंबई आणि कोलकातामध्ये हाय-व्होल्टेज थरार; दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 कशी असेल?
काल 'विराट' शो अन् आज रो'हिट' दिसणार! वानखेडेवर मुंबई आणि कोलकातामध्ये हाय-व्होल्टेज थरार; दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 कशी असेल?
Embed widget