एक्स्प्लोर

'देवाचा आशीर्वाद म्हणून लग्न झाल्यानंतर तुम्ही काहीच नाही केलं तर पोर कसं होणार' : नितीन गडकरी 

Nitin Gadkari News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या रोखठोक वक्तव्यांमुळं चर्चेत असतात. त्यांनी अमरावतीमध्येही असंच एक वक्तव्य केलं आहे, ज्याची सध्या चर्चा सुरु आहे.

Nitin Gadkari News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या रोखठोक वक्तव्यांमुळं चर्चेत असतात. त्यांनी अमरावतीमध्येही असंच एक वक्तव्य केलं आहे, ज्याची सध्या चर्चा सुरु आहे. यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, देवाचा आशीर्वाद आहे आणि लग्न झाल्यानंतर तुम्ही काहीच नाही केलं तर पोरगं कसं होणार, तुम्हालाही काही पुढाकार घ्यावं लागेल,  नितीन गडकरी यांच्या या वक्तव्याने उपस्थितामध्ये एकच हशा पिकला. शेतमालाची पॅकिंग आणि उत्पादन करण्यावरुन बोलताना ते म्हणाले की, तुम्ही जर उत्पादन आणि पॅकिंग चांगलं करायला हवं. एकतर परमेश्वर किंवा सरकार असं नको व्हायला. देवानं दिलं अन् देवानं नेलं असं जमत नाही. देवाचा आशीर्वाद जरुर पाहिजे. पण देवाचा आशीर्वाद आहे, लग्न झाल्यानंतर तुम्ही काहीच नाही केलं तर पोरगं कसं होणार, तुम्हालाही काही पुढाकार घ्यावं लागेल, असं नितीन गडकरी म्हणाले अन् एकच हशा पिकला. हे उदाहरण लगेच कळतं, असा टोलाही त्यांनी नंतर लगावला.

अमरावती शहरात ‘अपेडा’ आणि ॲग्रोव्हिजन फाऊंडेशनतर्फे तर्फे विदर्भातील कृषी उत्पादने, फळे आणि भाजीपाला निर्यातीची संधी या विषयावर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मार्गदर्शन केले.

संत्र्यांची क्वॉलिटी ही आपली समस्या

नितीन गडकरी म्हणाले की, विदर्भातील शेतकऱ्यांना संत्राच्या कलमा मिळत नव्हत्या तेव्हा मी नाराज होतो. मी घोष साहेबांना सांगितल्यानंतर अनेक नर्सरी उघडण्यात आल्या.डॉ घोष यांना बोललो अमरावती, वर्धा, नागपूरमध्ये संत्राच संत्रा आहे. त्यामुळे आणखी नर्सरी वाढवा. भविष्यात आपल्याला पाच हजार कोटी रुपयांचा संत्रा निर्यात करायच्या आहेत. काही अडचणी सरकारच्या आहेत, काही तुमच्या पण आहे. त्या दूर करायच्या आहेत. मी पण एक निर्यातदार आहे. संत्राची क्वॉलिटी ही आपली समस्या आहे. 100 टक्के संत्राची क्वॉलिटी कसी मिळेल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असं ते म्हणाले. 

वरुड मोर्शी भागात संत्रा वर प्रक्रिया करणारे प्रकल्प झाले. संत्राला उत्तम क्वॉलिटीसाठी नैसर्गिकरित्या उपाय योजना केल्या पाहिजेत. वरुड मोर्शी मधील नर्सरीवाल्यांनी चांगल्या दर्जाच्या संत्रा कलम तयार कराव्या. 20 वर्षांपूर्वी मी 500 कलमा लावल्या होत्या..पण त्याला संत्रीच आले नाही त्यामुळे मी कलमात फसलो, असंही गडकरींनी सांगितलं. 

खोटेपणा केला तर जेलमध्ये टाकू

 संत्रा प्रक्रिया प्रकल्पात यायचे असेल या पण त्यांना खोटेपणा करायचा असेल तर त्यांनी यात येऊ नये नाही, खोटेपणा केला तर जेल मध्ये टाकू, असा इशाराही गडकरी यांनी दिला.  

 गावगावात तरुणांनी शेतकऱ्यांनी ड्रोन प्रशिक्षण घ्यावं

शेतकऱ्यांना फवारणीसाठी ड्रोन भाड्याने मिळेल. मी अशी व्यवस्था करणार असून आता गावगावात तरुणांनी शेतकऱ्यांनी ड्रोन प्रशिक्षण घ्यावं. याची किंमत 7-8 लाख रुपये आहे. आम्ही 4-5 लाखात मिळेल अशी व्यवस्था करतो.पाच वर्षात पेट्रोल डिझेल हद्दपार होईल. एक लिटर पेट्रोलमध्ये जेवढं अॅव्हरेज मिळतो. तेवढं अॅव्हरेज वर एक लिटर इथेनॉल वर मिळेल. अर्ध्या किमतीत इथेनॉल मिळतं. आगामी काळात इथेनॉलवर ड्रोन चालेल, असंही ते म्हणाले. शेतकऱ्यांचा विकास म्हणजे विदर्भाचा विकास. माझी पत्नी शेती करते. माझ्याकडे 60 एकर शेतीपैकी 22 एकर वर भाजीपाला आहे. मी नैसर्गिक शेती करतो, असंही गडकरी म्हणाले. 

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
आज आंदोलकांना घाबरवलं, उद्या सामान्य माणसालाही अडकवतील, धमकी देणाऱ्या पोलिसांचा मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बंदोबस्त करावा : जयंत पाटील
आज आंदोलकांना घाबरवलं, उद्या सामान्य माणसालाही अडकवतील, धमकी देणाऱ्या पोलिसांचा मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बंदोबस्त करावा : जयंत पाटील

व्हिडीओ

Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget