एक्स्प्लोर

खासदार उदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरता, रामराजे निंबाळकरांची टीका

आमदार खिशात आणि हे दोन खासदार मी माझ्या काखेत घेऊन फिरतो असा टोलाही त्यांनी लगावला. साताऱ्याच्या राजकीय क्षितीजावर जोवर हे तीन पिसाळलेली कुत्री असतील तोपर्यंत मीही पिसाळलेलाच राहणार असल्याचं रामराजेंनी म्हटलं.

सातारा : बारामतीकडे वळवलेल्या नीरा देवाघरच्या पाण्यावरुन सुरु झालेला संघर्ष आता दोन राजघराण्यांपर्यंत येऊन पोचला आहे. पिसाळलेली कुत्री असतील तोपर्यंत मीही पिसाळलेलाच राहणार, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह खासदार रणजित निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली आहे.

नीरा देवघरचे पाणी बारामतीकडे वळवण्यात रामराजे निंबाळकर यांनी पवारांना साथ दिली. तसेच त्या भागातील अनेक जमिनी लाटल्या, असा गंभीर आरोप उदयनराजे आणि खासदार रणजित निंबाळकर यांनी केले होते. या सर्व टीकेला रामराजे निंबाळकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

उदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच असल्याचा टोला रामराजे निंबाळकरांनी लगावला. आपल्यावर जमीन लाटण्याचा आरोप करणाऱ्यांनी जवळीमध्ये काय केले हे आम्हाला माहित नाही का? असा सवाल उपस्थित केला. तसेच एक टन पुराव्याची कागदे आपल्याकडे असल्याचा इशाराही त्यांनी उदयनराजेंना दिला.

आम्हाला बांडगुळ म्हणणाऱ्यांनी त्यांच्या आधीच्या छत्रपतींची पिढी आमच्या पिढीनेच सांभाळली याची जाणीव ठेवा. तुमचा आणि माझा दोघांचाही राज्याभिषेक घरातच झाल्याने आपण दोघेही स्वयंघोषित राजे असल्याचे उत्तर रामराजेंनी दिले. मी लाल दिव्याच्या गाडीतून फिरलो तर तुमच्या पोटात का दुखतंय, तुम्हीही दोन वर्षे लाल दिव्याच्या गाडीत फिरुन काय केले, असा सवाल रामराजेंनी विचारला.

मी असे अनेक आमदार, खासदार अंगावर घेतले आहेत, त्यामुळे माजी ऊर्जा वाढतच गेली. आमदार खिशात आणि हे दोन खासदार मी माझ्या काखेत घेऊन फिरतो असा टोलाही त्यांनी लगावला. साताऱ्याच्या राजकीय क्षितीजावर जोवर हे तीन पिसाळलेली कुत्री असतील तोपर्यंत मीही पिसाळलेलाच राहणार असल्याचं रामराजेंनी म्हटलं. त्यामुळे दुष्काळी भागाचे बारामतीकडे वळवलेले पाणी पुन्हा दुष्काळी भागाला देण्याच्या भाजप सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर आता राजघराण्यात उडालेला भडका अधिकच टोकाला जाऊ लागला आहे.

उदयनराजेंनी काय आरोप केले होते?

नीरा देवघर धरणाच्या पाण्यावरुन राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजेंनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला होता. त्यांनी राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. स्वतःच्या स्वार्थासाठी 14 वर्ष पाणी बारामतीला पळवलं. जमिनी लाटण्यासाठी काहींनी लोकांना पाण्यापासून दूर ठेवलं, असा गंभीर आरोप त्यांनी केले होते. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि गुन्हेगारांवर कारवाई झालीच पाहिजे असंही उदयनराजेंनी म्हटलं होतं.

काय आहे वाद? 

माढ्याचे नवनिर्वाचित खासदार रणजित निंबाळकर यांनी निवडून येताच सांगोला येथील दुष्काळी बैठकीत नीर देवघर धरणाच्या पाण्याबाबत आवाज उठवत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाण्याची मागणी केली होती. त्यानंतर बारामतीकडे वळवलेले पाणी पुन्हा उजव्या कालव्यातील दुष्काळी भागात वळवण्याच्या निर्णय घेण्यात आला होता. या दुष्काळी भागात सांगोला, माळशिरस, पंढरपूर फलटणला या भागांचा समावेश येतो. आता पुन्हा एकदा 1954च्या कायद्यानुसार हे पाणीवाटप करण्याचा मोठा निर्णय भाजप सरकारने घेतला. बारामतीला वळवलेले दुष्काळी भागाच्या हक्काचे पाणी पुन्हा एकदा या भागाला मिळणार असल्याने या भागातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळून त्यांची तहान भागणार आहे.

आणखी वाचा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget