एक्स्प्लोर

जायकवाडीचे पाणी मांजरा उपखोऱ्यात आणण्याची योजना, सहा तालुक्यांना फायदा

जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडल्याने मराठवाड्याला मोठा दिलासा मिळणार आहे बीड जिल्ह्याच्या गेवराई माजलगाव आणि काही अंशी परळी तालुक्यातील गावांना या पाण्याचा नक्कीच फायदा होणार आहे.

बीड : जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडल्याने मराठवाड्याला मोठा दिलासा मिळणार आहे बीड जिल्ह्याच्या गेवराई माजलगाव आणि काही अंशी परळी तालुक्यातील गावांना या पाण्याचा नक्कीच फायदा होणार आहे. जायकवाडीतून सोडलेले हे पाणी गोदावरी नदीच्या बंधाऱ्यात साचणार आहेच, शिवाय माजलगाव धरणासाठी पाणी सोडल्याने या धरणावर अवलंबून असलेल्या बीड, गेवराई, माजलगाव या शहरांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा आधार ठरणार आहे. असे असले तरी बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरूर, केज, अंबाजोगाई, परळी, धारूर या तालुक्यांसाठी जायकवाडीचे पाणी समांतर प्रवाही कालव्याद्वारे जोडण्याच्या योजनेची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिली आहे. जायकवाडी प्रकल्पात उपलब्ध होणारे पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी समांतर प्रवाही कालव्याद्वारे माजलगाव धरणात आणून त्याद्वारे सिंदफना, कुंडलिका, वाण, मनार व मांजरा उपखोऱ्यात वळवणे. हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. अशी आहे योजना जायकवाडी धरण ते सिंदफना नदी यांना जोडणारा 70 किलोमीटर लांब जलदगती प्रवाही कलवा काढणे. मांजरा, वाण, सरस्वती, गुणवती, बोरणा, मासोळी, व मनार प्रकल्पांचे स्थैर्यकरण करण्यासाठी उपसा सिंचन योजनेद्वारे पाणी उपखोऱ्यात वळवणे. मराठवाडयातील बीड, केज, धारूर, वडवणी, शिरूर, पाटोदा, माजलगाव, अंबाजोगाई, परळी, अहमदपूर, कंधार, रेणापूर, चाकूर, बिलोली व मुखेड तालुक्यात नवीन सिंचन योजना हाती घेता येतील. प्रस्तावित योजनेसाठी अंदाजे 6 हजार 700 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मराठवाडा वॉटर ग्रिड या योजनेच्या पहिल्या टप्प्यात केवळ औरंगाबाद आणि जालना जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या जायकवाडी धरणामध्ये 90 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाणी आहे. अशा परिस्थितीमध्ये समांतर प्रवाही कालव्याद्वारे छोट्या प्रकल्पामध्ये पाणी आले तर निश्चितच त्याचा फायदा मराठवाड्यातील लातूर बीड नांदेड जिल्ह्याला होऊ शकेल.

महत्त्वाच्या बातम्या

मराठा आरक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा, सात दिवसांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरा, विखे पाटलांचे निर्देश 
मराठा आरक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा, सात दिवसांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरा, विखे पाटलांचे निर्देश 
दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शाहनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 
दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शाहनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
Embed widget