एक्स्प्लोर

LIVE UPDATES | बिलोली बलात्कार व हत्या प्रकरणातील दोन आरोपींना नांदेड पोलिसांकडून अटक

बर्ड फ्लूबाबत अफवा अन् चुकीची माहिती पसरु नये यासाठी प्रशासनाने योग्य माहिती द्यावी : मुख्यमंत्री लसीकरणाबाबत अफवा पसरु नये, राज्य सरकारांनी काळजी घ्यावी, पंतप्रधान मोदींच्या सूचना हिंगणघाटच्या प्राध्यापिका जळीत कांडप्रकरणी तीन जणांची साक्ष नोंद हनुमा विहारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीतून बाहेर दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

LIVE UPDATES |  बिलोली बलात्कार व हत्या प्रकरणातील दोन आरोपींना नांदेड पोलिसांकडून अटक

Background

दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

बर्ड फ्लूबाबत अफवा अन् चुकीची माहिती पसरु नये यासाठी प्रशासनाने योग्य माहिती द्यावी : मुख्यमंत्री
बर्ड फ्लूसंदर्भात अफवा व चुकीची माहिती पसरु नये यासाठी प्रशासनाने नागरिकांना योग्य व वस्तुनिष्ठ माहिती द्यावी. माणसांमध्ये या रोगाचे संक्रमण होत नसल्याने घाबरण्याचे कारण नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. बर्ड फ्लू संदर्भांत राज्यातील परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज घेतला. ठाकरे यांनी बर्ड फ्लू संदर्भात आढावा घेवून नंतर लगेचच राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना व्हीसीद्वारे बर्ड फ्लू संक्रमण आणि घ्यावयाची काळजी या संदर्भात निर्देश दिले. या संदर्भातील निर्देशांची गांभीर्याने अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. या रोगाचे तात्काळ निदान होण्याकरीता राज्यामध्ये पशुसंवर्धन विभागासाठी जैवसुरक्षास्तर 3ही अद्ययावत प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्याची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी. ज्या भागात बर्डफ्लू रोगाची लागण नाही अशा भागात अंडी व मांस 70 डीग्री पेक्षा जास्त तापमानात शिजवून खाल्ल्यास काहीही धोका नसल्याचे नमूद करून याबाबत गैरसमज व अफवा पसरविण्यात येवू नयेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

लसीकरणाबाबत अफवा पसरु नये, राज्य सरकारांनी काळजी घ्यावी, पंतप्रधान मोदींच्या सूचना
देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू होणार आहे. या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधला. यामध्ये त्यांनी कोरोनाच्या लसीकरण कार्यक्रमाच्या नियोजनावर चर्चा केली. तसेच लसीकरणाबाबत अफवा पसरु नये याची राज्य सरकारांनी काळजी घ्यावी, असं देखील सांगितलं आहे. देशात भारत बायोटेकची Covaxin आणि ऑक्सफोर्ड अॅस्ट्राजेनेकाची Covishield या दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. या संवादात मोदी म्हणाले की, या लसीकरण अभियानात लस देणाऱ्यांची ओळख आणि मॉनिटरिंग सर्वात महत्वाची आहे. त्यासाठी आधुनिक टेक्नॉलॉजीचा उपयोग करत को-विन नावाचा एक डिजिटल प्लॅटफॉर्म देखील बनवला आहे.

हिंगणघाटच्या प्राध्यापिका जळीत कांडप्रकरणी तीन जणांची साक्ष नोंद
राज्यभर गाजलेल्या हिंगणघाट येथील प्राध्यापिकेच्या जळीतकांड प्रकरणाच्या प्रत्यक्ष सुनावणीला सुरूवात झाली आहे. हिंगणघाटच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एन. माजगावकर यांच्या न्यायालयात तीन जणांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. हिंगणघाट येथे विक्की उर्फ विकेश नगराळे याने प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्यात आलं होतं. उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी विकेश नगराळेवर गुन्हा दाखल करून अटक केली होती. या प्रकरणाची सुनावणी हिंगणघाट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात होत आहे. शासनाच्या वतीने फिर्यादी पक्षाकडून विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी युक्तीवाद केला आहे.

हनुमा विहारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीतून बाहेर
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय खेळाडूंच्या फिटनेसची समस्या वाढत चालली आहे. सिडनीतील ड्रॉ केलेल्या तिसर्‍या कसोटी सामन्याचा हिरो हनुमा विहारी हा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे ब्रिस्बेनमधील चौथा कसोटी सामना खेळू शकणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सामन्यानंतर विहारीला स्कॅन करण्यासाठी नेण्यात आले. मंगळवारी संध्याकाळपर्यंत त्याचा अहवाल अपेक्षित आहे. येत्या 15 जानेवारीपासून सुरू होणार्‍या पुढील सामन्यापर्यंत विहारी फिट होऊ शकणार नाही, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले आहे. हनुमा विहारीने आर अश्विनच्या साथीने 161 चेंडूत 23 धावा करून सिडनी कसोटी ड्रॉ करण्याची महत्वाची भूमिका निभावली. विहारीच्या जागी पर्याय म्हणून रिद्धिमान साहाला स्थान दिलं जाऊ शकतं.

20:46 PM (IST)  •  13 Jan 2021

नाट्यपरिषद अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्यावर आज झालेल्या नियामक मंडळाच्या सभेत अविश्वास ठराव. बहुमत सिद्ध करण्यासाठी येत्या 15 दिवसात कांबळी यांना विशेष नियामक सभेचे आयोजन करून बहुमत सिद्ध करावे लागणार.
21:17 PM (IST)  •  13 Jan 2021

नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना अटक, ड्रग्स कनेक्शनमध्ये झाली अटक, आरोपी करण सजनानीच्या चौकशीत नाव आल्याने समन्स पाठवून चौकशीला बोलावण्यात आले होते, सकाळी 10 पासून सुरू होती समीर खान यांची चौकशी
22:32 PM (IST)  •  13 Jan 2021

नांदेड: बिलोली येथील बलात्कार व खून प्रकरणातील दोन आरोपींना नांदेड पोलिसांकडून अटक, तेलंगणा व आंध्रप्रदेश राज्यातून पोलिसांनी घेतले ताब्यात
17:42 PM (IST)  •  13 Jan 2021

अमरावतीच्या देऊरवाडा येथील आत्महत्येची चिठ्ठी लिहून बेपत्ता झालेला शेतकरी अखेर आज आपल्या गावी परतला.. शेतकरी विजय सुने हे शेगावला गेल्याची विजय सुने यांनी एबीपी माझाला माहिती दिली.. दरम्यान काल विजय सुने यांच्या पत्नीने शिरजगाव कसबा पोलिसात तक्रार दिली की, माझ्या पतीने आत्महत्या केली तर राज्यमंत्री बच्चू कडू, त्यांचे खाजगी सचिव, तहसीलदार, ठाणेदार, बिट जमादार हे जबाबदार राहतील..त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.. यावेळी विजय सुने यांनी पोलिसांच्या धमकीने वैतागल्याचा केला होता चिठ्ठीत उल्लेख.
18:24 PM (IST)  •  13 Jan 2021

नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदुरबार) या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच व सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबद्दलचे पुरावे प्राप्त झाल्यामुळे या ग्रामपंचायतींची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द केली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली. श्री. मदान यांनी सांगितले की, उमराणे आणि खोंडामळी ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच व सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याचबरोबर आयोगाकडे तक्रारीदेखील प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषंगाने आयोगाने अहवाल मागविले होते. जिल्हाधिकारी, निवडणूक निरीक्षक, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांचा अहवाल; तसेच विविध कागदपत्रे आणि ध्वनिचित्रफितींचे अवलोकन केल्यानंतर या ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. खोंडामळी येथील लिलावाप्रकरणी आधीच नंदुरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आता अधिक तपास करून भारतीय दंड विधानाचे कलम 171 (क) अथवा अन्य कायद्यांतील तरतुदींनुसार संबंधितांविरूद्ध कायदेशीर कारवाई करून आयोगास अहवाल सादर करावा, असे निर्देश नाशिक आणि नंदुरबारचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत. केवळ काही ग्रामस्थांच्या एकतर्फी दबावात्मक निर्णयामुळे इच्छूक उमेदवारांना मुक्त वातावरणात निवडणूक लढविण्यापासून आणि मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रकार या दोन्ही गावांमध्ये झाला आहे. यातून लोकशाहीच्या मूलभूत तत्वांचे आणि आचारसंहितेचे भंग झाल्याचे सकृतदर्शनी सिद्ध होत आहे. अशा प्रकारांमुळे निवडणूक लढविण्याची सर्वांना समान संधी प्राप्त होऊ शकत नाही. हे प्रकार टाळण्यासाठी निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात निवडणूक घेण्याची संविधानिक जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर आहे. ही संविधानात्मक जबाबदारी पार पाडण्यासाठी आयोगाने या दोन्ही ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया रद्द केली आहे, असेही श्री. मदान यांनी सांगितले.
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget