एक्स्प्लोर

राष्ट्रवादीची 'निर्धार परिवर्तनाचा' यात्रा सुरु

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा आर्शिवाद घेवून आणि राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचे दर्शन घेवून राष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन संपर्क यात्रा सुरु झाली. त्यानंतर ऐतिहासिक महाडच्या चवदार तळ्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करुन पहिल्या सभेची सुरुवात करण्यात आली.

रायगड : ज्या शिवछत्रपतींचा आर्शिवाद आणि त्यांच्या नावाचं ब्रॅडींग करुन भाजपाने सत्ता मिळवली. लोकांना अच्छे दिनाचे स्वप्न दाखवत देशातील आणि राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. त्या लोकांना धडा शिकवण्यासाठी शिवरायांच्या साक्षीने बळीराजाचे राज्य आणायचे आहे. म्हणून हा निर्धार करण्यात आला असून तशी शपथ रायगडावर घेतल्याचे सांगतानाच जातीयविरोधी, कामगारविरोधी, सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणाऱ्या सरकारला सत्तेपासून दूर करण्याचा निर्धार समविचारी पक्षांना एकत्र घेवून परिवर्तनाची मुहुर्तमेढ आज रोवली गेली आहे त्याला साथ द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी महाडच्या सभेत केले. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा आर्शिवाद घेवून आणि राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचे दर्शन घेवून राष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन संपर्क यात्रा सुरु झाली. त्यानंतर ऐतिहासिक महाडच्या चवदार तळ्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करुन पहिल्या सभेची सुरुवात करण्यात आली. राष्ट्रवादीची 'निर्धार परिवर्तनाचा' यात्रा सुरु दोन जातींमध्ये दाणे टाकून झुंजवणाऱ्यांच्या विरोधात लढूया : छगन भुजबळ ओबीसी-मराठा या जातीमध्ये आरक्षणाच्या नावावर लढवलं जात आहे. दोन्ही समाजाला सांभाळून रहावे लागणार आहे. तुमची-आमची लढाई ही दाणे टाकून झुंजवणाऱ्यांच्या विरोधात आहे. ही लढाई एकत्रित लढवली पाहिजे असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.  भुजबळ यांनी आपल्या भाषणामध्ये नरेंद्र मोदी यांची नक्कल करत तर कधी त्यांच्या घोषणांवर टिप्पणी करत आणि खोट्या आश्वासनांचा समाचार घेत जोरदार हल्ला केला. भाजप सरकारच्या फसव्या घोषणा आणि योजनांचा पाऊस व बिघडलेली कायदा व सुव्यवस्था या विषयांसह राफेल,  मीडियावरील बंदी, युतीतील वाद या सगळ्या विषयांना हात घालत  भुजबळ यांनी सरकारवर तोफ डागली. लाट नाही यांची तर वाट लागली आहे : जयंत पाटील आता लाट वगैरे काही राहिलेली नाही तर यांची वाट लागलेली आहे अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला. हा देश व राज्य भाजप सरकारच्या कचाटयातून सोडवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा आर्शिवाद घेत, राजमाता जिजाऊंच्या समाधीचे दर्शन घेवून आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करुन राष्ट्रवादीने ही निर्धार परिवर्तन संपर्क यात्रा सुरु केल्याचेही  पाटील यांनी सांगितले.  आमच्या काळात जी प्रगती करण्यात आली ती सगळी अधोगतीकडे नेल्याचा आरोपही  पाटील यांनी केला. शिवरायांच्या आर्शिवादाने व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक विचार घेवून लोकसभेची जबाबदारी सुनील तटकरे यांच्यावर सोपवली आहे, असे सांगतानाच त्यांना लोकसभेत पाठवण्यासाठी तयारी करुया असे आवाहनही पाटील यांनी केले. भाजपाचा पराभव करण्यासाठी सर्व समविचारी पक्ष सोबत आल्याशिवाय राहणार नाही हे सत्य आहे त्यादृष्टीने तयारी सुरु असून भाजप सरकारचा शेवट केल्याशिवाय ही परिवर्तन यात्रा संपवणार नाही असा निर्धारही  पाटील यांनी व्यक्त केला. रायगडापासून इतिहास रचला जाणार : सुनील तटकरे या रायगडापासून इतिहास रचला जाणार असून वैभवाचे दिवस आणावयाचे असल्यास  आणि धर्मनिरपेक्षतेचे राज्य आणण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी पाठीशी उभे रहा असे आवाहन सुनील तटकरे यांनी केले. या ऐतिहासिक भूमीतून ही निर्धार यात्रा सुरु होत असून आम्ही लोकांची सेवा करण्यासाठी परिवर्तन मागत असल्याचेही  तटकरे म्हणाले. त्यांनी आपल्या भाषणामध्ये रायगड मतदारसंघात शिवसेनेकडून विकास झाला नसल्याचा आरोप करताना मंत्री अनंत गीते यांनी एकही उद्योग आणला नसल्याचेही सांगितले. भाजप सरकारला खड्यासारखं बाजूला करा : धनंजय मुंडे परिवर्तन हा निसर्ग नियम असून जे आपलं सरकार नाही त्या सरकारला खड्यासारखं बाजूला केल्याशिवाय गप्प बसायचं नाही असा निर्धार व्यक्त करतानाच राजा शिवछत्रपतींच्या आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना नतमस्तक होवून या रयतेच्या राजधानीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा खासदार तटकरे यांच्या रुपाने द्यावा असे आवाहन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. पहिली लढाई युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी जुलुमाविरोधी केली आणि आमचा निर्धार हुकुमशहाच्या विरोधात असल्याची स्पष्टता करतानाच छत्रपतींच्या नावाने सत्तेत आलेल्या आणि त्यांच्या नावाची बदनामी करणाऱ्या भाजप सरकारवर हल्लाबोल मुंडे यांनी केला. शिवाय शिवसेनेने वाघ हे चिन्ह बदलून आत्ता शेळीचे चित्र लावावे असेही मुंडे यावेळी म्हणाले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election 2026: भाजपने मुंबईत पहिल्या बंडखोराला शांत केलं, देवाभाऊ अन् भगव्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला, अमित साटमांनी गोरेगावमध्ये काय केलं?
भाजपने मुंबईत पहिल्या बंडखोराला शांत केलं, देवाभाऊ अन् भगव्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला, अमित साटमांनी गोरेगावमध्ये काय केलं?
भारतासह जगभरात 2026 ची उत्साहात सुरुवात; जम्मू आणि काश्मीरमध्ये बर्फवृष्टीत आनंदोत्सव; चीन, जपान आणि सिंगापूरमध्ये आतषबाजी, ऑस्ट्रेलियामध्ये नदीकाठावर लाखो लोक जमले
भारतासह जगभरात 2026 ची उत्साहात सुरुवात; जम्मू आणि काश्मीरमध्ये बर्फवृष्टीत आनंदोत्सव; चीन, जपान आणि सिंगापूरमध्ये आतषबाजी, ऑस्ट्रेलियामध्ये नदीकाठावर लाखो लोक जमले
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली

व्हिडीओ

Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election 2026: भाजपने मुंबईत पहिल्या बंडखोराला शांत केलं, देवाभाऊ अन् भगव्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला, अमित साटमांनी गोरेगावमध्ये काय केलं?
भाजपने मुंबईत पहिल्या बंडखोराला शांत केलं, देवाभाऊ अन् भगव्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला, अमित साटमांनी गोरेगावमध्ये काय केलं?
भारतासह जगभरात 2026 ची उत्साहात सुरुवात; जम्मू आणि काश्मीरमध्ये बर्फवृष्टीत आनंदोत्सव; चीन, जपान आणि सिंगापूरमध्ये आतषबाजी, ऑस्ट्रेलियामध्ये नदीकाठावर लाखो लोक जमले
भारतासह जगभरात 2026 ची उत्साहात सुरुवात; जम्मू आणि काश्मीरमध्ये बर्फवृष्टीत आनंदोत्सव; चीन, जपान आणि सिंगापूरमध्ये आतषबाजी, ऑस्ट्रेलियामध्ये नदीकाठावर लाखो लोक जमले
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
Embed widget