एक्स्प्लोर

राष्ट्रवादीची 'निर्धार परिवर्तनाचा' यात्रा सुरु

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा आर्शिवाद घेवून आणि राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचे दर्शन घेवून राष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन संपर्क यात्रा सुरु झाली. त्यानंतर ऐतिहासिक महाडच्या चवदार तळ्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करुन पहिल्या सभेची सुरुवात करण्यात आली.

रायगड : ज्या शिवछत्रपतींचा आर्शिवाद आणि त्यांच्या नावाचं ब्रॅडींग करुन भाजपाने सत्ता मिळवली. लोकांना अच्छे दिनाचे स्वप्न दाखवत देशातील आणि राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. त्या लोकांना धडा शिकवण्यासाठी शिवरायांच्या साक्षीने बळीराजाचे राज्य आणायचे आहे. म्हणून हा निर्धार करण्यात आला असून तशी शपथ रायगडावर घेतल्याचे सांगतानाच जातीयविरोधी, कामगारविरोधी, सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणाऱ्या सरकारला सत्तेपासून दूर करण्याचा निर्धार समविचारी पक्षांना एकत्र घेवून परिवर्तनाची मुहुर्तमेढ आज रोवली गेली आहे त्याला साथ द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी महाडच्या सभेत केले. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा आर्शिवाद घेवून आणि राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचे दर्शन घेवून राष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन संपर्क यात्रा सुरु झाली. त्यानंतर ऐतिहासिक महाडच्या चवदार तळ्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करुन पहिल्या सभेची सुरुवात करण्यात आली. राष्ट्रवादीची 'निर्धार परिवर्तनाचा' यात्रा सुरु दोन जातींमध्ये दाणे टाकून झुंजवणाऱ्यांच्या विरोधात लढूया : छगन भुजबळ ओबीसी-मराठा या जातीमध्ये आरक्षणाच्या नावावर लढवलं जात आहे. दोन्ही समाजाला सांभाळून रहावे लागणार आहे. तुमची-आमची लढाई ही दाणे टाकून झुंजवणाऱ्यांच्या विरोधात आहे. ही लढाई एकत्रित लढवली पाहिजे असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.  भुजबळ यांनी आपल्या भाषणामध्ये नरेंद्र मोदी यांची नक्कल करत तर कधी त्यांच्या घोषणांवर टिप्पणी करत आणि खोट्या आश्वासनांचा समाचार घेत जोरदार हल्ला केला. भाजप सरकारच्या फसव्या घोषणा आणि योजनांचा पाऊस व बिघडलेली कायदा व सुव्यवस्था या विषयांसह राफेल,  मीडियावरील बंदी, युतीतील वाद या सगळ्या विषयांना हात घालत  भुजबळ यांनी सरकारवर तोफ डागली. लाट नाही यांची तर वाट लागली आहे : जयंत पाटील आता लाट वगैरे काही राहिलेली नाही तर यांची वाट लागलेली आहे अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला. हा देश व राज्य भाजप सरकारच्या कचाटयातून सोडवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा आर्शिवाद घेत, राजमाता जिजाऊंच्या समाधीचे दर्शन घेवून आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करुन राष्ट्रवादीने ही निर्धार परिवर्तन संपर्क यात्रा सुरु केल्याचेही  पाटील यांनी सांगितले.  आमच्या काळात जी प्रगती करण्यात आली ती सगळी अधोगतीकडे नेल्याचा आरोपही  पाटील यांनी केला. शिवरायांच्या आर्शिवादाने व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक विचार घेवून लोकसभेची जबाबदारी सुनील तटकरे यांच्यावर सोपवली आहे, असे सांगतानाच त्यांना लोकसभेत पाठवण्यासाठी तयारी करुया असे आवाहनही पाटील यांनी केले. भाजपाचा पराभव करण्यासाठी सर्व समविचारी पक्ष सोबत आल्याशिवाय राहणार नाही हे सत्य आहे त्यादृष्टीने तयारी सुरु असून भाजप सरकारचा शेवट केल्याशिवाय ही परिवर्तन यात्रा संपवणार नाही असा निर्धारही  पाटील यांनी व्यक्त केला. रायगडापासून इतिहास रचला जाणार : सुनील तटकरे या रायगडापासून इतिहास रचला जाणार असून वैभवाचे दिवस आणावयाचे असल्यास  आणि धर्मनिरपेक्षतेचे राज्य आणण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी पाठीशी उभे रहा असे आवाहन सुनील तटकरे यांनी केले. या ऐतिहासिक भूमीतून ही निर्धार यात्रा सुरु होत असून आम्ही लोकांची सेवा करण्यासाठी परिवर्तन मागत असल्याचेही  तटकरे म्हणाले. त्यांनी आपल्या भाषणामध्ये रायगड मतदारसंघात शिवसेनेकडून विकास झाला नसल्याचा आरोप करताना मंत्री अनंत गीते यांनी एकही उद्योग आणला नसल्याचेही सांगितले. भाजप सरकारला खड्यासारखं बाजूला करा : धनंजय मुंडे परिवर्तन हा निसर्ग नियम असून जे आपलं सरकार नाही त्या सरकारला खड्यासारखं बाजूला केल्याशिवाय गप्प बसायचं नाही असा निर्धार व्यक्त करतानाच राजा शिवछत्रपतींच्या आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना नतमस्तक होवून या रयतेच्या राजधानीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा खासदार तटकरे यांच्या रुपाने द्यावा असे आवाहन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. पहिली लढाई युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी जुलुमाविरोधी केली आणि आमचा निर्धार हुकुमशहाच्या विरोधात असल्याची स्पष्टता करतानाच छत्रपतींच्या नावाने सत्तेत आलेल्या आणि त्यांच्या नावाची बदनामी करणाऱ्या भाजप सरकारवर हल्लाबोल मुंडे यांनी केला. शिवाय शिवसेनेने वाघ हे चिन्ह बदलून आत्ता शेळीचे चित्र लावावे असेही मुंडे यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद, त्यांनी कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव, पुण्यात राहुल गांधी कडाडले
महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद, त्यांनी कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव, पुण्यात राहुल गांधी कडाडले

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Embed widget