एक्स्प्लोर

Jayant Patil : अधिवेशन संपलं तरी शेतकऱ्यांना मदत नाही, हे सरकार असंवेदनशील : जयंत पाटील   

Jayant Patil : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे असंवेदनशील असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यंनी केलं.

Jayant Patil : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे असंवेदनशील असून, त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे बघण्यास वेळ नसल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यंनी केलं. अवकाळी पावसामुळं (Rain) राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र, त्यांना अद्याप मदत झाली नसल्याचे पाटील म्हणाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिवेशनात मदत जाहीर केली जाईल अशा घोषणा करत मंत्री राज्यभर फिरले. मात्र अधिवेशन संपले तरी सरकारनं शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली नसल्याचे पाटील म्हणाले. हे अधिवेशन पूर्ण उद्धव ठाकरे आणि विरोधकांवर टीका करण्यातच खर्ची घातल्याचे चित्र दिसल्याचे पाटील म्हणाले. 

विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई केली जातेय

राज्यातील सरकार फक्त आणि फक्त आश्वासनांच्या पलीकडे काही करत नसल्याची टीका जयंत पाटील यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पक्षांतर्गत पक्ष संघटना बांधणीसाठी उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. ते धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. आज सकाळी ते नंदुरबारमध्ये आले होते. यावेळी त्यांनी सरकारवर टीका केली. राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केल्याच्या मुद्यावरुनही पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका केली. सरकार विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई केली जात असल्याचे पाटील म्हणाले.

मालेगाव मतदारसंघात उद्धव ठाकरेंना लोकांचा मोठा पाठिंबा

आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे मालेगावमध्ये जाहीर सभा घेत आहेत. या मतदारसंघात त्यांना लोकांचा मोठा पाठिंबा असल्याचे जयंत पाटील म्हणाले. या सभेच्या माध्यमातून हा लोकांचा पाठिंबा नक्की व्यक्त होईल. लोकांना ओढून आणावं लागत नाही ते स्वतःहून येतात हे त्यांच्या सभेचे वेगळेपण असल्याचे जयंत पाटील म्हणाले. 

वारंवार मागणी करुनही शेतकऱ्यांना अद्याप मदत नाही 

दरम्यान, काल (25) राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनाची सांगता झाली. 27 फेब्रुवारीपासून अधिवेशन सुरु झाले होते. या अधिवेशनात शेतकरी प्रश्नासह विविध मुद्यांवरुन विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी जोरदार मागणी केली होती. मात्र, अद्याप सरकारनं शेतकऱ्यांना कोणतीही मदत केली नाही. या मुद्यावरुन जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. सरकारमधील मंत्र्यांनी अधिवेशनात मदत जाहीर करणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र, त्यांनी कोणत्याही प्रकारची मदत जाहीर केली नसल्याचे पाटील यावेळी म्हणाले.  

महत्त्वाच्या बातम्या:

Ajit pawar : पेपर उघडला की यांचांच फोटो, शेतकऱ्यांसाठी काय केलं ते सांगा? अजित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

महत्त्वाच्या बातम्या

Narayan Rane : बाळ मानेंना सिरीयस घेऊ नका, विश्वास टाकायची गरज नाही; नारायण राणेंकडून घरचा आहेर, काय काय म्हणाले?
बाळ मानेंना सिरीयस घेऊ नका, विश्वास टाकायची गरज नाही; नारायण राणेंकडून घरचा आहेर, काय काय म्हणाले?
Maharashtra Live News Updates: पनवेल महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचा राजीनामा, पक्षातील अंतर्गत वादामुळे राजीनामा
Maharashtra Live News Updates: पनवेल महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचा राजीनामा, पक्षातील अंतर्गत वादामुळे राजीनामा
Vidhan Parishad Election 2026: मोठी बातमी: अखेर काँग्रेसने कारवाईचा बडगा उगारलाच, पक्षादेश नसताना परस्पर उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांवर निलंबनाची कारवाई,
मोठी बातमी: अखेर काँग्रेसने कारवाईचा बडगा उगारलाच, पक्षादेश नसताना परस्पर उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांवर निलंबनाची कारवाई,
Maharashtra Rain Updates: मान्सून काल केरळमध्ये धडकला, आज गोव्यात पोहोचला; महाराष्ट्रात कधी?; हवामान विभागाने तारीख सांगितली, पावसाचे A टू Z अपडेट्स
मान्सून काल केरळमध्ये धडकला, आज गोव्यात पोहोचला; महाराष्ट्रात कधी?; हवामान विभागाने तारीख सांगितली, पावसाचे A टू Z अपडेट्स

व्हिडीओ

Sanjay Shirsat Abdul Sattar EXCLUSIVE : शिदेंची जादू,आरोप-प्रत्यारोप करणारे एकाच गाडीत
Prashant Jagtap On NCP : राष्ट्रवादीने काँग्रेसने विश्वासघात केला, प्रशांत जगताप यांची टीका
Navneet Rana Meet Devendra Fadnavis: राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump on PM Modi: भारताने अनेक दशके अमेरिकेचा फायदा घेतला, आता आम्ही टॅरिफमधून बक्कळ कमाई करत आहोत, तरीही आम्ही डील करणार कारण मला मोदी आवडतात : डोनाल्ड ट्रम्प
भारताने अनेक दशके अमेरिकेचा फायदा घेतला, आता आम्ही टॅरिफमधून बक्कळ कमाई करत आहोत, तरीही आम्ही डील करणार कारण मला मोदी आवडतात : डोनाल्ड ट्रम्प
GDP Growth : मार्च तिमाहीत जीडीपी वाढ 7.8 टक्क्यांवर, जागतिक अस्थिरतेच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेची 2025-2026 मध्ये कामगिरी कशी राहिली?
मार्च तिमाहीत जीडीपी वाढ 7.8 टक्क्यांवर, जागतिक अस्थिरतेच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेची 2025-2026 मध्ये कामगिरी कशी राहिली?
K. Annamalai: अण्णामलाईंनी भाजपला अखेर रामराम ठोकलाच, नव्या पक्षाची घोषणा; म्हणाले, 'भाजपमध्ये राहावं की तामिळ लोकांशी जोडलेलं राहावं या विचारात होतो, पण..'
अण्णामलाईंनी भाजपला अखेर रामराम ठोकलाच, नव्या पक्षाची घोषणा; म्हणाले, 'भाजपमध्ये राहावं की तामिळ लोकांशी जोडलेलं राहावं या विचारात होतो, पण..'
Shrikant Shinde : खासदार श्रीकांत शिंदेंनाही आवरला नाही खानदेशी पुरणपोळीचा मोह; नंदुरबारमध्ये घेतला पारंपरिक चवीचा आस्वाद!
खासदार श्रीकांत शिंदेंनाही आवरला नाही खानदेशी पुरणपोळीचा मोह; नंदुरबारमध्ये घेतला पारंपरिक चवीचा आस्वाद!
Khan Sir Coaching Class Case: खान सरांना अटक करण्यासाठी पाटण्यात छापा; कायदा आणि सुव्यवस्थेवर पोलीस अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, सर म्हणाले, 'यांना माझ्या फोटोला हार घालायचा होता..'
खान सरांना अटक करण्यासाठी पाटण्यात छापा; कायदा आणि सुव्यवस्थेवर पोलीस अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, सर म्हणाले, 'यांना माझ्या फोटोला हार घालायचा होता..'
Polymer Currency:  रिझर्व्ह बँक प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार असल्याच्या चर्चा, गव्हर्नर संजय म्हलोत्रा अपडेट देत म्हणाले...
RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार असल्याच्या चर्चा, गव्हर्नर संजय म्हलोत्रा अपडेट देत म्हणाले...
चंद्रकांतदादा 'राष्ट्रीय' नेते असून काहीच केलं नाही, सुमित कदमांचा गोकुळ, जिल्ह्याशी संबंध नाही, मुश्रीफांना बोलवलं, पण आम्हाला नाही; शिवाजी पाटलांचा थेट हल्लाबोल, म्हणाले, 'तर मग सतेज पाटील...'
चंद्रकांतदादा 'राष्ट्रीय' नेते असून काहीच केलं नाही, सुमित कदमांचा गोकुळ, जिल्ह्याशी संबंध नाही, मुश्रीफांना बोलवलं, पण आम्हाला नाही; शिवाजी पाटलांचा थेट हल्लाबोल, म्हणाले, 'तर मग सतेज पाटील...'
Amol Kolhe: अवघ्या 5 महिन्यांतच 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेचा शेवट; पण अमोल कोल्हेंची 'ही' गाजलेली मालिका पुन्हा येणार
अवघ्या 5 महिन्यांतच 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेचा शेवट; पण अमोल कोल्हेंची 'ही' गाजलेली मालिका पुन्हा येणार
Embed widget