एक्स्प्लोर

Jayant Patil : अधिवेशन संपलं तरी शेतकऱ्यांना मदत नाही, हे सरकार असंवेदनशील : जयंत पाटील   

Jayant Patil : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे असंवेदनशील असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यंनी केलं.

Jayant Patil : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे असंवेदनशील असून, त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे बघण्यास वेळ नसल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यंनी केलं. अवकाळी पावसामुळं (Rain) राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र, त्यांना अद्याप मदत झाली नसल्याचे पाटील म्हणाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिवेशनात मदत जाहीर केली जाईल अशा घोषणा करत मंत्री राज्यभर फिरले. मात्र अधिवेशन संपले तरी सरकारनं शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली नसल्याचे पाटील म्हणाले. हे अधिवेशन पूर्ण उद्धव ठाकरे आणि विरोधकांवर टीका करण्यातच खर्ची घातल्याचे चित्र दिसल्याचे पाटील म्हणाले. 

विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई केली जातेय

राज्यातील सरकार फक्त आणि फक्त आश्वासनांच्या पलीकडे काही करत नसल्याची टीका जयंत पाटील यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पक्षांतर्गत पक्ष संघटना बांधणीसाठी उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. ते धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. आज सकाळी ते नंदुरबारमध्ये आले होते. यावेळी त्यांनी सरकारवर टीका केली. राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केल्याच्या मुद्यावरुनही पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका केली. सरकार विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई केली जात असल्याचे पाटील म्हणाले.

मालेगाव मतदारसंघात उद्धव ठाकरेंना लोकांचा मोठा पाठिंबा

आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे मालेगावमध्ये जाहीर सभा घेत आहेत. या मतदारसंघात त्यांना लोकांचा मोठा पाठिंबा असल्याचे जयंत पाटील म्हणाले. या सभेच्या माध्यमातून हा लोकांचा पाठिंबा नक्की व्यक्त होईल. लोकांना ओढून आणावं लागत नाही ते स्वतःहून येतात हे त्यांच्या सभेचे वेगळेपण असल्याचे जयंत पाटील म्हणाले. 

वारंवार मागणी करुनही शेतकऱ्यांना अद्याप मदत नाही 

दरम्यान, काल (25) राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनाची सांगता झाली. 27 फेब्रुवारीपासून अधिवेशन सुरु झाले होते. या अधिवेशनात शेतकरी प्रश्नासह विविध मुद्यांवरुन विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी जोरदार मागणी केली होती. मात्र, अद्याप सरकारनं शेतकऱ्यांना कोणतीही मदत केली नाही. या मुद्यावरुन जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. सरकारमधील मंत्र्यांनी अधिवेशनात मदत जाहीर करणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र, त्यांनी कोणत्याही प्रकारची मदत जाहीर केली नसल्याचे पाटील यावेळी म्हणाले.  

महत्त्वाच्या बातम्या:

Ajit pawar : पेपर उघडला की यांचांच फोटो, शेतकऱ्यांसाठी काय केलं ते सांगा? अजित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक; पाणी परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला जाणार
Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक; पाणी परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला जाणार
BJP Shivsena NCP Mahayuti Candidate List Vidhan Parishad Election 2026: शिवसेनेपासून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसपर्यंत...; विधान परिषदेच्या 17 पैकी 17 उमेदवारांची यादी, एका क्लिकवर
शिवसेनेपासून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसपर्यंत...; विधान परिषदेच्या 17 पैकी 17 उमेदवारांची यादी, एका क्लिकवर
Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल

व्हिडीओ

Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Pune Vidhan Parishad : काकडेंच्या एन्ट्रीने टिंगरेंना धक्का? NCP तील नाराजीनाट्य | Special Report
Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
K Annamalai: तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईं पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईं पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Gokul Kolhapur: 'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
Iran War Live: तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
Embed widget