एक्स्प्लोर

Jayant Patil : अधिवेशन संपलं तरी शेतकऱ्यांना मदत नाही, हे सरकार असंवेदनशील : जयंत पाटील   

Jayant Patil : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे असंवेदनशील असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यंनी केलं.

Jayant Patil : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे असंवेदनशील असून, त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे बघण्यास वेळ नसल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यंनी केलं. अवकाळी पावसामुळं (Rain) राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र, त्यांना अद्याप मदत झाली नसल्याचे पाटील म्हणाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिवेशनात मदत जाहीर केली जाईल अशा घोषणा करत मंत्री राज्यभर फिरले. मात्र अधिवेशन संपले तरी सरकारनं शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली नसल्याचे पाटील म्हणाले. हे अधिवेशन पूर्ण उद्धव ठाकरे आणि विरोधकांवर टीका करण्यातच खर्ची घातल्याचे चित्र दिसल्याचे पाटील म्हणाले. 

विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई केली जातेय

राज्यातील सरकार फक्त आणि फक्त आश्वासनांच्या पलीकडे काही करत नसल्याची टीका जयंत पाटील यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पक्षांतर्गत पक्ष संघटना बांधणीसाठी उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. ते धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. आज सकाळी ते नंदुरबारमध्ये आले होते. यावेळी त्यांनी सरकारवर टीका केली. राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केल्याच्या मुद्यावरुनही पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका केली. सरकार विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई केली जात असल्याचे पाटील म्हणाले.

मालेगाव मतदारसंघात उद्धव ठाकरेंना लोकांचा मोठा पाठिंबा

आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे मालेगावमध्ये जाहीर सभा घेत आहेत. या मतदारसंघात त्यांना लोकांचा मोठा पाठिंबा असल्याचे जयंत पाटील म्हणाले. या सभेच्या माध्यमातून हा लोकांचा पाठिंबा नक्की व्यक्त होईल. लोकांना ओढून आणावं लागत नाही ते स्वतःहून येतात हे त्यांच्या सभेचे वेगळेपण असल्याचे जयंत पाटील म्हणाले. 

वारंवार मागणी करुनही शेतकऱ्यांना अद्याप मदत नाही 

दरम्यान, काल (25) राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनाची सांगता झाली. 27 फेब्रुवारीपासून अधिवेशन सुरु झाले होते. या अधिवेशनात शेतकरी प्रश्नासह विविध मुद्यांवरुन विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी जोरदार मागणी केली होती. मात्र, अद्याप सरकारनं शेतकऱ्यांना कोणतीही मदत केली नाही. या मुद्यावरुन जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. सरकारमधील मंत्र्यांनी अधिवेशनात मदत जाहीर करणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र, त्यांनी कोणत्याही प्रकारची मदत जाहीर केली नसल्याचे पाटील यावेळी म्हणाले.  

महत्त्वाच्या बातम्या:

Ajit pawar : पेपर उघडला की यांचांच फोटो, शेतकऱ्यांसाठी काय केलं ते सांगा? अजित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी संभाजीराजे पुन्हा आक्रमक; घेतला मोठा निर्णय
विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी संभाजीराजे पुन्हा आक्रमक; घेतला मोठा निर्णय
लाडक्या बहि‍णींची झंझट मिटली, ना उत्पन्न दाखला, ना अधिवास प्रमाणपत्र; सरकारने आणखी सोप्पी केली योजना
लाडक्या बहि‍णींची झंझट मिटली, ना उत्पन्न दाखला, ना अधिवास प्रमाणपत्र; सरकारने आणखी सोप्पी केली योजना
Kolhapur Crime : कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
Isha Ambani : शाहरुखचे 'हे' तीन चित्रपट पाहून रडलीय ईशा अंबानी, सांगितले आवडत्या दिग्दर्शकाचे नाव
शाहरुखचे 'हे' तीन चित्रपट पाहून रडलीय ईशा अंबानी, सांगितले आवडत्या दिग्दर्शकाचे नाव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 2 PM : 3 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPratap Sarnaik on Acharya Marathe College :चेंबुर कॉलेजच्या जीन्स , टी शर्ट बंदीचा मुद्दा विधानसभेतBuldhana : खेरडा येथील तलाठी कार्यालय बंद; तलाठ्याची महिलांसोबत अरेरावीVidhanparishad Maratha Reservation : विधानपरिषदेत मराठा आरक्षणावर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी संभाजीराजे पुन्हा आक्रमक; घेतला मोठा निर्णय
विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी संभाजीराजे पुन्हा आक्रमक; घेतला मोठा निर्णय
लाडक्या बहि‍णींची झंझट मिटली, ना उत्पन्न दाखला, ना अधिवास प्रमाणपत्र; सरकारने आणखी सोप्पी केली योजना
लाडक्या बहि‍णींची झंझट मिटली, ना उत्पन्न दाखला, ना अधिवास प्रमाणपत्र; सरकारने आणखी सोप्पी केली योजना
Kolhapur Crime : कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
Isha Ambani : शाहरुखचे 'हे' तीन चित्रपट पाहून रडलीय ईशा अंबानी, सांगितले आवडत्या दिग्दर्शकाचे नाव
शाहरुखचे 'हे' तीन चित्रपट पाहून रडलीय ईशा अंबानी, सांगितले आवडत्या दिग्दर्शकाचे नाव
Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली,  राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
PM Modi Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
एक लंगडा, तर दुसरा तोतापुरी, आणखी एकाला कुणी म्हणतंय दशहरी; फळांच्या राजाच्या नावांची ही अनोखी कहाणी!
एक लंगडा, तर दुसरा तोतापुरी, तिसऱ्याला कुणी म्हणतंय दशहरी; फळांच्या राजाच्या नावांची अनोखी कहाणी!
Subodh Bhave :  सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
Sidharth Malhotra Fan Fraud : कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा  चुना
कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा चुना
Embed widget