एक्स्प्लोर

Sharad Pawar : महागाईचा परिणाम कृषी आणि उद्योगांवर, रोजगारही कमी झाले, शरद पवारांचा केंद्रावर निशाणा

सध्या देशात मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली आहे. महागाईचा परिणाम कृषी आणि उद्योगांवर झाला असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं.

Sharad Pawar : 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी महिलांच्या सुरक्षेबाबत, सन्मानाबाबत वक्तव्य केलं. मात्र, दुसऱ्याच दिवशी गुजरातमध्ये भाजपच्या सरकारानं बिल्कीस बानोच्या गुन्हेगारांची शिक्षा कमी करण्याचं काम केल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं. 2014 मध्ये घरगुती गॅसचे दर हे 410 रुपयांवर होते ते आज 1000 रुपयांवर गेले आहेत. तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आज 100 रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. याचा परिणाम सर्व व्यवसायांवर झाला आहे. तसेच याचा परिणाम कृषी आणि उद्योगांवर झाला असल्याचे पवार म्हणाले. रोजगार कमी झाले असल्याचेही पवार म्हणाले.

शेतकऱ्यांसाठी लढण्याची तयारी ठेवली पाहिजे

शेतकऱ्यांवर कोणतही संकट आल्यानंतर आपल्याला सतर्क राहणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांसाठी लढण्याची तयारी ठेवली पाहिजे असेही शरद पवार यावेळी म्हणाले. सांप्रदायिक शक्तिविरोधात लढण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला हवं असेही शरद पवार म्हणाले. आज देशातील नागरिकांसमोर वाढती महागाई ही मोठी समस्या आहे. महागाईचा दर वाढला आहे. पेट्रोल, डिझेल, खायच्या वस्तूंचे दर वाढले आहेत. याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत असल्याचे पवार म्हणाले. आज दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 8 व्या राष्ट्रीय अधिवेशनानिमित्त आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीच्या सत्तेपुढं कधीही झुकले नाहीत

छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास बघितला तर आपल्याला समजते की ते दिल्लीच्या सत्तेसमोर कधीही झुकले नाहीत. शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकर हे आमचे आदर्श असल्याचे शरद पवार म्हणाले. आज दिल्लीच्या ऐतिहासीक मैदानावर आपण सगळे एकत्र आलो आहोत. बाजीराव पेशवे पुण्यातून दिल्लीत आले होते. त्यांनी दिल्लीच्या शासनाला आव्हान दिल्याचे पवार म्हणाले. गेल्या 75 वर्षात देशावर अनेक संकटे आली असल्याचे पवार म्हणाले. या काळात देशात खूप बदल झाल्याचा उल्लेख देखील पवारांनी केला. 

जगातील अनेक देशांना अन्नधान्य पुरवण्याचं काम भारतातील शेतकरी करतो

देशातील 56 टक्के लोकसंख्या शेती करत आहे. देशाला अन्न पुरवण्याचे काम शेतकरी करत आहेत. जगातील अनेक देशात अन्नधान्य पुरवण्याचं काम भारतातील शेतकरी करत असल्याचे पवार म्हणाले. पण दुर्दैवाने देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत.दरम्यान, केंद्र सरकारनं तीन कृषी कायदे केले होते. हे कायदे 15 मिनीटात संसदेत पारित केले होते. याविरोधात एक वर्ष दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. मात्र, या आंदोलनाला भाजपने विरोध केला. निर्दोष शेतकऱ्यांवर कारवाई केल्याचे पवार म्हणाले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस सतत शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करेल असेही पवार यावेळी म्हणाले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशिकच्या सिन्नर बसस्थानकात बसचा भीषण अपघात, 9 वर्षीय बालकाचा मृत्यू तर पाच जण जखमी
नाशिकच्या सिन्नर बसस्थानकात बसचा भीषण अपघात, 9 वर्षीय बालकाचा मृत्यू तर पाच जण जखमी
10 मिनिटे उशीर, विद्यार्थीनीला शिक्षा, आजारी पडून रुग्णालयात मुलीचा मृत्यू; शिक्षिकेविरुद्ध गुन्हा, अटक
10 मिनिटे उशीर, विद्यार्थीनीला शिक्षा, आजारी पडून रुग्णालयात मुलीचा मृत्यू; शिक्षिकेविरुद्ध गुन्हा, अटक
अनगरनंतर बारामतीत राजकारण तापलं, शरद पवारांच्या राष्ट्रवादी शहराध्यक्षाला मारहाण; सुप्रिया सुळेंचा संताप
अनगरनंतर बारामतीत राजकारण तापलं, शरद पवारांच्या राष्ट्रवादी शहराध्यक्षाला मारहाण; सुप्रिया सुळेंचा संताप
नगराध्यक्षपदासाठी राणी निवडणुकीच्या रिंगणात; मराठी बोलता येत नसल्याने महायुतीत वाद, नितेश राणेंचा इशारा
नगराध्यक्षपदासाठी राणी निवडणुकीच्या रिंगणात; मराठी बोलता येत नसल्याने महायुतीत वाद, नितेश राणेंचा इशारा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Delhi Blast : दिल्लीतील हल्ल्यामागे पाकचा हात? Pok च्या माजी पंतप्रधानाची मोठी कबुली
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar : अहिल्यानगर महापालिकेचं मैदान कोण मारणार?
Mahapalikecha Mahasangram Navi Mumbai : नवी मुंबई शहरात कोणते प्रश्न प्रलंबित? नागरिकांच्या नेमक्या समस्या काय?
Amol Mitkari : अजित पवारांवर बोलण्याची Balraje Patil य़ांची औकात आहे का?; मिटकरी कडाडले
Amol Mitkari : अजित पवारांवर बोलण्याची Balraje Patil यांची औकात आहे का? मिटकरी कडाडले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशिकच्या सिन्नर बसस्थानकात बसचा भीषण अपघात, 9 वर्षीय बालकाचा मृत्यू तर पाच जण जखमी
नाशिकच्या सिन्नर बसस्थानकात बसचा भीषण अपघात, 9 वर्षीय बालकाचा मृत्यू तर पाच जण जखमी
10 मिनिटे उशीर, विद्यार्थीनीला शिक्षा, आजारी पडून रुग्णालयात मुलीचा मृत्यू; शिक्षिकेविरुद्ध गुन्हा, अटक
10 मिनिटे उशीर, विद्यार्थीनीला शिक्षा, आजारी पडून रुग्णालयात मुलीचा मृत्यू; शिक्षिकेविरुद्ध गुन्हा, अटक
अनगरनंतर बारामतीत राजकारण तापलं, शरद पवारांच्या राष्ट्रवादी शहराध्यक्षाला मारहाण; सुप्रिया सुळेंचा संताप
अनगरनंतर बारामतीत राजकारण तापलं, शरद पवारांच्या राष्ट्रवादी शहराध्यक्षाला मारहाण; सुप्रिया सुळेंचा संताप
नगराध्यक्षपदासाठी राणी निवडणुकीच्या रिंगणात; मराठी बोलता येत नसल्याने महायुतीत वाद, नितेश राणेंचा इशारा
नगराध्यक्षपदासाठी राणी निवडणुकीच्या रिंगणात; मराठी बोलता येत नसल्याने महायुतीत वाद, नितेश राणेंचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 नोव्हेंबर 2025 | बुधवार
'त्या' सैतानाला चौकात आणून उभा चिरला असता, मालेगावातील पीडित कुटुंबीयांची भेट, चित्रा वाघ यांनाही अश्रू अनावर
'त्या' सैतानाला चौकात आणून उभा चिरला असता, मालेगावातील पीडित कुटुंबीयांची भेट, चित्रा वाघ यांनाही अश्रू अनावर
गँगस्टर लॉरेन्स बिश्वोईचा भाऊ अनमोलला अमेरिकेतून हद्दपार करताच भारतात आणलं; सलमानच्या घरासमोर फायरिंग, बाबा सिद्धीकी हत्याकांडातील मुख्य आरोपी
गँगस्टर लॉरेन्स बिश्वोईचा भाऊ अनमोलला अमेरिकेतून हद्दपार करताच भारतात आणलं; सलमानच्या घरासमोर फायरिंग, बाबा सिद्धीकी हत्याकांडातील मुख्य आरोपी
Rahul Gandhi: 'तुम्ही निवडणूक आयोगाची प्रतीमा मलीन करताय' 272 निवृत्त न्यायाधीश आणि अधिकाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र
'तुम्ही निवडणूक आयोगाची प्रतीमा मलीन करताय' 272 निवृत्त न्यायाधीश आणि अधिकाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र
Embed widget