एक्स्प्लोर

Navneet Rana: देवेंद्र फडणवीस हेच आमच्यासाठी मुख्यमंत्री, नवनीत राणांच्या वक्तव्यानं राजकारण तापलं

Devendra Fadanvis : राष्ट्रवादी काँग्रेसनं पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. तर भाजपनं नवनीत राणा यांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. 

Navneet Rana on Devendra Fadanvis : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस हेच आमच्यासाठी मुख्यमंत्री असून महाराष्ट्राच विकास देवेंद्र फडणवीसच करू शकतात, असं वक्तव्य नवनीत राणा यांनी केलं आहे.  नवनीत राणा यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलेय. राष्ट्रवादी काँग्रेसनं पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. तर भाजपनं नवनीत राणा यांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. 

काय म्हणाल्या नवनीत राणा?

देवेंद्र फडणवीस हेच आमच्यासाठी मुख्यमंत्री आहेत. या राज्याचा जर कुणी विकास करू शकतो तर तो फक्त देवेंद्र फडणवीस हेच आहेत. येणाऱ्या काळात अमरावती लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघ येतात. येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा फक्त बडनेरा सोडून भाजपचे उमेदवार निवडून आले पाहिजेत. जिथे जिथे फडणवीस यांचे पाऊल पडले तिथं विकासच होणार..आणि आमच्यासाठी फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत, असे नवनीत राणा म्हणाल्या. बडनेरा इथून रवी राणा आमदार असल्याने ती जागा सोडून इतर ठिकाणी भाजपचे आमदार निवडून आले पाहिजे हे बोलताच सभेत एकच हश्या उडाला..

नवनीत राणांनी भाजपात यावं - बावनकुळेंची ऑफर

नवनीत राणा यांनी राष्ट्रीय पक्षात यावं. त्या राष्ट्रीय पक्षात काम करण्यायोग्य आहेत. त्यांनी भाजप पक्ष स्वीकारावा ते पक्षात आले तर खऱ्या अर्थाने त्यांचा मानसन्मान केला जाईल. 2024 मध्ये आम्ही एकत्रित निवडणूक लढवणार आहेत...बडनेरा मतदारसंघात खासदार आणि आमदार भाजपचे यावे, यासाठी आम्ही युवा स्वाभिमानला विनंती करणार आहोत.. त्यांना ही विनंती करू की त्यांनी राष्ट्रीय पक्षात काम करावं. 2024 पर्यत त्यांचं मनपरिवर्तन होईल...कोण मुख्यमंत्री आणि कोण उपमुख्यमंत्री यापेक्षा महाराष्ट्रच्या जनेतला विकास महत्वाचा आहे. खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, असे बावनकुळे म्हणाले. 

शिंदे गटाची प्रतिक्रिया काय?

नवनीत राणा यांच्या वक्तव्यानंतर शिंदे गटाकडून शंभूराजे देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे नवनीत राणा काय म्हणतात यावर बोलायचं नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हातात हात घालून राम लक्ष्मणासारखे काम करत आहेत, असे देसाई म्हणाले. 

अमोल मिटकरींची टीका -  

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी खासदार नवनीत राणांच्या देवेंद्र फडणवीस हेच आमचे मुख्यमंत्री असल्याच्या विधानावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी टीका केली. ते म्हणाले की, महाविकास आघाडी ही सातत्याने सांगते आहे की एकनाथ शिंदे हे जरी मुख्यमंत्री असले तरी ते भाजपचे मुख्यमंत्री नाहीत. भाजपला न पचलेले मुख्यमंत्री आहेत. हे नवनीत राणा पहिल्यांदा बोलल्यात असं नाही. चंद्रकांतदादा पाटील, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानंतर आज त्यावर नवनीत राणांनी कळस चढविला आहे. एकनाथ शिंदे जरी मुख्यमंत्री असले तरी आपण देवेंद्र फडणवीसांनाच मुख्यमंत्री मानतो. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनीच देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असल्याचं म्हटलं होतं. विधानानंतर नवनीत राणांचं विधान खरं सत्ताधारी कोण हे सांगणारं.  या सरकारमध्ये धुसफूस आणि अंतर्विरोध आहे. एकनाथ शिंदेंना भाजपचा कोणताच नेता गांभिर्याने घेत नाही. शिंदेसोबत गेलेल्या 40 लोकांनीच भाजप कसं संपवतंय याचे हे सुचक विधान. हे 40 आमदार भाजपात सहभागी केल्याशिवाय शिंदेंकडे मार्ग नाही. ज्या दिवशी असं होईल त्या दिवशी यांचं अस्तित्व संपलेलं असेल.  एकनाथ शिंदेंनी आता तरी जागं व्हावं. भाजपाची खेळी ओळखावी, असे अमोल मिटकरी म्हणाले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget