एक्स्प्लोर

Nathuram Godse : नथुराम गोडसे दहशतवादीच, प्रकाश आंबेडकरांचं टीकास्त्र

नथुराम गोडसे हा दहशतवादीच होता, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

कोल्हापूर : महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे हा दहशतवादीच होता, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. कोल्हापुरात आज शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी नथुराम गोडसे वादावर भाष्य केलं. एखाद्या व्यक्तीची हत्या करणे हे कृत्य दहशतवादीच आहे. मात्र असं असलं तरी संपूर्ण हिंदू धर्मालाच याबाबत दोषी धरणे चुकीचे आहे, असंही प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.  यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकरांनी पश्चिम बंगालमधील गोंधळाच्या वातावरणावरुन भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा वंचित बहुजन आघाडी लढवणार असल्याचे संकेत प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत. लोकसभेप्रमाणे विधानसभेलादेखील स्वतंत्रपणे 288 जागा लढवाव्यात असा कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी विधानसभेला सर्व जागा लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. कमल हासन यांच्याकडूनही नथुराम गोडसेचा दहशतवादी म्हणून उल्लेख प्रसिद्ध अभिनेते आणि मक्कल निधी मैयम पार्टी (एमएनएम) चे संस्थापक कमल हासन यांनीही नथुराम गोडसेला स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता, असं वक्तव्य केलं होतं. तामिळनाडू अरावाकुरुची विधानसभा क्षेत्रात प्रचारादरम्यान बोलत होते. नथुराम गोडसेने महात्मा गांधीची हत्या केली होती. याविषयी बोलताना कमल हासन पुढे म्हणाले होते की, "या परिसरात मुस्लीम मोठ्या प्रमाणावर आहेत, म्हणून मी असं म्हणत नाही. तर मी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेसमोर असं म्हणत आहे. नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी होता. त्यानंतरच देशात दहशतवादाची सुरुवात झाली." कोण होता नथुराम गोडसे? नथुराम गोडसेने पुण्याजवळ बारामती येथे प्राथमिक शिक्षण घेतले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्यासाठी त्याने हायस्कूलचे शिक्षण मध्यावरच सोडलं. नथुराम गोडसे सुरुवातीला अखिल भारतीय काँग्रेसमध्ये सक्रिय होता. मात्र नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि 1930 अखिल भारतीय हिंदू महासभेत गेला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताची फाळणी झाली त्यावेळी झालेल्या धार्मिक दंगलींमुळे नथुराम गोडसे दु:खी झाला होता. या दंगलींसाठी नथुराम गोडसे महात्मा गांधींना जवाबदार मानत होता. त्यामुळेच त्याने चिडून आपल्या साथिदारांसह महात्मा गांधींच्या हत्येचा कट रचला. त्यानुसार 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसेने दिल्लीतील बिर्ला भवनात गांधीजींची गोळ्या घालून हत्या केली. गांधींजींच्या हत्येप्रकरमी नथुराम गोडसे आणि सहआरोपी नारायण आपटेला 15 नोव्हेंबर 1949 रोजी पंजाबमधील अंबाला जेलमध्ये फाशी देण्यात आली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Silver Rate : चांदीनं सोन्याला मागं टाकलं, दोन दिवसात तब्बल 20 हजारांनी दर वाढले, चांदी 1 लाख 70 हजारांवर, 2 लाखांच्या दिशेनं वाटचाल
चांदीनं सोन्याला मागं टाकलं, दोन दिवसात तब्बल 20 हजारांनी दर वाढले, चांदी 1 लाख 70 हजारांवर
Bihar Election 2025 : बिहार विधानसभेसाठी NDA चं जागा वाटप ठरलं, जदयू सर्वाधिक जागा लढणार, चिराग पासवानच्या पार्टीला किती जागा?
बिहार विधानसभेसाठी NDA चं जागा वाटप ठरलं, जदयू सर्वाधिक जागा लढणार, भाजपला किती जागा मिळणार
भारताचा WTC च्या फायनलमध्ये दोनदा पराभव कशामुळं झाला, आर. अश्विननं 'या' गोष्टीवर खापर फोडलं
भारताचा WTC च्या फायनलमध्ये दोनदा पराभव कशामुळं झाला, आर. अश्विननं 'या' गोष्टीवर खापर फोडलं
सचिनची साद, क्रीडामंत्री कोकाटेंचा प्रतिसाद; महिला खेळाडूंसाठी महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय
सचिनची साद, क्रीडामंत्री कोकाटेंचा प्रतिसाद; महिला खेळाडूंसाठी महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sachin's New Innings: 'कॉमन मॅन'साठी सचिनचा नवा ब्रँड, धोनी-कोहलीला देणार टक्कर
Thackeray Brand: ठाकरे ब्रँड काय, जनताच दाखवून देईल - उद्धव ठाकरे
Thackeray Brothers Unite: 'सगळ्यांची चौकशी लावू', MNS चे Avinash Jadhav यांचा इशारा
Ladki Bahin KYC Update: 'पुढील दोन महिन्यांत E-KYC करा', मंत्री Aditi Tatkare यांचे लाभार्थ्यांना आवाहन
Voter List Row: 'मी बाहेरुन वीस हजार मतदान आणलं', MLA Vilas Bhumre यांच्या वक्तव्याने खळबळ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Silver Rate : चांदीनं सोन्याला मागं टाकलं, दोन दिवसात तब्बल 20 हजारांनी दर वाढले, चांदी 1 लाख 70 हजारांवर, 2 लाखांच्या दिशेनं वाटचाल
चांदीनं सोन्याला मागं टाकलं, दोन दिवसात तब्बल 20 हजारांनी दर वाढले, चांदी 1 लाख 70 हजारांवर
Bihar Election 2025 : बिहार विधानसभेसाठी NDA चं जागा वाटप ठरलं, जदयू सर्वाधिक जागा लढणार, चिराग पासवानच्या पार्टीला किती जागा?
बिहार विधानसभेसाठी NDA चं जागा वाटप ठरलं, जदयू सर्वाधिक जागा लढणार, भाजपला किती जागा मिळणार
भारताचा WTC च्या फायनलमध्ये दोनदा पराभव कशामुळं झाला, आर. अश्विननं 'या' गोष्टीवर खापर फोडलं
भारताचा WTC च्या फायनलमध्ये दोनदा पराभव कशामुळं झाला, आर. अश्विननं 'या' गोष्टीवर खापर फोडलं
सचिनची साद, क्रीडामंत्री कोकाटेंचा प्रतिसाद; महिला खेळाडूंसाठी महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय
सचिनची साद, क्रीडामंत्री कोकाटेंचा प्रतिसाद; महिला खेळाडूंसाठी महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय
Eknath Shinde: लंडनला जमा केलं, मुंबईसाठी बाकी ठेवा, ठाकरे बंधूंची युती; संभाजीनगरमधून एकनाथ शिंदेंनी सगळंच काढलं
लंडनला जमा केलं, मुंबईसाठी बाकी ठेवा, ठाकरे बंधूंची युती; संभाजीनगरमधून एकनाथ शिंदेंनी सगळंच काढलं
Nobel Prize : नोबेल समितीचं शांततेपेक्षा राजकारणाला प्राधान्य, डोनाल्ड ट्रम्प यांची संधी हुकताच व्हाइट हाऊसची पहिली प्रतिक्रिया
नोबेल समितीचं शांततेपेक्षा राजकारणाला प्राधान्य, डोनाल्ड ट्रम्प यांची संधी हुकताच व्हाइट हाऊसची पहिली प्रतिक्रिया
रोहित शर्माचा फटका, लेम्बोर्गिनीला झटका; टीम इंडियाच्या फलंदाजाने शिवाजी पार्कमधून ठोकला गगनचुंबी षटकार
रोहित शर्माचा फटका, लेम्बोर्गिनीला झटका; टीम इंडियाच्या फलंदाजाने शिवाजी पार्कमधून ठोकला गगनचुंबी षटकार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2025 | शुक्रवार
Embed widget