एक्स्प्लोर

धक्कादायक! नागपुरात आंदोलक महिलेनं केला आत्मदहनाचा प्रयत्न, पोलीसांची तारांबळ, मोठा अनर्थ टळला 

नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. दरम्यान, मोर्चेस्थळी यशवंत स्टेडियममध्ये आंदोलनकर्ती सीताबाई धांडे यांनी अचानक आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली.

Nagpur : नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. दरम्यान, मोर्चेस्थळी यशवंत स्टेडियममध्ये आंदोलनकर्ती सीताबाई धांडे यांनी अचानक आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. यशवंत स्टेडियम परिसरात अचानक घडलेल्या घटनेमुळं पोलीस दलाची मोठी तारांबळ उडाली. आग लावून आत्मदहनाचा प्रयत्न करताना आंदोलनकर्ते धावल्याचं पाहायला मिळालं. 

पुण्यातील खराडी-चंदन नगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात बिल्डरकडून झालेल्या अन्यायाविरोधात आंदोलन

पुण्यातील खराडी-चंदन नगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात बिल्डर आणि प्रशासनाकडून झालेल्या अन्यायाविरोधात हे आंदोलन केले होते. बोगस संमतीपत्रावर बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे. त्या ठिकाणी लावलेल्या आगीत 100 झोपड्या जळाल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे. 23 एप्रिल 2025 रोजी पुण्यात लागलेल्या आगीत दोन तरुणांचा मृत्यू झाला होता, मात्र बिल्डरवर अद्याप गुन्हा दाखल न केल्याचा ही आंदोलकांचा आरोप आहे. राजकीय दबावामुळे अटक होत नाही, त्यामुळं महिलांनी नागपुरात येऊन आंदोलन केले आहे.

पोलिसांनी तातडीने आग विझवली

यावेळी सीताबाई धांडे यांनी रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न करताच पोलिसांनी तातडीने आग विझवली. पोलीसांनी वेळीच आग विझवली नाहीतर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती. महिला आंदोलकांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. रुमाल जाळला असताना पोलीसानी धाव घेतली आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू दिला नाही. पोलीस या घटनेची पुढील चौकशी करत आहेत.

सध्या नागपूरमध्ये विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आज या अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. आज विविध मुद्यावरुन सभागृहात विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारवर जोरदार टीका केली. कापूस आणि सोयाबीनला योग्य दर न मिळाल्यामुळं विरोधतांनी आक्रमक पवित्रा घेतला. हा मुद्दा विधानभवनाबाहेर आणि पायऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर गाजला. गळ्यात कापसाच्या बोंडांच्या माळा घालून विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत सरकारविरोधात निषेध नोंदवला आणि शेतकऱ्यांसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. कर्जमाफी, कापूस व सोयाबीनला योग्य भाव मिळावा यासाठी विरोधकांनी जोरदार आंदोलन केले. “सरकार तुपाशी, शेतकरी उपाशी” अशा घोषणा देत त्यांनी महायुती सरकारवर केवळ घोषणा केल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचाही मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला.

महत्नाच्या बातम्या:

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी अभिमन्यू पवारांना झापलं, म्हणाले, 'लाडक्या बहि‍णींच्या विरोधात जाऊ नका, घरी बसावं लागेल'

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
Mumbai Tiranga Morcha: 'जेन झी'ने दिल्ली जिंकली, आता मुंबईत ठाकरे बंधूंचा एल्गार, राज-उद्धव ठाकरेंच्या तिरंगा मोर्चात तरुणाईची ताकद दिसणार
'जेन झी'ने दिल्ली जिंकली, आता मुंबईत ठाकरे बंधूंचा एल्गार, राज-उद्धव ठाकरेंच्या तिरंगा मोर्चात तरुणाईची ताकद दिसणार
Maharashtra Weather Update:बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
Akola Crime: अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Update:बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
Akola Crime: अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
Embed widget