एक्स्प्लोर
Advertisement
नागपुरात नाणारवासियांचं आंदोलन, शिवसेना नेत्यांशी बाचाबाची
विधानभवनाबाहेर सकाळपासून सुरु असलेल्या नाणारवासियांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या शिवसेना आमदारांसोबत आंदोलकांची बाचाबाची झाली.
नागपूर : रत्नागिरीतल्या नाणार प्रकल्पावरुन पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज नागपुरात गदारोळ झाला. विधानसभेत आणि विधानभवनाबाहेर नाणार प्रकल्पाला जोरदार विरोध पाहायला मिळाला. विधानभवनाबाहेर सकाळपासून सुरु असलेल्या नाणारवासियांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या शिवसेना आमदारांसोबत आंदोलकांची बाचाबाची झाली.
विधानभवनाबाहेर सकाळपासून सुरु असलेल्या नाणारवासियांच्या आंदोलनात शिवसेना आमदार, रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर सहभागी झाले. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना मंत्री पाठिंबा देण्यासाठी आल्याचा आरोप आंदोलकांनी केला. यावरुन आंदोलक आणि शिवसेना नेत्यांमध्ये बोलाचाली झाली.
नाणारविरोधात विधानसभेत विरोधीपक्षासह शिवसेनेने गोंधळ घातला. या गोंधळातच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. गोंधळामुळे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं.
नाणार प्रकल्पाविरोधात नागपूर विधीमंडळासमोर धरणं आंदोलन केल्याची माहिती देण्यासाठी राजापूरचे शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे पॉईंट ऑफ इन्फर्मेशन अंतर्गत बोलण्याची परवानगी मागितली होती. परंतु विधानसभाध्यक्षांनी ती फेटाळल्यामुळे शिवसेना आक्रमक झाली. कामकाज तहकूब झाल्यानंतर आक्रमक झालेले शिवसेनेचे मंत्री थेट विधानभवनाबाहेरील आंदोलनात सहभागी झाले.
दरम्यान, नाणार प्रकल्पाविरोधी मोर्चात शिवसेनेने 'भाजप जमीन चोर आहे' अशा घोषणा दिल्या. त्या घोषणा बाहेर देण्याऐवजी सभागृहात द्याव्या. विधान परिषदेत काल मुख्यमंत्री बोलले तेव्हा शिवसेना काही बोलली नाही, आज विधानसभेत नाटक केलं. शिवसेना आणि भाजपची सेटिंग आहे, नाणार प्रकल्पाबाबत शिवसेना दलाली करत आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
राजकारण
पुणे
भविष्य
Advertisement