एक्स्प्लोर

मुंबई - गोवा हायवेचं काम पूर्ण होण्याकरता आणखी दीड वर्षाचा कालावधी; 'एमईपी कंपनीवर मेहेरनजर का?

रत्नागिरी जिल्ह्यातील आरवली ते वाकेड हे 90 किमी अंतराचे काम एमईपी कंपनीकडे आहे. पण, अद्याप देखील हे काम अपूर्ण आहे. 2017 मध्ये या कामाला सुरुवात झाली होती. त्यानंतर नोव्हेंबर 2019 मध्ये हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते.

मुंबई : गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम डिसेंबर 2020 पर्यंत पूर्ण होणार आणि त्यानंतर कोकणवासियांचा प्रवास सुसाट होणार असल्याचं सांगितले जात होते. पण, प्रत्यक्षात मात्र आता मुंबई - गोवा हायवेचे काम पूर्ण होण्यासाठी किमान दीड वर्ष वाट पाहावी लागणार आहे. 'मिन्स्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अॅन्ड हायवे'च्या 5 मे 2020 रोजीच्या पत्रावरुन ही बाब आता स्पष्ट झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील आरवली ते वाकेड हे 90 किमी अंतराचे काम एमईपी कंपनीकडे आहे. पण, अद्याप देखील हे काम अपूर्ण आहे. 2017 मध्ये या कामाला सुरुवात झाली होती. त्यानंतर नोव्हेंबर 2019 मध्ये हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. पण, 2020 हे वर्ष आता अर्धे सरले तरी अद्याप देखील हे काम पूर्ण झालेले नाही. कंपनीने आतापर्यंत केवळ 10 टक्केच काम केले आहे. ठरलेल्या वेळेत काम पूर्ण न झाल्याने या कंपनीला काम रद्द करण्याबाबत देखील नोटीस पाठवण्यात आली आहे. शिवाय, आतापर्यंत तीन वेळा काम पूर्ण होण्याकरता अधिकचा काळ अर्थात ईओटी देण्यात आले आहे. पण, त्यामध्ये कोणताही सुधारणा नाही. अशा परिस्थितीमध्ये देखील कंपनीला काम पूर्ण करण्यासाठी जून 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्यानं एमईपी कंपनीवर मेहेरबानी का? असा सवाल आता विचारला जात आहे. शिवाय कंपनीने मागील काही दिवसांमध्ये केलेले काम पाहता पुढील दीड वर्षात हे काम कसे पूर्ण होणार? असा सवाल देखील केला जात आहे. एमईपी कंपनीला दिलेल्या वाढीव कालावधीपैकी जवळपास 6 महिन्यांचा कालावधी हा लोटला असल्याचे देखील या पत्रावरुन स्पष्ट होत आहे.

नितीन गडकरींनी भूमीपूजन केलेल्या पुलाची अवस्था

2014 मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सप्तलिंगी या पुलाचे भूमिपुजन करत कामाचा शुभारंभ केला. पण, प्रत्यक्षात मात्र या पुलाचे केवळ 2 पोलच बांधून पूर्ण झालेले आहेत. शिवाय, काही ठिकाणी खोदकाम देखील करून ठेवलेले असल्याचे दिसून येते. पुलांच्या बांधकामाचं कंत्राट हे दुसऱ्या एका कंपनीकडे होते. पण, हे काम पूर्ण करण्यास देखील संबंधित कंपनीला यश आलेले नाही. परिणामी नव्याने निविदा काढण्यात आली असून पुढील वर्षभरात हे काम पूर्ण होईल असा विश्वास अधिकारी व्यक्त करतात.

आणखी किमान 3 वर्षाचा कालावधी

एमईपी कंपनीला आरवली ते वाकेड हे 90 किमीचे काम पूर्ण करण्यासाठी वाढीव दीड वर्षाचा कालावधी देण्यात आलेला असला तरी किमान तीन वर्षे किंवा त्यापेक्षा देखील जास्त कालावधी लागू शकतो असा अंदाज जाणकार व्यक्त करतात. या गोष्टीला एनएचएआयचे अधिकारी देखील दुजोरा देतात.

Nisarga Cyclone Effect | रत्नागिरीला 'निसर्ग'चा तडाखा, अनेकांचा संसार उघड्यावर

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
Eknath Shinde : मनोज जरांगे म्हणाले, गद्दारीचा शिक्का पुसणार होतो; एकनाथ शिंदेंचे जरांगेंना एका वाक्यात उत्तर, म्हणाले....
मनोज जरांगे म्हणाले, गद्दारीचा शिक्का पुसणार होतो; एकनाथ शिंदेंचे जरांगेंना एका वाक्यात उत्तर, म्हणाले....
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑगसस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑगसस्ट 2026 | गुरुवार
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Embed widget