![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
रत्नागिरी जिल्ह्यात पावसानं पाठ फिरवल्यानं बळीराजा चिंतेत; भातशेतीच्या लावणीवर परिणाम
कोकणात 11 जून रोजी मान्सून दाखल झाला त्यानंतर भातशेतीच्या कामांनी वेग धरला होता. परंतु, गेल्या चार ते पाच दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने मात्र गैरहजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत दिसून येत आहे.
![रत्नागिरी जिल्ह्यात पावसानं पाठ फिरवल्यानं बळीराजा चिंतेत; भातशेतीच्या लावणीवर परिणाम Monsson Update Farmers is worried In Ratnagiri district rice crop रत्नागिरी जिल्ह्यात पावसानं पाठ फिरवल्यानं बळीराजा चिंतेत; भातशेतीच्या लावणीवर परिणाम](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/06/25143719/Ratnagiri-Monsson01.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
रत्नागिरी : कोकणात 11 जून रोजी मान्सून दाखल झाला. पण, निसर्ग चक्रिवादळ कोकण किनारपट्टीला धडकलं आणि त्यानंतर पावसानं कोकणात हजेरी लावली. यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील भातशेतीच्या कामांना देखील वेग आला. अनेकांना पेरणी करत शेतीला सुरूवात केली. त्यानंतर आता हीच पिकं लावणी योग्य झाली आहेत. पण, मागील चार ते पाच दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने मात्र गैरहजेरी लावली आहे. त्यामुळे आता भातशेतीच्या लावणीवर सध्या परिणाम झालेला दिसून येत आहे. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये सारखीच परिस्थिती दिसून येत आहेत. काही भागांमध्ये पाणथळ जागा असलेल्या ठिकाणी सध्या लावणीचे काम सुरू आहे. पण, अनेक ठिकाणी पाणी उपलब्ध होत नसल्याने बळीराजा देखील आता त्रस्त झाला आहे. काहींनी तर अनेकांनी पावसावर विश्वास दाखवत भात काढून ठेवले. पण, मागील चार ते पाच दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे ही रोपे देखील आता सुकू लागली आहेत. जिल्ह्यातील काही ठिकाणी तर पावसाअभावी जमिनिला भेगा पडल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे आता करायचे तरी काय? असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडला आहे. मागील आठवड्यात सलग चार दिवस पावसाने जोरदार बॅटिंग केली. त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात होते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)