एक्स्प्लोर

Uday Samant : उद्योगांच्या संदर्भात येत्या 15 ते 20 दिवसात श्वेतपत्रिका काढणार, मंत्री उदय सामंतांची घोषणा

Uday Samant : महाराष्ट्रातील (Maharashtra) उद्योगांच्या संदर्भात येत्या 15 ते 20 दिवसांत श्वेतपत्रिका काढणार असल्याची घोषणा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली.

Uday Samant : महाराष्ट्रातील (Maharashtra) उद्योगांच्या संदर्भात येत्या 15 ते 20 दिवसात श्वेतपत्रिका (White Paper) काढणार असल्याची घोषणा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी केली. राज्याबाहेर प्रकल्प जात असल्याचे आरोप विरोधकांकडून होत आहेत. त्यामुळे श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. एक महिन्यात श्वेतपत्रिका काढण्याची नोव्हेंबरमध्ये महिन्यातीही घोषणा केली होती. मात्र, एक महिन्यात श्वेतपत्रिका निघाली नाही. त्यानंतर या महिन्यात श्वेतपत्रिका निघण्याची माहिती देण्यात आली आहे. 

प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे शिंदे -फडणवीस सरकारवर विरोधकांची टीका

वेदांत-फॉक्सकॉन, एअरबस आणि बल्क ड्रग पार्क आदी प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यामुळे शिंदे -फडणवीस सरकारवर महाविकास आघाडी सरकारने जोरदार टीका केली होती. त्यानंतर हे उद्योग आमच्या काळात राज्याबाहेर गेले नाहीत, असं स्पष्टीकरण उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलं होतं. तसेच उद्योगांवर श्वेतपत्रिका काढण्याची घोषणाही केली होती.

Rohit Pawar on Govt : श्वेतपत्रिका आधीच काढायला हवी होती  

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी श्वेतपत्रिका काढणार असल्याची घोषणा केली आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्योगाच्या संदर्भात श्वेतपत्रिका आधीच काढायला हवी होती. नोव्हेंबर महिन्यात श्वेतपत्रिका काढमार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, ती काढण्यात आली नसल्याचे रोहित पवार म्हणाले. हिवाळी अधिवेशनात जी आश्वासने दिली होती. ती अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले तरी पूर्ण केली नाहीत. मधल्या काळात सरकारनं काहीही केलं नाही. हे फक्त उद्योगांच्या बाबतीतच होते असे नाही, तर सगळ्याच गोष्टींच्या बाबतीत असे होत असल्याचे रोहित पवार म्हणाले.

व्हाईट पेपर म्हणजे काय? 

ज्या-ज्या वेळी एखाद्या मुद्द्यावरुन भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात, राजकीय चिखलफेक केली जाते, त्यावेळी त्या विषयाची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी केली जाते. ही श्वेतपत्रिका म्हणजे एखाद्या विषयाबाबत केंद्र किंवा राज्य सरकारने दिलेली अधिकृत माहिती किंवा निवेदन होय. आपण त्याला शासनाकडून काढण्यात आलेले माहितीपत्रक म्हणू शकतो. 

काय असतं या व्हाईट पेपरमध्ये? 

सरकारने एखाद्या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेतली, काय कृती केली त्याची संपूर्ण माहिती या श्वेतपत्रिकेत असते. शासनाची नेमक्या भूमिकेचा आणि कृतीचा अंदाज त्यामधून येतो. श्वेतपत्रिकेत नमूद असलेल्या माहितीचा कोणीही वापर करु शकतो. म्हणजे ती माहिती गोपनीय स्वरुपाची नसते. लोकप्रतिनिधींना आणि नागरिकांना माहिती नसलेल्या गोष्टी त्यांना माहित व्हाव्यात हा उद्देश श्वेतपत्रिका जारी करण्यामागे असतो. ज्यावेळी लोकांमध्ये एखाद्या मुद्द्यावरुन संभ्रम निर्माण होतो, त्यावेळी सत्ताधाऱ्यांकडून श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय घेतला जातो. 

जगातील सर्वात पहिली श्वेतपत्रिका ही ब्रिटनमध्ये काढण्यात आली. इस्त्रायलशी संबंधित बाल्फोर डिक्लरेशनशी संबंधित हा व्हाईट पेपर काढण्यात आला होता. भारतात 1947 साली, काश्मीरवर पाकिस्तानने हल्ला केला होता. त्या विषयावर भारतात सर्वप्रथम श्वेतपत्रिका जाहीर करण्यात आली होती. 

महत्त्वाच्या बातम्या:

White Paper : व्हाईट पेपर किंवा श्वेतपत्रिका म्हणजे काय? राज्यात आतापर्यंत कोणत्या विषयांवर श्वेतपत्रिका काढण्यात आली?

महत्त्वाच्या बातम्या

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget