एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२६

(Source: ECI/ABP News)

समीर वानखेडेंची बदली झाली तरी लढा सुरूच ठेवणार : नवाब मलिक

समीर वानखेडे यांची बदली करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्यच असल्याचे वक्तव्य अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे. वानखेडेंच्या मनमानी कारभारावर चाप बसणे गरजेचे होते, असेही मलिक म्हणाले.

Nawab Malik on Wankhede : मुंबई एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांची बदली करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्यच असल्याचे वक्तव्य अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.  वानखेडेंच्या मनमानी कारभारावर चाप बसणे गरजेचे होते. कारण, ते काही लोकांसाठी लॉबिंग करत होते. समीर वानखेडे यांची बदली झाली असली तरी लढाई संपलेली नाही. हा लढा चालूच राहणार असल्याचे मलिक यांनी सांगितले. जाडपातळणीबाबत चौकशी सुरू आहे. आमच्याकडे जे काही पुरावे ते सादर करणार असल्याचेही मलिक यांनी सांगितले.

युपीएससीच्या नोकरीत असताना त्यांनी सद्गुरू बार चा परवाना त्यांनी स्वत:च्या नावाने परवाना काढला होता. त्याबाबतीतसुद्धा कारवाई सुरू आहे. त्याचबरोबर दुसरे लग्न केल्यानंतर त्यांच्या पत्नीच्या संपत्तीबाबतीत माहिती लपवली आहे. त्याबाबतही आम्ही तक्रार केली होती. तसेच आर्यन खान प्रकरणाचीसुद्धा एसआयटी (SIT) चौकशी सुरू आहे. त्यामुळे मी जे काही मुद्दे उपस्थित केले होते, त्याचा पाठपुरावा करणार असून, जिथे जिथे बेकायदेसीर कामे केली आहेत, हे सिद्ध होईल आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे मलिक म्हणाले. 

एखादा व्यक्ती शासकीय नोकरीत असताना मनमानी कारभार करत असेल, चुकीच्या पद्धतीने अधिकाराचा गैरवापर करत असेल तर त्याच्यावर कारवाई करायला हवी. समीर वानखेडे यांच्यासाठी भाजपचे काही लोक लॉबिंग करत असल्याचा आरोपही यावेळी मलिक यांनी केला. मात्र, लॉबिंग करणारांची नावे आत्ताच सांगणार नसल्याचे यावेळी मलिक यांनी सांगितले.

लखीमपूर खेरी प्रकरणात केंद्र सरकार गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांची पाठराखण करत असल्याचे मलिक म्हणाले. याप्रकणी चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. गृहराज्य मंत्र्यांच्या मुलावर गुन्हा देखील दाखल झाला आहे. पण पंतप्रधान मोदी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप यावेळी मलिक यांनी केला आहे. याप्रकरणानंतर मोदींनी मंत्री अजय मिश्रा यांची हकालपट्टी करायला हवी होती असे मलिक म्हणाले. त्याचबरोब सत्यपाल मलिक यांनी मोदींबद्दल केलेले वक्तव्य गंभीर आहे. मोदींच्या चुकीच्या धोरणामुळेच शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप यावेळी मलिक यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime Nasrapur case: नसरापूर प्रकरणातील मुलीचा मृत्यू ॲस्फिक्सियामुळे, अंगावर जखमांचे व्रण, पोस्टमार्टम रिपोर्टमधील शॉकिंग माहिती
नसरापूर प्रकरणातील मुलीचा मृत्यू ॲस्फिक्सियामुळे, अंगावर जखमांचे व्रण, पोस्टमार्टम रिपोर्टमधील शॉकिंग माहिती
Gayatri Bhangale: शरद पवार गटाला मोठा धक्का, भाजप मंत्र्यांच्या पत्नीचा पराभव करणाऱ्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळेंची निवड रद्द; नेमकं कारण काय?
शरद पवार गटाला मोठा धक्का, भाजप मंत्र्यांच्या पत्नीचा पराभव करणाऱ्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळेंची निवड रद्द; नेमकं कारण काय?
Maharashtra Live blog updates: कोल्हापूर शहरात आजपासून होणार दररोज पाणीपुरवठा, ABP माझाच्या बातमीनंतर कोल्हापूर महापालिकेला उपरती
Maharashtra Live blog updates: कोल्हापूर शहरात आजपासून होणार दररोज पाणीपुरवठा, ABP माझाच्या बातमीनंतर कोल्हापूर महापालिकेला उपरती
Watermelon Death Case Mumbai: कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात नवी अपडेट, उपचार मिळण्यात साडेपाच तासांचा विलंब ठरला मृत्यूचे कारण? धक्कादायक माहिती समोर
कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात नवी अपडेट, उपचार मिळण्यात साडेपाच तासांचा विलंब ठरला मृत्यूचे कारण? धक्कादायक माहिती समोर

व्हिडीओ

Nasrapur Case Accused Wife : फाशी किरकोळ, जिवंत जाळा नसरापूरच्या आरोपीची पत्नी रडली
Ramdas Athwale on Bengal Election : ममता दीदींनी बंगालला कंगाल केलं, रामदास आठवलेंची खोचक टीका
Mamata Banerjee : तीन तास मतदान केंद्रावरच थांबल्या, बाहेर येताच ममता दीदींचा संताप; भाजपवर आरोप!
CM Devendra Fadnavis on Mamata Banerjee : पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन; फडणवीसांची ममता दीदींवर टीका
West Bengal Election Result : पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय कसा झालं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Watermelon Death Case Mumbai: कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात नवी अपडेट, उपचार मिळण्यात साडेपाच तासांचा विलंब ठरला मृत्यूचे कारण? धक्कादायक माहिती समोर
कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात नवी अपडेट, उपचार मिळण्यात साडेपाच तासांचा विलंब ठरला मृत्यूचे कारण? धक्कादायक माहिती समोर
Janhavi Kapoor Wedding: जान्हवी कपूर लाँग टाईम बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार? नक्की खरं काय? वडील बोनी कपूर म्हणाले...
जान्हवी कपूर लाँग टाईम बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार? नक्की खरं काय? वडील बोनी कपूर म्हणाले...
Bhor Accident News: भोरमध्ये भीषण अपघात; एसटी बस अन् इको कारची समोरासमोर धडकले; एकाचा जागीच मृत्यू, काही प्रवासी गंभीर जखमी
भोरमध्ये भीषण अपघात; एसटी बस अन् इको कारची समोरासमोर धडकले; एकाचा जागीच मृत्यू, काही प्रवासी गंभीर जखमी
Pune Crime Nasrapur: मोठी बातमी: नसरापूरमधील मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर, अंगावर काटा आणणारी माहिती, नराधमाने तोंडात....
नसरापूरमधील मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर, अंगावर काटा आणणारी माहिती, नराधमाने तोंडात....
Pune Nasrapur Bhor Crime: छातीवर वळ, तोंडात मोजा...; नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या शवविच्छेदन अहवालामध्ये काय काय?
छातीवर वळ, तोंडात मोजा...; नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या शवविच्छेदन अहवालामध्ये काय काय?
Tamil nadu Election Result 2026 Thalapathy Vijay: मुलींच्या लग्नासाठी सोनं, विद्यार्थ्यांना 15 हजार, शेतकऱ्यांचं सगळं कर्ज माफ; विजय थलपतीने 7 आश्वासनांनी तामिळनाडूच्या राजकारणाचा डीएनएच बदलला
मुलींच्या लग्नासाठी सोनं, विद्यार्थ्यांना 15 हजार, शेतकऱ्यांचं सगळं कर्ज माफ; विजय थलपतीने 7 आश्वासनांनी तामिळनाडूच्या राजकारणाचा डीएनएच बदलला
Thalapathy Vijay TVK Win Jofra Archer Tweet Viral: थलपती विजयच्या प्रचंड मोठ्या विजयाचं गुपित उलगडलं? जोफ्रा आर्चरच्या 10 वर्षांपूर्वीच्या ट्वीटनं लक्ष वेधलं
थलपती विजयच्या प्रचंड मोठ्या विजयाचं गुपित उलगडलं? जोफ्रा आर्चरच्या 10 वर्षांपूर्वीच्या ट्वीटनं लक्ष वेधलं
West Bengal Election Result 2026: ज्या भाजपला पश्चिम बंगालमध्ये पहिली सीट जिंकवून दिली त्यांनीच ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला हद्दपार केलं, धक्कादायक आकडेवारी समोर
ज्या भाजपला पश्चिम बंगालमध्ये पहिली सीट जिंकवून दिली त्यांनीच ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला हद्दपार केलं, धक्कादायक आकडेवारी समोर
Embed widget