एक्स्प्लोर

पालघरमध्ये पुढील तीन दिवस उन्हाचे चटके, त्यानंतर पाऊस; हवामान विभागाचा अंदाज 

Palghar News Update : पालघर जिल्ह्यात पुढील तीन दिवस उन्हाचे चटके आणि त्यानंतर अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मुंबई : पालघर जिल्ह्यात पुढील तीन दिवस उन्हाचे चटके आणि त्यानंतर अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  प्रादेशिक हवामान विभाग मुंबईद्वारे देण्यात आलेल्या अंदाजानुसार, पालघर जिल्ह्यात पुढील तीन दिवस कमाल तापमानात 2-3 अंश सेल्सीअसने वाढ होवून 11 ते 13 मार्च पर्यंत अनुक्रमे सरासरी 37, 38, आणि 38 अंश सेल्सियस तापमान राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर 14 व 15 तारखेला कमाल तापमानात घट होवून तुरळक ठिकाणी हालक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याबरोबर 13, 14 आणि 15 मार्च दरम्यान सकाळ आणि दुपारच्या आर्द्रतेत क्रमश वाढ होताना दिसून येईल व सकाळची आर्द्रता 50, 63, 70 टक्के आणि दुपारची आर्द्रता 33, 42, 48 टक्के राहण्याची संभावना आहे. 

मागील दोन दिवसापासून कमाल तापमानात वाढ आणि आर्द्रतेत घट होत असल्याची नोंद झाली आहे. कृषि  विज्ञान  केंद्र, कोसबाड हिल, पालघर येथील स्वयंचलित हवामान  केंद्रात 9 आणि 10 मार्च रोजी कमाल  तापमान 36.3, 32.2  अंश सेल्सियस आणि दुपारच्या आर्द्रतेची 40, 41 टक्के एवढी नोंद झाली आहे,अशी माहिती कृषि विज्ञान केंद्र, जिल्हा कृषि हवामान केंद्र, कोसबाड हिल येथील कृषि हवामान शास्त्रज्ञ् रिझवाना सय्यद यांनी दिली आहे.

कमाल तापमानात वाढ आणि आर्द्रतेत घट होत असल्याने शेतकऱ्यांनी जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी फळ बागांना गरजेनुसार नियमित पाणी देण्याची व्यवस्था करावी, पाणी देण्यासाठी संध्याकाळची किंवा सकाळची वेळ निवडावी. झाडांच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करावे, जेणेकरून बाष्पीभवन कमी होण्यास मदत होईल. नवीन लागवड केलेल्या रोपांची कडक उन्हामळे पाने करपू नयेत म्हणून रोपांना वरून सावली करावी, सिंचन व्यवस्थापनासाठी शक्यतो ठिबक व तुषार सिंचनाचा अवलंब करावा, वाढत्या उष्णतेपासून जनावरांचे आणि कोंबड्याच्या संरक्षण करावे असा सल्ला कृषि विज्ञान केंद्र कोसबाडचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव यांच्याकडून आला आहे. 

14 ते 15 मार्च 2023 दरम्यान पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने तयार झालेल्या भाजीपाला, फळे व रब्बी पिकांची काढणी करून घ्यावी, जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता लक्षात घेता आंबा मोहोरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. जसे मोहोर गळून जाणे, मोहोरतून बाहेर पडलेल्या छोट्या फळांची गळ होणे, नियमित पोषक फवारणी पत्रकाचा वापर केला असेल तर पिकांवरील समस्या कमी होईल. मात्र ज्या शेतकऱ्यांनी अद्याप फळधारणा झाल्यानंतरची पोषक फवारणी घेतली नाही त्या बागांवर अशा अचानक पडलेल्या वादळी पावसाने नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. फळे वाटाणा आकाराची असताना 0-52-34 ची 1 टक्केने फवारणी करावी, फळे सुपारीएवढ्या आकाराची झाल्यानंतर 13-0-45 ची  एक टक्के तीव्रतेची फवारणी करावी आणि फळे अंड्याच्या आकाराची झाल्यानंतर  कोणतेही एक पोषक फवारावे.   प्रत्येक फवारणीमध्ये देशी गायीचे दहा टक्के गोमूत्र मिसळावे, जेणेकरून आंबा फळे गळण्याचे प्रमाण कमी होईल तसेच फळांचा आकार वाढविण्यासाठी मदत होईल. तसेच पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे मोहोरावर करपा रोग आणि भुरी रोग येण्याची शक्यता आहे, त्यासाठी एक टक्के कार्बनडेझिमची फवारणी करावी. या अवकाळी पावसामुळे मिरची पिकावरील रस शोषण करणाऱ्या किडी जसे फुलकिडे, मावा आणि पांढरी माशी यांचे प्रमाण काही प्रमाणात कमी होईल. परंतु हवेतील आर्द्रता आणि दमट वातावरणामुळे करपा रोग येण्याची शक्यता आहे. यासाठी शेतकरी बांधवांनी मंन्कोझेब (M 45) किंवा कोपर ऑक्सीक्लोराइड यापैकी एक बुरशीनाशक 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असा सल्ला पीक संरक्षण तज्ञ प्रा. उत्तम सहाणे यांनी दिला आहे.  

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Shivsena UBT: आधी सरनाईकांचा खळबळजनक दावा, मग कळंबचे नगरसेवक तानाजी सावंतांच्या भेटीला, उद्धव ठाकरेंनी कैलास पाटलांसह धाराशिवच्या सर्वांना मातोश्रीवर बोलावलं
आधी सरनाईकांचा खळबळजनक दावा, मग कळंबचे नगरसेवक तानाजी सावंतांच्या भेटीला, उद्धव ठाकरेंनी कैलास पाटलांसह धाराशिवच्या सर्वांना मातोश्रीवर बोलावलं
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Marathwada Rain Update: मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Embed widget