एक्स्प्लोर
रत्नागिरीजवळ मोटरमनशिवाय राजधानी एक्सप्रेस 15 किमी सुसाट

रत्नागिरी : थोडा विचार करा, तुम्ही ज्या ट्रेनमधून प्रवास करीत आहात, त्या ट्रेनचा मोटरमन/ड्रायव्हर नसेल तर. विश्वास बसंत नाही ना! पण ही घटना सोमवारी रत्नागिरीजवळ घडली. मडगांव ते निजामुद्दीनदरम्यान धावणारी राजधानी एक्सप्रेस रत्नागिरीजवळ तब्बल 15 किमी 'विना मोटरमन' धावली. आधिक माहितीनुसार, मडगांव-निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये रत्नागिरीजवळ काही तांत्रिक बिघाड आला. यामुळे रत्नागिरीजवळील बोगद्यापाशी ही ट्रेन थांबवण्यात आली. मोटरमन आणि टेक्निशिअन ट्रेनच्या इंजिनमध्ये कुठे बिघाड झाला आहे, याचा शोध घेत होते. पण ट्रेन उतारावर थांबल्याने ती तब्बल 15 किमी धावली. दरम्यान, ही ट्रेन 'विना ड्रायव्हर' 15 किमी धावल्याच्या वृत्ताला कोकण रेल्वेचे संचालक संजय गुप्ता यांनी फेटाळले असून उतारावर काही अंतरावर ही ट्रेन चालल्याचे म्हटले आहे. तसेच या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असल्याचेही त्यांनी सांगितले. या ट्रेनच्या इंजिनमधील व्हॅक्यूम ब्रेकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने या ट्रेनला थांबवण्यात आले होते. यानंतर या ट्रेनला दूसरे इंजिन जोडून ही पुढे पाठवण्यात आली.
Before You Go
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

प्रशांत बढे, एबीपी माझा
Opinion





















