एक्स्प्लोर

साहेब जगायचं कसं सागा? महापुरात उद्ध्वस्त शेतकऱ्यांची आर्त हाक; उद्धव ठाकरे म्हणाले, खचू नका, वेडंवाकडं पाऊल उचलू नका, आवाज सरकारपर्यंत पोहोचवतो

Marathwada Flood 2025: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौरा केला व शेतकऱ्यांना बांधावर जाऊन दिलासा दिला. यावेळी शेतकऱ्यांनी साहेब जगायचं तरी कसं सांगा? अशी आर्त विचारणा केली. 

Marathwada Flood 2025: सततची नापिकी आणि पाचवीलाच पुजलेल्या दुष्काळामुळे मराठवाडा अवघा होरपळून गेला असतानाच यंदा मात्र निसर्ग मराठवाड्यावर (Marathwada Flood 2025) अक्षरश: कोपला आहे. मराठवाड्यातील सर्व 8 जिल्ह्यांमध्ये महापुराने दैना केली आहे. मात्र, शेतीसुद्धा मातीसकट खरडून महापुरात गेली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर जगायचं तरी कसं? असा प्रश्न उपस्थित राहिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्याचे मंत्रिमंडळ मराठवाडा दौऱ्यावर असतानाच आज (25 सप्टेंबर) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Marathwada visit) यांनी मराठवाडा दौरा केला व शेतकऱ्यांना बांधावर जाऊन दिलासा दिला. यावेळी शेतकऱ्यांनी साहेब जगायचं तरी कसं सांगा? अशी आर्त विचारणा केली. 

वेडवाकडं पाऊल उचलू नका, आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवतो

यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या हाती काही नाही. मात्र, धीर देण्यासाठी आलो असल्याचे सांगत खचू नका, वेडवाकडं पाऊल उचलू नका, आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवतो अशी साद शेतकऱ्यांना घातली. यावेळी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना निवेदन सुद्धा दिलं. उद्धव ठाकरे यांनी लातूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर धाराशिवसाठी रवाना झाले. लातूरमधील काटगावमध्ये आणि तांदूळजामध्ये उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर साहेब आमची कर्जमाफी (Farmers loan waiver demand Maharashtra) झाली पाहिजे अशी मागणी केली. यावेळी आपल्याला मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. पंचनामे करताना अधिकारी आडमुट्टी भूमिका घेत असतील तर आपण सोबत आहोत, असे सांगत त्यांनी नुकसान पंचनाम्याबाबत (Panchanama flood damage Maharashtra) उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना धीर दिला.

 

 

सरकारने केलेली मदत पुरेशी आहे का?

यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सरकारने (Maharashtra flood relief package) केलेली मदत पुरेशी आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केल्यावर शेतकरी म्हणाले की, सर्व जमीनच वाहून गेली आहे. आता नवीन माती आणून टाकण्यापासून अनेक कामे करायची आहेत. त्यामुळे सरकारने हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत करावी, कर्जमाफी करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. जमिनी वाहून गेल्याने पुढील हंगाम सुद्धा अडचणीत आल्याचे शेतकरी म्हणाले. मुख्यमंत्री आले आणि निघून गेले, त्यांनी आमच्या समस्या जाणून घेतल्या नसल्याचे सांगत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. 

 

नुकसान पाहता जाहीर केलेली मदत तुटपंजी

जमीनच वाहून गेली आहे तर शेतकरी किती अडचणीत आला आहे याची जाणीव सरकारने ठेवावी. आता शेतकऱ्यांना जगण्यासाठी मोठी मदत आणि कर्जमाफीची गरज असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. मराठवाडा म्हणजे दुष्काळी भाग आहे, इथं आवर्षण नेहमी आहे. मात्र, पहिल्यांदाच इथं अतिवृष्टी झाली असून पूरपरिस्थितीचे मोठं संकट ओढवलं आहे. आता त्यातून बाहेर पडणे गरजेचं आहे. सरकारने जाहीर केलेली मदत 2023 च्या निकषांप्रमाणे असून नुकसान पाहता जाहीर केलेली मदत तुटपंजी आहे. या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना साथ सोबत करण्यासाठी आपण आलो असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Goverment Cabinet Decision: 36 हजार 585 कोटी रुपयांच्या शेतकरी कर्जमाफीला मंजुरी; मंत्रिमंडळाचे 3 धडाकेबाज निर्णय
36 हजार 585 कोटी रुपयांच्या शेतकरी कर्जमाफीला मंजुरी; मंत्रिमंडळाचे 3 धडाकेबाज निर्णय
मोठी बातमी! शेतकरी कर्जमाफी योजनेस कॅबिनेट बैठकीत मंजुरी; राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना लाभ
मोठी बातमी! शेतकरी कर्जमाफी योजनेस कॅबिनेट बैठकीत मंजुरी; राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना लाभ
Maharashtra Live News Updates: शेतकरी कर्ज माफी योजनेला मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता; पण आचारसंहितेमुळं घोषणा नाही
Maharashtra Live News Updates: शेतकरी कर्ज माफी योजनेला मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता; पण आचारसंहितेमुळं घोषणा नाही
Bhaskar Jadhav : नाना तऱ्हेचे प्रयत्न करूनही भाजपला अपयश, म्हणून महायुतीत कोकणची जागा शिवसेने ऐवजी राष्ट्रवादीला; भास्कर जाधवांनी सांगितलं 'राज'कारण, म्हणाले....
नाना तऱ्हेचे प्रयत्न करूनही भाजपला अपयश, म्हणून महायुतीत कोकणची जागा शिवसेने ऐवजी राष्ट्रवादीला; भास्कर जाधवांनी सांगितलं 'राज'कारण, म्हणाले....

व्हिडीओ

Girish Mahajan Jalgaon : राऊत, वडेट्टीवार बोल बच्चन नेते, त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी
Devendra Fadnavis On Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांकडून सगळे पैसे वसूल करणार
Dilip Walse Patil Pimpari : विलास लांडेंच्या घरी दिलीप वळसे पाटील, नाराजांची मनधरणी होणार?
Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dattatray Gade Swargate case: गुगल सर्च हिस्टरी, सीसीटीव्ही, ध्वनी तीव्रता पडताळणी मुख्य पुरावा! स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेविरुद्ध दोषारोप निश्चित
गुगल सर्च हिस्टरी, सीसीटीव्ही, ध्वनी तीव्रता पडताळणी मुख्य पुरावा! स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेविरुद्ध दोषारोप निश्चित
मोठी बातमी! शेतकरी कर्जमाफी योजनेस कॅबिनेट बैठकीत मंजुरी; राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना लाभ
मोठी बातमी! शेतकरी कर्जमाफी योजनेस कॅबिनेट बैठकीत मंजुरी; राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना लाभ
Supriya Sule: सुप्रिया सुळेंचे विहीणबाईंसोबत खास फोटो, एकमेकींना हळद-कुंकू लावून औक्षण, व्याही अरुण लखाणी, सदानंद सुळेही एकाच फ्रेममध्ये
सुप्रिया सुळेंचे विहीणबाईंसोबत खास फोटो, एकमेकींना हळद-कुंकू लावून औक्षण, व्याही अरुण लखाणी, सदानंद सुळेही एकाच फ्रेममध्ये
Umesh Patil :
"पैशाने उमेदवारी दिली असती, तर अंबानी-अदानींची मुलं खासदार झाली असती!" विक्रम काकडेंच्या उमेदवारीवर उमेश पाटलांचे सडेतोड उत्तर
माझा मतदार लंब्या टोपीचा, अब्दुल सत्तारांचा मतदार गोल टोपीचा; रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल, शिवसेना एकत्रच्या वक्तव्यावरही बोलले
माझा मतदार लंब्या टोपीचा, अब्दुल सत्तारांचा मतदार गोल टोपीचा; रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल, शिवसेना एकत्रच्या वक्तव्यावरही बोलले
Gold-Silver Price Today: सोन्या-चांदीचे भाव काय? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील 18K, 22K आणि 24K चे दर
सोन्या-चांदीचे भाव काय? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील 18K, 22K आणि 24K चे दर
Supriya Sule and Arun Lakhani: अरुण लखाणी आणि आमची राजकीय विचारधारा वेगळी, त्याचा कौटुंबिक नात्याशी संबंध नाही: सुप्रिया सुळे
अरुण लखाणी आणि आमची राजकीय विचारधारा वेगळी, त्याचा कौटुंबिक नात्याशी संबंध नाही: सुप्रिया सुळे
मोठी बातमी! पुण्यात विक्रम काकडे, सोलापुरात राजेंद्र राऊतांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप; नेमकं कारण काय?
मोठी बातमी! पुण्यात विक्रम काकडे, सोलापुरात राजेंद्र राऊतांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप; नेमकं कारण काय?
Embed widget