एक्स्प्लोर

आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडताना दसतेय, न्यायालयात टिकेल का?; घटनातज्ज्ञ उल्हास बापट म्हणतात...

Maratha Reservation Special Assembly session : हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकेल का याबद्दल शंका असल्याचं घटनातज्ज्ञ उल्हास बापट म्हणाले आहेत. 

Maratha Reservation Special Assembly session : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्याबाबत निर्णय घेण्यासाठी आज विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. अशात हे आरक्षण न्यायालयात टिकणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, यावरच घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी आपली भूमिका मांडली आहे. "नवीन विधेयक आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडताना दसतेय. आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्के असायला हवी हे सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा स्पष्ट केले आहे. त्यामुळे हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकेल का याबद्दल शंका असल्याचं घटनातज्ज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat) म्हणाले आहेत. 

पुढे बोलतांना घटनातज्ज्ञ उल्हास बापट म्हणाले की, “मराठा समाज जर खरच सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे, तर मराठा समाजाला ओबीसींमधुन आरक्षण द्यायला हवे. अन्यथा असे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणे अवघड आहे. पन्नास टक्क्यांची मर्यादा अपवादात्मक परिस्थितीत ओलांडता येते. तामिळनाडूत ती ओलांडून आरक्षण देण्यात आलय. पण त्यासाठी त्यावेळच्या केंद्र सरकारकडून कायद्यात बदल करण्यात आला होता. तामिळनाडूत आरक्षणाची पन्नास टक्क्यांच मर्यादा ओलांडता यावी यासाठी त्यावेळच्या केंद्र सरकारकडून तामिळनाडू सरकारचा कायदा घटनेच्या नवव्या सुचीमधे समाविष्ट करण्यात आला. त्यामुळे तामिळनाडूतील आरक्षण टिकले. मात्र मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारकडून नवव्या सुचीत समाविष्ट करण्याबाबत कोणती पावले उचलण्यात आलेली नाहीत, असे बापट म्हणाले. 

पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली जातेय 

तर, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्रीपदी असताना दिलेले आरक्षण,  देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपद असताना दिलेले आरक्षण आणि आता एकनाथ शिंदें असताना दिलेले आरक्षण यात मुलभूत फरक नाही. चव्हाण असताना ते 16 टक्के होते,  फडणवीस असताना 13 टक्के तर शिंदें असताना ते 10 टक्के आहे. मात्र प्रत्येक वेळेस ते स्वतंत्र देण्यात आलय, ज्यामुळे पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली जातेय, असे बापट म्हणाले. 

एकत्र येऊन निर्णय घेण्याची गरज 

यावेळेस राज्य मागासवर्ग आयोगाकडून करण्यात आलेले सर्वेक्षण अडीच कोटी कुटुंबांचे आहे,  अधिक व्यापक स्वरुपाच आहे असा दावा केला जातोय.  मात्र निष्कर्ष मात्र आधीच्याच आयोगांसारखा आहे. मराठा समाज खरच मागास आहे.  या समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्व नेत्यांनी एकत्र येऊन निर्णय घेण्याची गरज आहे. भाकरी अर्धी अर्धी वाटून घेतली पाहिजे. हीच आपली संस्कृती असून, मात्र त्यासाठी योग्य प्रक्रिया राबविणची गरज असल्याचे बापट म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या :

 Maratha Reservation Bill: मराठा आरक्षण कधीपासून लागू, कुठे कुठे आरक्षण, OBC मधून का नाही?, तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Embed widget