Majha Samvad LIVE UPDATES : माझा संवाद : सुजात आंबेडकर यांच्याशी बातचित, आंबेडकरांच्या नव्या पिढीचं व्हिजन
एक दोन नव्हे तर 14 वर्षे.... होय... महाराष्ट्राचं नंबर 1 न्यूज चॅनल ही ओळख एबीपी माझानं 14 वर्षे कायम ठेवली आहे. अचूक आणि जलद बातमी... प्रेक्षकांची विश्वासर्हता या त्रिसुत्रीची कास एबीपी माझानं कधी सोडली नाही आणि सोडणारही नाही. एबीपी माझावर आज दिवसभर वर्धापन दिनानिमित्त खास कार्यक्रमांचं प्रक्षेपण केलं जाणार आहे. महाराष्ट्रातल्या तरुणांचं प्रतिनिधित्व करणाऱ्यांशी आम्ही दिवसभर मंथन करणार आहोत, माझा संवाद या विशेष मालिकेत.

Background
मुंबई : एबीपी माझा वृत्तवाहिनीला आज 14 वर्ष पूर्ण झाली आहेत. आम्ही आता 15व्या वर्षात पदार्पण करत आहोत. या 14व्या वर्षांच्या प्रवासात तुमची साथ आमच्यासाठी अमुल्य आहे. 14 वर्षांच्या प्रवासात ABP Network एबीपी नेटवर्कने देखील आपल्यात महत्वाचे बदल केले आहेत. या बदलांना प्रेक्षकांनीही साथ दिली. हा 14 वर्षांचा प्रवास सोपा नव्हता, पण तो केवळ प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच शक्य झाला.
एक दोन नव्हे तर 14 वर्षे.... होय... महाराष्ट्राचं नंबर 1 न्यूज चॅनल ही ओळख एबीपी माझानं 14 वर्षे कायम ठेवली आहे. अचूक आणि जलद बातमी... प्रेक्षकांची विश्वासर्हता या त्रिसुत्रीची कास एबीपी माझानं कधी सोडली नाही आणि सोडणारही नाही. एबीपी माझावर आज दिवसभर वर्धापन दिनानिमित्त खास कार्यक्रमांचं प्रक्षेपण केलं जाणार आहे. दरम्यान एबीपी माझाच्या 14 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना बोलतं केलंय संजय राऊत यांनी. 10 वाजता हा कट्टा पाहायला विसरु नका आणि माझा कट्ट्यानंतर महाराष्ट्रातल्या तरुणांचं प्रतिनिधित्व करणाऱ्यांशी आम्ही दिवसभर मंथन करणार आहोत, माझा संवाद या विशेष मालिकेत.
'एबीपी माझा'च्या 14 वर्षांच्या प्रवासात आणखी एक आनंदाचा क्षण जोडला गेला आहे. 'एबीपी माझा'च्यावर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला सर्वात मोठा माझा इम्पॅक्ट दिसून आला आहे. एबीपी माझाच्या बातमीने 30 वर्ष अंधारात खितपत पडलेल्या बरडवस्ती प्रकाशमान झाली. आतापर्यंत अंधारात असलेलं औरंगाबादमधील बरड गाव 'एबीपी माझा'च्या बातमीनंतर प्रकाशमान झालं. आहे. तब्बल 30 वर्ष हे गाव अंधारत होतं. गावात वीजच नव्हती. एबीपी माझाने गावच्या आधारलेल्या व्यथा मांडल्या आणि अवघ्या 10 दिवसांत गाव प्रकाशमान झालं. गावकऱ्यांच्या आनंदला पारावार उरला नाही. गावकऱ्यांनी आज आनंदाने गुढ्या उभ्या केल्या आहेत.
टाटा कॅन्सर हॉस्पिटलसाठी म्हाडाने दिलेल्या शंभर खोल्यांच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती
टाटा कॅन्सर हॉस्पिटलसाठी म्हाडाने दिलेल्या शंभर खोल्यांच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती, टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना तात्पुरतं राहण्यासाठी म्हाडाने दिल्या होत्या 100 खोल्या, मात्र स्थानिक शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांची स्थगिती, त्या इमारतीमध्ये इतर रहिवाशांची तक्रार असल्याचं सांगत दिली स्थगिती, शरद पवार यांच्या उपस्थित हा कार्यकम पार पडला होता, कोणतीच चर्चा न करता मुख्यमंत्री यांनी स्थगिती दिल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता
टाटा कॅन्सर हॉस्पिटलसाठी म्हाडाने दिलेल्या शंभर खोल्यांच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती
टाटा कॅन्सर हॉस्पिटलसाठी म्हाडाने दिलेल्या शंभर खोल्यांच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती, टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना तात्पुरतं राहण्यासाठी म्हाडाने दिल्या होत्या 100 खोल्या, मात्र स्थानिक शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांची स्थगिती, त्या इमारतीमध्ये इतर रहिवाशांची तक्रार असल्याचं सांगत दिली स्थगिती, शरद पवार यांच्या उपस्थित हा कार्यकम पार पडला होता, कोणतीच चर्चा न करता मुख्यमंत्री यांनी स्थगिती दिल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता























