एक्स्प्लोर

Majha Maharashtra Majha Vision 2024 : 'अजित पवारांना पक्षात हवी ती पदं दिली, मात्र त्यांनी...'; माझा व्हिजनमध्ये नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

Supriya Sule on Ajit Pawar : अजित पवारांना पक्षात हवी होती ती पद दिली. अजित पवारांनी आता वेगळी विचारधारा मान्य केली आहे. आता त्यांनी त्यांच्या विचारधारेत काम करावे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

Majha Maharashtra Majha Vision 2024 : अजित पवारांना (Ajit Pawar) पक्षात हवी होती ती पद दिली. अजित पवारांनी आता वेगळी विचारधारा मान्य केली आहे. आता त्यांनी त्यांच्या विचारधारेत काम करावे, असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केले आहे.  एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन' या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. 

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजित पवारांना पक्षात हवी होती ती पद दिली. अजित पवार आमच्याकडे असताना ते एकच उपमुख्यमंत्री होते. आता दोन उपमुख्यमंत्री आहेत. कामाचे वेगवेगळे विभाजन झालेले दिसत आहे. त्यांची काही वैयक्तिक कारणे असतील. मला असे वाटच नाही की, अजित पवारांमध्ये काही अस्वस्थता होती. त्यांना जे जे पद हवे होते ते ते पद त्यांना एकमताने देण्यात आले आहे.  अध्यक्षपदाची मिटिंग होती मात्र त्याआधीच अजित पवारांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. 

...त्यामुळे आपली विश्वासार्हता वाढते

शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यावेळी अजित पवारांवर कार्यकर्ते सांभाळायची जबाबदारी देण्यात आली होती. अजित दादांना जाणीवपूर्वक व्हिलन ठरवले गेले, असे अजित दादांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अशा अनेक चर्चा होतात. ज्यांनी कोणी तुम्हाला असे सांगितले असेल त्यांनी त्या ऑन रेकॉर्ड सांगाव्यात. मला सगळे सांगायचे नाही. काही गोष्टी आयुष्यभर गुपित ठेवायच्या असतात. त्यामुळे आपली विश्वासार्हता वाढते, असेही त्यांनी म्हटले आहे.

आम्ही आमच्या विचारधारेत काम करू

शरद पवारांनीच अजित पवारांना सत्तेत सामील होण्यास सांगितले, अशी चर्चा होत असते. यावर सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, आता काहीच राहिलेले नाही. अजित पवारांनी आता एक वेगळी विचारधारा मान्य केली आहे. ती विचारधारा आमची नाही. त्यामुळे आता असा प्रश्नच येत नाही. त्यांनी त्यांच्या विचारधारेत काम करावे. आम्ही आमच्या विचारधारेत काम करू, असे त्यांनी म्हटले आहे.

माझ्यावर चव्हाण साहेबांचे संस्कार

प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष येतोच. आता माझी वेळ आहे. याआधीही  संकट आलेत. अडचणी सगळ्यांना येतात. आपण मक्तेदारीतून बाहेर पडावे. राजकारण म्हणजे पक्ष फोडणे, घर फोडणे नव्हे. माझ्यावर चव्हाण साहेबांचे संस्कार झालेत. त्यात ८० टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करायचे असते, असे माझ्यावर संस्कार झालेत. आता 24 तास नुसते राजकारण सुरु आहे. मग देशाची सेवा कधी करणार? आता नैतिकता राहिली नाहीये. आता नैतिकता सोडून सगळे चालले आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. 

आणखी वाचा 

Majha Maharashtra Majha Vision 2024 : 'ज्यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप केले त्या सर्वांची पारदर्शकपणे चौकशी करा'; सुप्रिया सुळेंचे फडणवीसांना आव्हान

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
Kiran Samant : मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narendra Modi on Delhi Election | नारी शक्तीने दिल्लीत भाजपला आशीर्वाद दिला, मोदींची प्रतिक्रियाNarendra Modi on Delhi Election | आपने मेट्रोचं काम रखडून ठेवलं, नरेंद्र मोदींची केजरीवालांवर टीकाNarendra Modi on Delhi Election| आम्ही दिल्लीत नवीन इतिहास घडवला, नरेंद्र मोदींचे प्रतिपादनDelhi Election Result 2025 : दिल्लीत 27 वर्षांनंतर भाजप सत्तेत, विधानसभेत फुललं कमळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
Kiran Samant : मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
Delhi Election : 'गर्व आणि अहंकाराचा चक्काचूर झाला, केजरीवाल रागाच्या भरात वस्तू फोडतात, शिवीगाळ करतात, मला हाकलून लावण्याचा प्रयत्न, पण..' सत्ता जाताच 'आप' खासदाराचा गंभीर आरोप
'गर्व आणि अहंकाराचा चक्काचूर झाला, केजरीवाल रागाच्या भरात वस्तू फोडतात, शिवीगाळ करतात, मला हाकलून लावण्याचा प्रयत्न, पण..' सत्ता जाताच 'आप' खासदाराचा गंभीर आरोप
Delhi Election Result 2025 : कुंभमेळ्याला न मानणाऱ्या काँग्रेसचं खातंही उघडलं नाही; नवनीत राणांचा प्रहार, केजरीवालांवरही हल्लाबोल
कुंभमेळ्याला न मानणाऱ्या काँग्रेसचं खातंही उघडलं नाही; नवनीत राणांचा प्रहार, केजरीवालांवरही हल्लाबोल
Delhi Assembly Election 2025: दिल्लीत भाजपची तोफ वाजली पण तिकडे अजित पवारांचे सर्व 30उमेदवार आपटले, सगळ्यांचे डिपॉझिट जप्त
दिल्लीत भाजपची तोफ वाजली पण तिकडे अजित पवारांचे सर्व 30 उमेदवार आपटले, सगळ्यांचे डिपॉझिट जप्त
Rohit Pawar on Delhi Election : तर भाजप 20 जागांवर देखील गेली नसती; आमदार रोहित पवारांनी दिल्लीचे 'गणित' समजावून सांगितलं!
तर भाजप 20 जागांवर देखील गेली नसती; आमदार रोहित पवारांनी दिल्लीचे 'गणित' समजावून सांगितलं!
Embed widget