एक्स्प्लोर

Majha Katta : बच्चू कडूंनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा देण्याचा निर्णय का घेतला? माझा कट्ट्यावर केला खुलासा

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत जाणं आनंदाचे नव्हते, असे मत आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी व्यक्त केले. पण त्यांच्यासोबत का गेलो, याचा खुलासा त्यांनी माझा कट्ट्यावर केला.

Majha Katta With Bachchu Kadu : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गुवाहाटीला जाणं आनंदाचे नव्हते. कारण एखाद्या बांधलेल्या घरातून जाताना दु:ख होते, असे मत आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी व्यक्त केले. माझ्या मतदारसंघातले काही प्रकल्प अपूर्ण राहिले आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या संदर्भातील, दिव्यांगाच्या संदर्भातील काही प्रश्न सुटले नसल्याचे बच्चू कडू म्हणाले. याबाबत मी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना भेटलोही होतो. हे प्रश्न सोडवण्याची उद्धव ठाकरेंची इच्छाही होती. पण त्यांच्या आजूबाजूचे जे अधिकारी होते ते कामच करत नव्हते, असेही कडू यावेळी म्हणाले. अडीच वर्षाच्या काळात दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी एकही बैठक झाली नसल्याचे ते म्हणाले. 

उद्धव ठाकरेंबद्दल आजही आस्था कायम

उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मला आजही आस्था कायम आहे. पण मातोश्रीवर ते जेवढे मजबूत आणि शोभून होते, तेवढे ते वर्षावर नव्हते, हे खर आहे. मी त्या गोष्टी अनुभवत होतो. मागच्या अडची वर्षाच्या काळात दिव्यांगांच्या प्रश्नाबाबत एकही बैठक झाली नसल्याचे कडू यावेळी म्हणाले. सत्तेत गेल्यावर काही महत्वाचे, राज्य स्तरावरचे विषय असतात, काही मतदारसंघातील विषय असतात. ते विषय पूर्ण झाले नाहीत. त्यामुळं लोक लगेच विचारत होते की, तुम्ही राज्यमंत्री आहेत तर मग प्रश्न का सुटत नाहीत असे बच्चू कडू म्हणाले. त्यामुळं या गोष्टी मला खटकत होत्या. दरम्यान, मुख्यमंत्री पदाचा कारभार नव्यानं उद्धव ठाकरे यांच्याकडे आल्यानं तो पुढे घेऊन कसं जायचं हे त्यांना माहित नव्हते. याबाबत मी त्यांना दोष देणार नाही पण, काही गोष्टी होतात असेही बच्चू कडू म्हणाले. 

एकनाथ शिंदे यांच्यामुळेच मी पाठिंबा दिला होता

एकनाथ शिंदे यांच्यामुळंचं मी महाविकास आघाडीला सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता असेही बच्चू कडू यावेळी म्हणाले. त्यांच्याशी मैत्रीचं नातं होते. त्यामुळं सुरुवातीला त्यांना नाही म्हणता आलं नाही असेही कडू यावेळी म्हणाले. दरम्यान, मतदारसंघातील काम होण्यासाठी सत्ता महत्त्वाची असते. पण सत्तेत असूनही काही प्रश्न सुटले नसल्याचे कडू यावेळी म्हणाले. मी 15 वर्ष विरोधात काम केलं. तरी मतदारसंघातील लोक मलाच मत देत असल्याचेही कडू यावेळी म्हणाले. 

मला गुवाहाटीवरुन परत यायचे होते पण....

आमचा बापजादा कोणाही राजकारणात नाही. जात पात धर्म आम्ही कधी बघितला नाही. आम्ही राजकारणात काही तत्व जपली. पण राजकारणात काही वेळा रणनिती करावी लागते. रणनिती आखताना काही तत्व बाजूला ठेवावी लागतात, त्याचे दु:ख होते असेही कडू यावेळी म्हणाले. मी गुवाहाटीला जाऊ नये असे बऱ्याच लोकांना वाटत होते, पण मी गेलो असेही कडू म्हणाले. मला तिथे गेल्यावर पाठिंबा आहे, असं सांगून परत यायचे होते पण येता नाही आले. ती वेळ अशी असते की, आलेला माणूस परत जाऊ नाही द्यायचा, असे ते म्हणाले.  

महत्त्वाच्या बातम्या:

Majha Katta : रवी राणांना पुढे करुन जर कुणी गेम करत असेल तर.... बच्चू कडूंचा थेट इशारा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांना मरणोत्तर राजर्षी शाहू पुरस्कार घोषित
Maharashtra Live News Updates: ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांना मरणोत्तर राजर्षी शाहू पुरस्कार घोषित
Navneet Rana Meet Devendra Fadnavis: पुन्हा एकदा ट्विस्ट! राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
पुन्हा एकदा ट्विस्ट! राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
Sunetra Pawar On Aniket Tatkare Vidhan Parishad Election 2026: कोकणातून अनिकेत तटकरेंची बिनविरोध निवड; सुनेत्रा पवारांची पहिली पोस्ट, म्हणाल्या...
कोकणातून अनिकेत तटकरेंची बिनविरोध निवड; सुनेत्रा पवारांची पहिली पोस्ट, म्हणाल्या...
Tukaram Munde News: जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी

व्हिडीओ

Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report
MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
Nitesh Rane on Vidhan Parishad : ठाकरेंचा उमेदवार फोडला की फुटला?नितेश राणे म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Munde News: जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
Ulhasnagar : उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Bala Mane : ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
Congress Rajya Sabha List: भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
Virat Kohli: 'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
KS Bharat: वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
Embed widget