एक्स्प्लोर

EXCLUSIVE : पंजाबचे साथी सांगत होते, तुस्सी चिंता ना करो, सिंघू बॉर्डरवर तळ ठोकणाऱ्या मराठमोळ्या शेतकरी महिलेचा थरारक अनुभव

शेतकरी आंदोलनादरम्याम 700 शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. मरण पावलेल्या महिलांमध्ये महाराष्ट्राच्याही एका महिलेचा समावेश असल्याचे प्रतिभाताईंनी सांगितले.

Farmers Protest Called Off : कृषी कायद्यांविरोधात तब्बल 378 दिवस सुरु असलेलं ऐतिहासिक शेतकरी आंदोलन (Farmers Protest) मागे घेतल्याचे शेतकरी नेत्यांनी नुकतेच जाहीर केले. केंद्र सरकारकडून आलेल्या प्रस्तावावर एकमत झाल्यानंतर शेतकरी संघटनांकडून गुरुवारी शेतकरी आंदोलन (Farmers Protest) संपवण्याची घोषणा करण्यात आली. यापूर्वी शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत कृषी सचिवांच्या स्वाक्षरीने शासनाकडून पत्र पाठविण्यात आले होते. त्यानंतर संयुक्त किसान मोर्चाने बैठक घेतली. बैठक संपल्यानंतर आंदोलन मागे घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. या आंदोलनात महिला शेतकऱ्यांचाही मोठा सहभात होता. त्यातीलच शेतकरी नेत्या प्रतिभाताई शिंदे यांनी या आंदोलनातील काही अनुभव सांगितले आहेत. प्रतिभाताई या आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत सिंघू बॉर्डरवर तळ ठोकून बसल्या होत्या. आंदोलन चिरडण्यासाठी अनेक कट-कारस्थाने झाली. वाटेत खिळे ठोकण्यापासून ते शेतकऱ्यांच्या अंगावर पाणी मारणे. अशी एक ना अनेक  कारस्थाने झाली परंतु, महाराष्ट्राची ही वाघीन मागे हटली नाही.  

शेतकरी आंदोलनादरम्याम 700 शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. जीव गमवावा लागलेल्या शेतकऱ्यांमध्ये महिलांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे मरण पावलेल्या महिलांमध्ये महाराष्ट्राच्याही एका महिलेचा समावेश असल्याचे प्रतिभाताईंनी सांगितले. महाराष्ट्रातल्या सीताबाई तडवी या ऐतिहासिक आंदोलनाल्या पहिल्या महिला शहीद झाल्या आहेत. पंजाब, हरियाणा आणि राजस्थान सरकार शेतकऱ्यांना मदत करत आहेत. तेलंगणा तर त्यांचा एकही शेतकरी शहीद नसताना सर्व शहिदांना मदत करत आहेत. परंतु, महाराष्ट्र सरकार याबाबत अजून का उदासीन का? असा प्रश्न उपस्थित करत "महाविकास आघाडी सरकारने लखीमपूरच्या घटनेमध्ये बंद केला, पण आपली एक महिला शहीद होऊनही तिची साधी नोंदही नाही," याबाबत प्रतिभाताई शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. 

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे का घेतले नाहीत? 
"शेतकरी कायद्यांच्या विरोधात महाराष्ट्रातही आंदोलनं झाली. त्यात जवळपास 20 हजार गुन्हे दाखल झाले आहेत पण अजूनही या केसेस मागे का घेतल्या गेलेल्या नाहीत?" असा प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केला. 

"शेतकरी आंदोलनांना फुटीचा शाप आहे असं म्हटलं जातं. इतिहासात अनेक संघटना देखील फुटत आल्या आहेत. पण या आंदोलनात ते होऊ दिलं नाही. कुठलाही राजकीय नेता स्टेजवर येणार नाही हे पहिल्यापासून ठरवलं होतं ते कायम राहिलं. त्यामुळेच हे आंदोलन यशस्वी झालं. या आंदोलनामध्ये महिलांचाही सहभाग मोठ्या प्रमाणावर असल्याचे," शिंदे यांनी सांगितले. 

"जातीपाती पलीकडे जाऊन सर्व जातींचे शेतकरी आंदोलनासाठी एकत्र आले. मुजफ्फरनगर महा पंचायतीत हर हर महादेव, अल्लाहू अकबर, संत श्री अकालसह सर्व घोषणा एकत्रित दिल्या गेल्या. आमच्यासारख्या काही लोकांना शंका होती कायदे मागे घेतले जातील का? कारण मोदींना मी गुजरातमध्ये पाहिलं होतं. आंदोलना प्रति त्यांचा असलेला राग आम्हाला माहिती होता. पण हे पंजाबचे सगळे साथी तुस्सी चिंता ना करो असं म्हणत पहिल्यापासून ठाम होते."

"लोकांनीही या आंदोलनाला खूप मदत केली. एकट्या सिंघू बॉर्डरवर केवळ पैशांच्या रुपात सहा कोटी रुपयांची मदत ऑडिटसह जमा झाली. बाकीची वस्तू रुपी मदत तर खूप मोठ्या प्रमाणात जमा झाली. स्वातंत्र्याचं आंदोलन तर आम्ही बघितलं नाही पण हे आंदोलन पाहिलं. त्या आंदोलना प्रमाणेच हे देखील अहिंसेच्या मार्गाने झालेलं आंदोलन आहे. परंतु, दुर्देवाची बाब म्हणजे 700 शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. देशाच्या इतिहासात आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले असतील पण समर्थकांच्याही ही केसेस मागे घ्याव्या लागल्या." असे शिंदे म्हणाल्या.  

संबंधित बातम्या 

Farmers Protest Called Off : अखेर 378 दिवसांनी ऐतिहासिक शेतकरी आंदोलन स्थगित

End of Farmers Protest : आंदोलन स्थगितीनंतर बळीराजाची घरवापसीची लगबग; उद्या राजधानीच्या सीमेवर 'आनंदोत्सव'

 

महत्त्वाच्या बातम्या

'ते मारतात, मला वाचवा..' नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या अमानुष मारहाणीच्या धक्क्यातून पीडित महिला डॉक्टर अजूनही सावरलेल्या नाहीत, झोपेतही भयकंप
'ते मारतात, मला वाचवा..' नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या अमानुष मारहाणीच्या धक्क्यातून पीडित महिला डॉक्टर अजूनही सावरलेल्या नाहीत, झोपेतही भयकंप
पाण्यात बुडालेली जनता दिसली नाही, आता हेल्मेट पाहताय; ट्रॅफिक पोलिसाच्या दंडात्मक कारवाईवर वसई-विरारकर संतापले
पाण्यात बुडालेली जनता दिसली नाही, आता हेल्मेट पाहताय; ट्रॅफिक पोलिसाच्या दंडात्मक कारवाईवर वसई-विरारकर संतापले
Video: मिसिंग लिंकवरुन राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री हिंदीत का बोलले? मिमिक्री आर्टिस्ट म्हणत फडणवीसांचा पलटवार
Video: मिसिंग लिंकवरुन राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री हिंदीत का बोलले? मिमिक्री आर्टिस्ट म्हणत फडणवीसांचा पलटवार
Eknath Shinde on Missing Link : एक पैशाचा धोका झाला नाही, मिसिंग लिंकवरून टीका करणारे महाराष्ट्र द्रोहीच आहेत, हे राज्याचे दुश्मन; एकनाथ शिंदेंची टिप्पणी
एक पैशाचा धोका झाला नाही, मिसिंग लिंकवरून टीका करणारे महाराष्ट्र द्रोहीच आहेत, हे राज्याचे दुश्मन : एकनाथ शिंदे

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ते मारतात, मला वाचवा..' नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या अमानुष मारहाणीच्या धक्क्यातून पीडित महिला डॉक्टर अजूनही सावरलेल्या नाहीत, झोपेतही भयकंप
'ते मारतात, मला वाचवा..' नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या अमानुष मारहाणीच्या धक्क्यातून पीडित महिला डॉक्टर अजूनही सावरलेल्या नाहीत, झोपेतही भयकंप
पाण्यात बुडालेली जनता दिसली नाही, आता हेल्मेट पाहताय; ट्रॅफिक पोलिसाच्या दंडात्मक कारवाईवर वसई-विरारकर संतापले
पाण्यात बुडालेली जनता दिसली नाही, आता हेल्मेट पाहताय; ट्रॅफिक पोलिसाच्या दंडात्मक कारवाईवर वसई-विरारकर संतापले
Video : सुप्रीम कोर्टात वकिलाचा अभूतपूर्व राडा; सरन्यायाधीशांना उद्देशून अपशब्द, फाईली सुद्धा भिरकावल्या
Video : सुप्रीम कोर्टात वकिलाचा अभूतपूर्व राडा; सरन्यायाधीशांना उद्देशून अपशब्द, फाईली सुद्धा भिरकावल्या
Devendra Fadnavis : राज्यातील 'त्या' शेतकऱ्यांचं 50 हजारांऐवजी 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार, प्रोत्साहनपर अनुदानाची 2026-27चं कर्ज भरण्याची अट काढली, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
राज्यातील 'त्या' शेतकऱ्यांचं 50 हजारांऐवजी 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
Eknath Shinde on Missing Link : एक पैशाचा धोका झाला नाही, मिसिंग लिंकवरून टीका करणारे महाराष्ट्र द्रोहीच आहेत, हे राज्याचे दुश्मन; एकनाथ शिंदेंची टिप्पणी
एक पैशाचा धोका झाला नाही, मिसिंग लिंकवरून टीका करणारे महाराष्ट्र द्रोहीच आहेत, हे राज्याचे दुश्मन : एकनाथ शिंदे
Video: मिसिंग लिंकवरुन राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री हिंदीत का बोलले? मिमिक्री आर्टिस्ट म्हणत फडणवीसांचा पलटवार
Video: मिसिंग लिंकवरुन राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री हिंदीत का बोलले? मिमिक्री आर्टिस्ट म्हणत फडणवीसांचा पलटवार
Tiger Dart: वाघिणीला जेरबंद करणारी 'शेरनी'; प्रियल चोरगडेंनी वाघाच्या पिंजऱ्यात बसून मारला डार्ट
वाघिणीला जेरबंद करणारी 'शेरनी'; प्रियल चोरगडेंनी वाघाच्या पिंजऱ्यात बसून मारला डार्ट
Eknath Shinde : पाणी की तरह ये दोस्ती हमारी कोई भी कोई कितना भी चाहे जुदा नही होंगे, एकनाथ शिंदेंचं देवेंद्र फडणवीसांसोबतच्या मैत्रीवर शायरीतून भाष्य
हम वो नही जो दिल तोड देंगे, थाम कर हात फिर साथ छोड देंगे, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Embed widget