एक्स्प्लोर

Weather : परभणीसह पुण्यात गारठा वाढला, दोन्ही ठिकाणी एक अंकी तापमान; थंडी वाढल्यानं आजार बळावले

Maharashtra Weather : राज्यात तापमानात (Temperature) सातत्यानं चढ उतार होत आहे. कुठे थंडीचा कडाका (Cold Weather) जाणवत आहे.

Maharashtra Weather News : राज्यात तापमानात (Temperature) सातत्यानं चढ उतार होत आहे. कुठे थंडीचा कडाका (Cold Weather) जाणवत आहे. तर कुठे उन्हाचा चटका बसत आहे. या तापमानातील चढ उताराचा शेती पिकांना (Agriculture Crop) फटका बसत आहे. परभणी (Parbhani) जिल्ह्यात पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढला आहे. 15.6 अंश सेल्सिअसवरुन तापमानाचा पारा थेट 7 अंशावर आल्यानं हुडहुडी चांगलीच वाढली आहे. ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातही (western Maharashtra) थंडी कायम असल्याचं चित्र दिसत आहे. 

अचानक तापमानात मोठी घट झाल्यानं आजार बळावले

दरम्यान, परभणी जिल्ह्यात सोमवारी (13 फेब्रुवारी) तापमान हे  15.6 अंशावर होते. आत तापमानाचा पारा चांगलाच घसरला असून 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. परभणी जिल्ह्यात यंदा जानेवारी ते फेब्रुवारी हे दोन महिने कडाक्याच्या थंडीचे राहिले आहेत. या दोन्ही महिन्यात तापमान हे 10 ते 15 अंश सेल्सिअस दरम्यानच राहिले आहे. त्यातच अचानक तापमानात मोठी घट होत असल्यानं लहान मुले, वृद्ध नागरिकांना सर्दी, ताप खोकला असे आजार बळावले आहेत. तर हवेत कायमच गारवा राहत असल्याने दिवसभर थंडी जाणवत आहे..

पुण्याचा पारा 9 अंशावर 

परभणीत तापमानाचा पारा घसरला असताना दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातही थंडीचा जोर जाणवत आहे. पुण्यात 9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळं पुण्यातही हुडहुडी वाढली आहे. पुणे जिल्ह्यात थंडी वाढल्यामुळं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. तसेच मुंबईत 19 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.  

शेती पिकांना फटका

राज्यात सातत्यानं तापमानात चढ उतार होत आहे. याचा शेती पिकावर मोठा परिणाम होत आहे.  बहुतांश भागात कांदा पिकावर करपा रोगाचा (Karpa) प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तसेच गहू (Wheat), हरभरा, मका या पिकांना देखील या वातावरणाचा फटका बसणार बसत आहे. त्यामुळं उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

Maharashtra Temprature : 15 फेब्रुवारीनंतर तापमानात  वाढ होणार 

फेब्रुवारी महिन्यातील अवघे पंधरा दिवस संपलेले असताना आतापासूनच उन्हाचे (Heat) चटके बसू लागले आहेत. 15 फेब्रुवारीनंतर महाराष्ट्रातील तापमानात  वाढ होणार आहे. तर मुंबईतील थंडी गायब झाली असून किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. मुंबईतील तापमान गेल्या एक दोन दिवसांपासून वाढ होत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Maharashtra Weather: उन्हाळ्याची चाहूल, राज्यातील तापमानात 15 फेब्रुवारीनंतर वाढ होणार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalna Road Accident: जालन्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, मजुरांच्या गाडीला ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू
जालन्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, मजुरांच्या गाडीला ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू
Konkan Railway ratnagiri diva passenger: रत्नागिरी-दिवा पॅसेंजर दादरपर्यंत नेण्याची मागणी फेटाळली, कोकण रेल्वेचा मार्ग बदलणार
रत्नागिरी-दिवा पॅसेंजर दादरपर्यंत नेण्याची मागणी फेटाळली, कोकण रेल्वेचा मार्ग बदलणार
Sushma Andhare: अशोक खरात प्रकरण अत्यंत नाजूक, काही गोष्टी मुख्यमंत्री फडणवीसांना भेटूनच सांगायच्यात, सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने नवा सस्पेन्स
अशोक खरात प्रकरण अत्यंत नाजूक, काही गोष्टी मुख्यमंत्री फडणवीसांना भेटूनच सांगायच्यात, सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने नवा सस्पेन्स
Maharashtra Cabinet Meeting: राज्य सरकारचा 12 वर्षांनंतर मोठा निर्णय, मंत्रिमंडळाच्या बैठकीत 6 धडाकेबाज निर्णय
राज्य सरकारचा 12 वर्षांनंतर मोठा निर्णय, मंत्रिमंडळाच्या बैठकीत 6 धडाकेबाज निर्णय

व्हिडीओ

Akola Police : अटकेतील महिलेकडे पोलीसाची शरीरसुखाची मागणी Special Report
Jain Muni on Tararani : ताराराणींचा अवमान, जैन मुनींमध्येच घमासान Special Report
Ashok Kharat on Fish Vegetarian : खरातचा चमत्कार म्हणे मासे 'शाकाहार' Special Report
Shashikant Shinde PC : अजितदादा प्रकरणात एफआयआरही होत नसेल तर महाराष्ट्राचं दुर्देव, शिंदेंचा संताप
Sanjay Raut PC | हा मराठा साम्राज्याचा अपमान, महाराणी ताराराणींच्या विधानावरून संजय राऊत आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime news: सोलापूरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना, वडिलांनी तीन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
सोलापूरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना, वडिलांनी तीन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
Navi Mumbai : नवी मुंबई महापालिका ठरली करवसुलीत अग्रेसर, 876 कोटींचा कर वसूल करत ऐतिहासिक कामगिरी
नवी मुंबई महापालिका ठरली करवसुलीत अग्रेसर, 876 कोटींचा कर वसूल करत ऐतिहासिक कामगिरी
Latur Rain Update : लातूरच्या रेणापूर तालुक्यात गारपीट आणि वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतीचे मोठे नुकसान, रस्ते बंद..
लातूरच्या रेणापूर तालुक्यात गारपीट आणि वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतीचे मोठे नुकसान, रस्ते बंद..
Maharashtra Rain : महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस
महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा,कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस
Share Market : नव्या आर्थिक वर्षाची दणक्यात सुरुवात, शेअर बाजारात एका दिवसात गुंतवणूकदारांची 10 लाख कोटींची कमाई
नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी, शेअर बाजारात 10 लाख कोटींची कमाई
Donald Trump : इराणच्या नव्या राजवटीच्या अध्यक्षांची शस्त्रसंधीची विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, इराणनं ट्रम्प यांचे दावे फेटाळले  
इराणच्या नव्या राजवटीच्या अध्यक्षांची शस्त्रसंधीची विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, इराणनं ट्रम्प यांचे दावे फेटाळले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
Aditi Tatkare on Ashok Kharat case: राजकारण्यांनी एकमेकांची बदनामी करु नये, अशोक खरात प्रकरण सगळ्यांसाठीच एक धडा: अदिती तटकरे
राजकारण्यांनी एकमेकांची बदनामी करु नये, अशोक खरात प्रकरण सगळ्यांसाठीच एक धडा: अदिती तटकरे
Embed widget