एक्स्प्लोर

Water crisis: राज्यातील पाणीसंकट अधिक गडद, मागच्या वर्षीच्या तुलनेत मराठवाड्यातील पाणीसाठ्यात मोठी घट

State Water Crisis: मागील वर्षी अपेक्षित पाऊस झाला नसल्याने मराठवाड्यात (Marathwada) देखील पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाण्याची टंचाई आणि दुष्काळाच्या झळा यामुळे बळीराजा मात्र हतबल झालाय. 

State Water Crisis:  राज्यातील पाणीसंकट (Water Crisis) अधिक गडद झालं आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत मराठवाड्यातील (Marathwada)  पाणीसाठ्यात मोठी घट झालीय. तर उत्तर महाराष्ट्रातही (North Maharashta) पाण्याची पातळी घटली असून धरणांमधील पाणीसाठा कमी झालाय. तर कोकण आणि विदर्भातील परिस्थिती तुलनेने बरी आहे. तर राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याची स्थितीही चिंताजनक आहे. मागील वर्षी अपेक्षित पाऊस झाला नसल्याने मराठवाड्यात (Marathwada) देखील पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाण्याची टंचाई आणि दुष्काळाच्या झळा यामुळे बळीराजा मात्र हतबल झालाय. 

राज्यात पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्नही तितकाच गंभीर बनला आहे. हंडाभर पाण्यासाठी अनवाणी पावलांनी दाहीदिशा वणवण करण्याची वेळ महिलांवर आली आहे. उजनी धरणात शून्य टक्के पाणीसाठा असून मागील वर्षी याचवेळी 18 टक्के जलसाठा शिल्लक होता. कोयना धरणात 42 टक्के खडकवासला धरणात 55 टक्के पाणीसाठा आहे. लातूर, धाराशिव आणि बीडमधील  धरणांमधील परिस्थिती भीषण आहे. जायकवाडीतील धरणसाठा 16 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. मागील वर्षी याचवेळी जायकवाडीत  52  टक्के पाणीसाठा होता.

मराठवाड्यात जलसंकट निर्माण होण्याची शक्यता

मराठवाड्यात गत वर्षी 42 टक्क्यांवर असलेला पाणीसाठा यंदा मात्र फक्त 16 टक्क्यांवर आली आहे. उत्तर महाराष्ट्रात मागील वर्षी याचदिवशी 50 टक्क्यांवर असलेला धरणसाठा यंदा मात्र 25 टक्क्यावर आली आहे.  पश्चिम महाराष्ट्रातील पाणीसाठा 31 टक्क्यांवर, मागच्या वर्षी धरणांमध्ये जवळपास 39 टक्के जलसाठा होता. कोकण आणि विदर्भातील परिस्थिती तुलनेनं बरी आहे. कोकणात गतवर्षी  49  टक्के पाणीसाठा शिल्लक होता, यंदा धरणांमध्ये 47  टक्के पाणीसाठा  आहे.   पश्चिम विदर्भातील अमरावती विभागात 47  टक्के पाणीसाठा, मागील वर्षी याचवेळी 49 टक्के पाणीसाठा धरणांमध्ये शिल्लक होता. नागपूर विभागात मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होता. यंदा 44 टक्के धरणांमध्ये जलसाठा होता.  मागील वर्षी 28 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता .

उजनीत शून्य टक्के पाणीसाठा

उजनीत शून्य टक्के पाणीसाठा, मागील वर्षी याचवेळी 18 टक्के जलसाठा शिल्लक होता.  कोयना धरणात 42 टक्के जलसाठा शिल्लक होता.   पुण्यातील खडकवासला धरणात 55  टक्के पाणीसाठा  होता. लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यामधील धरणांमधील परिस्थिती भीषण परिस्थिती होती. जायकवाडीतील धरणसाठा 16  टक्क्यांपर्यंत खाली आला, मागील वर्षी याचवेळी जायकवाडीत 52  टक्के पाणीसाठा होता.  मराठवाड्यात जलसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे. 

हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा वणवण 

छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात भीषण पाणीटंचाई जाणवते आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना दीड ते दोन किमी पर्यंत पायपीट करावी लागतेय. जीवघेणी कसरत करत खोल विहिरीतून पाणी भरावं लागतंय. लहान मुलं, वृद्ध महिलाही जीवावर उधार होवून पाण्यासाठी जीवघेणी कसरत करतायत. एरवी पाण्याचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयगावात यंदा मात्र दुष्काळाची स्थिती निर्माण झालीये. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि पणन मंत्री अब्दुल सत्तार यांचा हा मतदारसंघ आहे.. मात्र कुणालाच या पाणीसंकटाकडे लक्ष द्यायला वेळ नाही का? असा प्रश्न उपस्थित होतोय.  

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मे 2026 |शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मे 2026 |शनिवार
Latur Pattern : ज्ञानार्जनाच्या ध्येयापासून पेपरफुटीच्या अर्थकारणापर्यंत, 'लातूर पॅटर्न' चं बदललेलं रसायनशास्त्र 
Latur Pattern : ज्ञानार्जनाच्या ध्येयापासून पेपरफुटीच्या अर्थकारणापर्यंत, 'लातूर पॅटर्न' चं बदललेलं रसायनशास्त्र 
मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या घोषणेनंतर ओबीसी समाज आक्रमक, वडीगोद्रीत पुन्हा होणार OBC चा एल्गार
मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या घोषणेनंतर ओबीसी समाज आक्रमक, वडीगोद्रीत पुन्हा होणार OBC चा एल्गार
Maharashtra Live blog updates: कल्याणमध्ये भीषण अपघात; सुमित कंपनीच्या  घंटागाडीखाली 2 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
Maharashtra Live blog updates: कल्याणमध्ये भीषण अपघात; सुमित कंपनीच्या  घंटागाडीखाली 2 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Sharad Pawar NCP : तटकरेंसोबत प्रफुल पटेलांनीही घेतली होती शरद पवारांची भेट
Manoj Jarange : 29 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर 30 मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Neet Exam Update : नीटची फेरपरीक्षा, विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा, कोणती आव्हानं समोर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Devendra Fadnavis :
भारताचा आध्यात्मिक महासत्ता बनवण्याचा मार्ग गुरुदेवांच्या मार्गदर्शनानेच प्रशस्त : देवेंद्र फडणवीस
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
Prateek Yadav Death: प्रतिक यादवांच्या शरीरावरील त्या सहा जखमांनी गूढ वाढवलं, नैसर्गिक मृत्यू की घातपात? चर्चांना उधाण
प्रतिक यादवांच्या शरीरावरील त्या सहा जखमांनी गूढ वाढवलं, नैसर्गिक मृत्यू की घातपात? चर्चांना उधाण
'तर तुम्ही सगळे म्या पट्ट्यावर घेतले म्हणून समजा, फडणवीस साहेब तुम्हाला सुट्टी नाही, आठ महिने दिले, आता मी आणखी वेळ देऊ शकत नाही' जरांगे पाटलांनी पुन्हा रणशिंग फुंकलं
'तर तुम्ही सगळे म्या पट्ट्यावर घेतले म्हणून समजा, फडणवीस साहेब तुम्हाला सुट्टी नाही, आठ महिने दिले, आता मी आणखी वेळ देऊ शकत नाही' जरांगे पाटलांनी पुन्हा रणशिंग फुंकलं
Embed widget