एक्स्प्लोर

Vidharbha Flood : विदर्भात सरासरीपेक्षा 180 टक्के अधिक पाऊस; प्रत्येक जिल्ह्यात पूर, जाणून घ्या सध्याची स्थिती

Vidharbha Flood : विदर्भात सरासरीपेक्षा 180 टक्के अधिक पाऊस, पूरग्रस्त हिंगणघाटमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून पाहणी, व्यथा मांडताना महिलांना अश्रू अनावर

Vidharbha Flood : गेले दोन दिवसांपासून विदर्भात सुरू असलेलं पावसाचं थैमान आजही कायम  आहे.  विदर्भातल्या आठ जिल्ह्यांना महापुराचा तडाखा बसलाय. विदर्भात सरासरीपेक्षा 180 टक्के अधिक पावसाची नोंद झाली. वर्धा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, बुलडाणा, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती कायम आहे.  आज अकोला आणि अमरावती जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे तर इतर जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पावसामुळे अमरावतीच्या 30 तर तर वर्ध्याच्या 42 गावांचा संपर्क तुटला. मदत आणि बचावकार्यासाठी वर्ध्यात एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या दाखल झाल्यात. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस आज वर्धा आणि चंद्रपूरच्या दौऱ्यावर आहेत. पूरग्रस्त भागांची ते पाहणी करणार असून त्यानंतर नागपुरात या संपूर्ण स्थितीची आढावा बैठक होणार आहे.

अकोल्यात शेकडो घरांमध्ये पुराचं पाणी, पिकांचंही मोठं नुकसान (Akola Flood) 

अकोल्यातही पूरस्थिती कायम आहे. पूर्णा नदीला पूर आल्याने गांधीग्राम पुलावर 10 ते 12 फूट पाणी आलंय. या पुलावरुन पाणी जात असल्याने अकोट-अकोला मार्ग 18 तासांपासून बंद आहे. अकोट-शेगाव-अंदुरा मार्गही बंद झालाय.  अकोला शहरातील शेकडो घरांमध्येही पाणी शिरलंय. अनेक भागातील शेतीही पाण्याखाली गेलीय. त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. पूर्णा मध्यम प्रकल्पाचे नऊ दरवाजे उघडण्यात आलेत. पूर्णा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. त्यामुळे पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. अकोल्यातील एकूण सहा तालुके बाधित झाले आहे.

  • अकोल्यातील बाधित तालुके -  अकोट, अकोला, तेल्हारा, बाळापूर, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी, पातुर
  • किती लोकांना पुराचा फटका बसला - 200 च्या वर
  • किती अंदाजे शेतीला फटका आहे - 30 हजार हेक्टर प्राथमिक अंदाज
  • किती गावे बाधित आहेत - रतनपुरी-झुरळ खुर्द
  • मृत्यू - दोन दिवसांपूर्वी गांधीग्रामच्या पूर्णा नदीत युवकाचा वाहून गेल्याने मृत्यू

वर्ध्यातही पुराच्या पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत (Wardha Flood)

वर्ध्यातही पुराच्या पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. तीन दिवसांपासून पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोढे कुटुंबातील  चार जणांची सुटका करण्यात आली. हिंगणघाट तालुक्यातील सावंगी हेटी गावातील शेतशिवरात पुराचं पाणी घुसलं. कुटुंबानं वणा नदीचे पाणी वाढल्याने एका झोपडीचा आधार घेतला होता. एनडीआरच्या जवानांनी बोटींच्या मदतीने तब्बल 11 किलोमीटरचा प्रवास करून केली या लोकांची सुटका केली.

  • वर्धा जिल्ह्यात आठ पैकी  सहा तालुके बाधित -  वर्धा, आर्वी, सेलू ,देवळी, हिंगणघाट, समुद्रपूर 
  • किती लोकांना पुराचा फटका - पूर परिस्थितीत जिल्ह्यातील एकूण 61 गावे बाधित झाली आहे.  बाधित कुटुंबाची संख्या 1 हजार 303 इतकी आहे.
  • किती अंदाजे शेतीला फटका आहे - 835 गावात शेतीचे नुकसान झाले आहे.
  •  बाधित शेती क्षेत्र -  63 हजार 325 हेक्टर 
  • किती गावे बाधित आहेत - जिल्ह्यातील एकूण 61 गावे बाधित झाली आहे. 
  • किती लोकांना स्थलांतरित केले आहे - हजारो नागरिकांचं स्थलांतर करण्यात आले आहे.  त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे

यवतमाळला पावसाचा फटका (Yavatmal  Rain Update)

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव, कळंब, बाभूळगाव तालुक्याला पाऊस आणि पुराचा फटका बसलाय. राळेगाव तालुक्यात पुराचं पाणी शेतात शिरल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. शेताला तलावाचं स्वरुप प्राप्त झालंय. चहांद गावातील शेतकऱ्याचं तीन एकर शेत पाण्याखाली गेलंय. शेताची अवस्था ही पाहून शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलंय

  • यवतमाळ जिल्ह्यात काल झालेल्या पावसामुळे बाभूळगाव, कळंब, राळेगाव, मारेगाव, वणी, यवतमाळ, उमरखेड 
  • या सात तालुक्यातील जवळपास दोन हजारावर नागरिकांना पुराचा नागरिकांना पुराचा फटका बसला
  • मागील 24 तासापासून सुरू असलेल्या पावसामुळे वर्धा आणि  पैनगंगा नदी नाल्या काठावरील जवळपास 70 ते 75 हजार हेक्टरवर  शेतीचे नुकसान झाले
  •  सात तालुक्यातील 12 गावांना पावसाचा फटका बसला
  • 800 ते 900 नागरिकांना  गावातील सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.

चंद्रपूर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे भद्रावती तालुक्यातील पळसगावची स्थिती बिकट (Chandrapur Flood) 

चंद्रपूर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे भद्रावती तालुक्यातील पळसगावची स्थिती बिकट झालीय. वर्धा आणि शिरणा नदीच्या पाण्यात वाढ झाल्याने शेकडो गावांचा संपर्क तुटलाय. 1994 नंतर पहिल्यांदाच पळसगाव ग्रामस्थांनी मोठा महापूर अनुभवलाय. संपूर्ण गावात चार ते पाच फूट पाणी घुसल्याने हे गाव रिकामे करण्यासाठी प्रशासना प्रयत्न करत आहेत. नागरिकांना बोटीद्वारे सुरक्षित ठिकाणी पोहचवलं जात आहे.

  • किती तालुके बाधित -  जिल्हातील एकूण चार तालुके सर्वाधिक बाधित झाले आहे  सिरोंचा, अहेरी, भामरागड, मूलचेरा तालुक्यांचा समावेश आहे
  • किती गावांना पुराचा फाटका -  45 गावांना पुराचा फटका बसला आहे
  • किती गावे स्थलांतरित करण्यात आले - जिल्ह्यातील 45 गावांचे स्थलांतर करण्यात आले
  • किती कुटुंबांना हलवले - जिल्ह्यातील 2785 कुटुंबांना हलवले 
  • किती लोकांना सुरक्षित स्थळी हलवले - जिल्हातील एकूण 11836  लोकांना सुरक्षीत स्थळी हलवले 
  •  सर्वाधिक गावांना स्थलांतर -  सिरोंचा तालुक्यातील 34 गावांचे स्थलांतर यामध्ये सिरोंचा तालुक्यातील 2424 कुटुंबाना हलवले. लोकसंख्या 10563 सुरक्षीत स्थळी हलवले 
  • पुरामुळे शेतीचे नुकसान - अंदाजित आठ हजार हेक्टरहून अधिकच नुकसान झाले आहे तर कापसी च 90 टक्के नुकसान झाले आहे 

अमरावतीमध्येही पुराचा फटका (Amravati Rain Update) 

अमरावतीमध्येही पावसाची संततधार सुरुच आहे. जोरदार पावसामुळे भातकुली तालुक्यातील पेढी नदी आणि मेळघाटातील सिपणा नदीला पूर आलाय. पेढी नदीच्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. या पुराचा फटका नदीकाठच्या गावांना बसलाय. पेढी नदीला लागून असलेल्या संत गाडगेबाबा वृद्धाश्रमातील 25 ते 30 वृद्धाचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आलंय. 

  • किती तालुके बाधित आहेत - 90 सर्कलमधून 31 सर्कलला 65 mm च्या वर  पाऊस 
  • कुठले तालुके बाधित - सात तालुके 
  • किती लोकांना पुराचा फटका -  30 गावांना फटका 
  • किती अंदाजे शेतीला फटका आहे - कालच्या पावसामुळे 15 ते 20 हजार हेक्टरवरील पिकांना फटका 
  • किती गावे बाधित आहेत - 35 गावे बाधित 
  • किती लोकांना स्थलांतरित केले आहे - 80 कुटुंब
  • मृत्यू - आज चांदूरबाजार तालुक्यात आईसह मुलीचा मृत्य

बुलढाण्यातील पूर्णा नदीला आलेल्या पुराचा फटका

बुलढाण्यातील पूर्णा नदीला आलेल्या पुराचा फटका नदीकाठच्या शेतकऱ्यांना बसलाय. पुराचे पाणी नदीकाठच्या शेकडो एकर शेतीत शिरलंय. त्यामुळे सोयाबीन, कापसाची शेती पाण्याखाली गेली आहे. अकोला, अमरावती जिल्ह्यातील धरणातून पूर्णा नदीत मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. त्यामुळे शेतीला मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे. 

संबंधित बातम्या :

दोन्ही बाजूंनी नदीचा प्रवाह, चार तास मृत्यूच्या विळख्यात; जळगावच्या सुकी नदी पात्रात अडकलेल्या 9 पर्यटकांची सुटका

महत्त्वाच्या बातम्या

...तर जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, मंत्री राणेंचा इशारा, म्हणाले सडक्या आंब्यांना सोडणार नाही
...तर जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, मंत्री राणेंचा इशारा, म्हणाले सडक्या आंब्यांना सोडणार नाही
एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget