एक्स्प्लोर

Maharashtra Suicide Cases : महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या; देशात दर तासाला 19 आत्महत्या; गरीबी, बेरोजगारीमुळे जगणं असह्य

NCRB Report on Suicide : महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या झाल्याची माहिती एनसीआरबीच्या अहवालात समोर आली आहे. गरीबी, बेरोजगारीमुळे जगणं असह्य झाल्याने अनेकांनी आत्महत्या केल्याचं अहवालात म्हटलं आहे.

Suicide Cases in Maharashtra : गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वाधिक आत्महत्या झाल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. गेल्या वर्षभरात राज्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. महाराष्ट्रातच एका वर्षात 22,746 आत्महत्या झाल्याची नोंद आहे. त्यापाठोपाठ तामिळनाडूमध्ये 19,834 लोकांनी आत्महत्या केल्या आहे. कर्जबाजारीपणाच्या विळख्यात अडकून आणि दिवाळखोरीमूळे आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB Report) अहवालातून ही धक्कादायक आणि लाजिरवाणी आकडेवारी उघड झाली आहे.

दिवाळखोरी आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या

राज्यात दिवाळखोरी किंवा कर्जबाजारीपणामुळे 1941 आत्महत्या झाल्याचं अहवालात म्हटलं आहे. त्यानंतर कर्नाटकात 1335 आणि आंध्र प्रदेशात 815 जणांनी दिवाळखोरी किंवा कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्या. राज्यात बेरोजगारीमुळे 642, गरिबीमुळे 402 आणि व्यावसायिक जीवनातील समस्यांमुळे 640 नागरीकांनी आपलं आयुष्य संपवलं आहे. 

कौटुंबिक कारणांमुळे आत्महत्या करणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त

राज्यात कौटुंबिक समस्यांमुळे आत्महत्या करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असल्याची बाबही निदर्शनास आली आहे. गेल्या वर्षभरात कौटुंबिक कारणांमुळे जवळपास 6961 आत्महत्या झाल्याचं अहवाल सांगतो. महाराष्ट्र, तमिळनाडू, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांमध्ये मिळून देशातील एकूण आत्महत्यांपैकी 49.3 टक्के आत्महत्या झाल्याचं धक्कादायक वास्तवही समोर आलं आहे.

देशात दर तासाला 19 आत्महत्या 

2021 मध्ये 1,64,033 आत्महत्या झाल्या होत्या तर, 2022 मध्ये 1,70,924 आत्महत्या झाल्या. यापैकी सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात 13.3 टक्के, तामिळनाडूमध्ये 11.6 टक्के, मध्य प्रदेश नऊ, कर्नाटक आठ आणि पश्चिम बंगालमध्ये 7.4 टक्के नोंदल्या गेल्या आहेत. आकडेवारीच्या दृष्टिकोनातून गणना केली तर 2022 मध्ये देशात दर तासाला 19 लोक आत्महत्या करतील. शेती क्षेत्रात दर तासाला एकापेक्षा जास्त शेतकरी आणि शेतमजूर आत्महत्या करतात.

गंभीर आजारही आत्महत्येचं कारण

देशभरातील 18.4 टक्के आत्महत्यांमागे गंभीर आजार हे कारण होते. 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये रोगामुळे होणाऱ्या आत्महत्यांचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. अंदमान आणि निकोबार बेटे, पंजाब, तामिळनाडू, सिक्कीम आणि गोवा या राज्यांमध्ये रोगामुळे आत्महत्या करण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Indigo Airlines Crisis: प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या इंडिगो एअरलाइनच्या मक्तेदारीची चौकशी होणार; हवाई क्षेत्रात 65 टक्के हिस्सा, दररोज 2200 उड्डाणे
प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या इंडिगो एअरलाइनच्या मक्तेदारीची चौकशी होणार; हवाई क्षेत्रात 65 टक्के हिस्सा, दररोज 2200 उड्डाणे
Pune BJP : उमेदवार देण्यासाठी भाजप पदाधिकारी अन् स्थानिक नेत्यांची दमछाक; 125 जागांसाठी भाजपने कंबर कसली, 2500 उमेदवारांच्या मुलाखती आजपासून सुरू
उमेदवार देण्यासाठी भाजप पदाधिकारी अन् स्थानिक नेत्यांची दमछाक; 125 जागांसाठी भाजपने कंबर कसली, 2500 उमेदवारांच्या मुलाखती आजपासून सुरू
Raj Thackeray: वंदे मातरमवर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला... मनसेप्रमुख राज ठाकरे संतापले, स्पष्टच सुनावलं
वंदे मातरमवर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला... मनसेप्रमुख राज ठाकरे संतापले, स्पष्टच सुनावलं
IND vs SA 3rd T20 : शुभमन गिल OUT, संजू सॅमसन IN... पराभवानंतर द. आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 साठी अशी असेल भारताची Playing XI
शुभमन गिल OUT, संजू सॅमसन IN... पराभवानंतर द. आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 साठी अशी असेल भारताची Playing XI

व्हिडीओ

Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report
CBSE Syllabus : CBSE भोंगळ कारभारावर शिवप्रेमींचा संताप Special Report
Nashik Tapovan Kumbhmela :  तपोवनचा वाद, संतापला हरित लवाद Special Report
Shiv Sena-BJP Alliance : महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांच्यात युती Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indigo Airlines Crisis: प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या इंडिगो एअरलाइनच्या मक्तेदारीची चौकशी होणार; हवाई क्षेत्रात 65 टक्के हिस्सा, दररोज 2200 उड्डाणे
प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या इंडिगो एअरलाइनच्या मक्तेदारीची चौकशी होणार; हवाई क्षेत्रात 65 टक्के हिस्सा, दररोज 2200 उड्डाणे
Pune BJP : उमेदवार देण्यासाठी भाजप पदाधिकारी अन् स्थानिक नेत्यांची दमछाक; 125 जागांसाठी भाजपने कंबर कसली, 2500 उमेदवारांच्या मुलाखती आजपासून सुरू
उमेदवार देण्यासाठी भाजप पदाधिकारी अन् स्थानिक नेत्यांची दमछाक; 125 जागांसाठी भाजपने कंबर कसली, 2500 उमेदवारांच्या मुलाखती आजपासून सुरू
Raj Thackeray: वंदे मातरमवर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला... मनसेप्रमुख राज ठाकरे संतापले, स्पष्टच सुनावलं
वंदे मातरमवर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला... मनसेप्रमुख राज ठाकरे संतापले, स्पष्टच सुनावलं
IND vs SA 3rd T20 : शुभमन गिल OUT, संजू सॅमसन IN... पराभवानंतर द. आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 साठी अशी असेल भारताची Playing XI
शुभमन गिल OUT, संजू सॅमसन IN... पराभवानंतर द. आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 साठी अशी असेल भारताची Playing XI
Weather Update: पुण्यासह साताऱ्यात मिनी काश्मीरचा फील; थंडीच्या अलर्टमुळे शाळेच्या वेळेत बदल करण्याची मागणी, पारा आणखी घसरण्याची शक्यता
पुण्यासह साताऱ्यात मिनी काश्मीरचा फील; थंडीच्या अलर्टमुळे शाळेच्या वेळेत बदल करण्याची मागणी, पारा आणखी घसरण्याची शक्यता
Kankavli Crime News: मोबाईल हरवला म्हणून ‘त्या’ प्रेमी युगुलानं जीवन संपवलं, त्या शेवटच्या चॅटमधून सर्व माहिती समोर, नेमकं काय घडलं?
मोबाईल हरवला म्हणून ‘त्या’ प्रेमी युगुलानं जीवन संपवलं, त्या शेवटच्या चॅटमधून सर्व माहिती समोर, नेमकं काय घडलं?
Mohammed Siraj : मोहम्मद सिराजची आग ओकणारी गोलंदाजी! जैस्वाल, रहाणेसारखे स्टार ठरले अपयशी, BCCI ला दाखवला आरसा, टी-20 वर्ल्डकपमध्ये मिळणार संधी?
मोहम्मद सिराजची आग ओकणारी गोलंदाजी! जैस्वाल, रहाणेसारखे स्टार ठरले अपयशी, BCCI ला दाखवला आरसा, टी-20 वर्ल्डकपमध्ये मिळणार संधी?
India vs Pakistan U19 Asia Cup Live : युएईची धुलाई केल्यानंतर आता वैभव सूर्यवंशीच्या टार्गेटवर पाकिस्तान! भारत-पाक LIVE सामना कधी, कुठे अन् कसा पाहायचा?
युएईची धुलाई केल्यानंतर आता वैभव सूर्यवंशीच्या टार्गेटवर पाकिस्तान! भारत-पाक LIVE सामना कधी, कुठे अन् कसा पाहायचा?
Embed widget