एक्स्प्लोर

कोरोनाचा बदल्यांनाही फटका! अधिकाऱ्यांच्या बदल्या 30 जूनपर्यंत स्थगित, सरकारचा निर्णय

दरवर्षी एप्रिल-मे दरम्यान शासकीय कर्मचारी आणि अधिकारी यांच्या बदल्या केल्या जातात. मात्र गेल्या वर्षी या बदल्या ऑगस्ट 2020 पर्यंत स्थगित करण्यात आल्या होत्या. आता 2021 या वर्षासाठीही या बदल्या 30 जूनपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय राज्य शासनाने शासन निर्णयाद्वारे घेतला आहे. 

मुंबई : सध्याच्या कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यात सध्या अस्थिर वातावरण आहे. प्रशासनासमोर आरोग्य व्यवस्था हे प्रथम प्राधान्य आहे. म्हणूनच दरवर्षी एप्रिल-मे दरम्यान शासकीय कर्मचारी आणि अधिकारी यांच्या बदल्या केल्या जातात. मात्र 2020 साली या बदल्या ऑगस्ट 2020 पर्यंत स्थगित करण्यात आल्या होत्या. आता 2021 या वर्षासाठीही या बदल्या 30 जूनपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. 

केवळ ‘या’ कारणांसाठी होणार बदली! 
या शासन निर्णयानुसार सेवानिवृत्तीमुळे रिक्त पदांवर भरती करणे, कोरोना रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवांसाठी पदभरती करणे, शासकीय कर्मचाऱ्यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाची तक्रार आल्यास बदली करण्याची गरज असल्यास बदली करावी, असे सरकारच्या शासन निर्णयात म्हटले आहे. या व्यतिरिक्त अन्य कारणांसाठी बदली करण्यात येणार नाही.

राज्यातील कोरोनासंबंधी स्थितीचा आढावा घेऊन निर्णय! 
राज्यात कोरोनाचे संकट असल्याने अनेक उद्योग व्यवसायांना फटका बसला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका हा महाराष्ट्राला बसला असून, राज्य सरकारने राज्यात 15 मेपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आता या कोरोनाचा फटका शासकीय बदल्यांना देखील बसल्याचे पहायला मिळत आहे. दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या आता 30 जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने तसा शासन निर्णय काढला आहे. राज्यातील कोरोना संसर्गाच्या परिस्थितीचा आढावा घेवूनच त्यासंबंधी पुढील निर्णय घेण्यात येणार आहे, असेही या शासन निर्णयात म्हटले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indurani Jakhar  : इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kunal Kamra Special Report : कामराची कॉमडी, प्रेक्षकांना समन्स; पोलीस नोंदवणार प्रेक्षकांचे जबाबSuresh Dhas Full PC : कृषी केंद्राची कंत्राट अप्रत्यक्षपणे कृषी अधिकाऱ्यांकडेच : सुरेश धसSpecial Report Sanjay Raut : मोदींची सप्टेंबरमध्ये निवृत्ती,राऊतांची भविष्यवाणी;भाजप जाळ्यात अडकणार?Anjali Damania On Rajendra Ghanwat : राजेंद्र घनवट यांनी बीडच्या शेतकऱ्यांना छळून त्रास दिला:दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indurani Jakhar  : इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
Embed widget