एक्स्प्लोर

SSC HSC Exam : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी अर्धा तास अधिक वेळ, वाचा नियमावली

SSC HSC Exam 2022 : यंदा दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी वाढीव वेळ मिळणार आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा लिहण्याचा सराव कमी झाल्याने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

SSC HSC Exam 2022 :  महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) परीक्षा ऑफलाईन (Offilne) होणार असल्याची महत्त्वाची माहिती दिली आहे. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अधिक वेळ देण्यात येणार आहे. राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत या संबंधित माहिती दिली आहे. यंदा आतापर्यंत परीक्षेसाठी बारावीच्या 14 लाख 72 हजार 562 विद्यार्थ्यांची नोंदणी तर दहावीच्या 16 लाख 25 हजार 311 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.

दहावी, बारावीच्या ऑफलाईन परीक्षेसाठीची नियमावली काय आहे जाणून घ्या.

पेपर लिहिण्यासाठी वाढीव वेळ
यंदा दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी वाढीव वेळ मिळणार आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा लिहण्याचा सराव कमी झाल्याने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 40 ते 60 गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी 15 मिनिटे अतिरिक्त वेळ तर 70 गुणांपेक्षा अधिक असलेल्या प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी अर्धा तास अधिक वेळ मिळणार आहे.

कोरोनाबाधित विद्यार्थ्यांसाठी सवलत
परीक्षेदरम्यान एखादा विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्यास त्या विद्यार्थ्याला पुरवणी परीक्षेत पुन्हा त्या विषयाचा पेपर देता येईल. जुलै महिन्यात पुरवणी परीक्षा होऊ शकते. तोंडी परीक्षाही दोन वेळेस देण्याची संधी असेल.

परीक्षार्थींना लसीकरण बंधनकारक नाही
परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना लसीकरणाचं बंधन नसेल. मात्र, पालकांनी पाल्याचे लसीकरण लवकरात लवकर करुन घ्यावे. राज्यात दहावी आणि बारावीच्या 60 ते 65 टक्के विद्यार्थ्याचे लसीकरण झाल्याची माहिती आहे.

परीक्षा केंद्र आणि व्यवस्था
परीक्षा देण्यासाठी परिक्षा हॉलमधे जास्तीत जास्त 25 विद्यार्थी एक सोडून एक या पद्धतीने बसवण्यात येतील. विद्यार्थ्याच्या जवळचे परीक्षा केंद्र देण्याची सोय करण्यात येईल. शाळेत अधिक विद्यार्थ्यी असल्याचं त्याच शाळेत परीक्षा केंद्र करण्यात येईल.

अशी आहे नियमावली

* यावेळेस  प्रॅक्टीकल आणि तोंडी परिक्षा देण्यासाठी दोन संधी असतील.  पहिली संधी 14 फेब्रुवारी 3 मार्च दरम्यान असेल . या कालावधीत जे विद्यार्थ्यांकडून लेखी आणि तोंडी परिक्षा देऊ शकणार नाहीत त्यांना 31 मार्च ते18 एप्रिल दरम्यान पुन्हा या परिक्षा देण्याची संधी. 
* दहावीच्या विद्यार्थ्यांनाही प्रॅक्टीकल आणि तोंडी परीक्षा देण्याची दोन वेळेस संधी. 
* पहिली संधी 25 फेब्रुवारी ते 14 मार्च दरम्यान असेल. 
* यावर्षी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी वाढीव वेळ मिळणार. ऑनलाईन शिक्षणामुळे लिहिण्याचा सराव कमी झाल्याने हा पेपर निर्णय. 
* जी प्रश्नपत्रिका 40 ते 60 गुणांची आहे त्यासाठी 15 मिनिटे अतिरिक्त मिळणार तर 70 गुणांपेक्षा अधिक असलेल्या प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी अर्धा तास अधिक मिळणार.
* जे विद्यार्थी लेखी परीक्षेदरम्यान कोरोना पॉझिटिव्ह असतील त्यांनाही जुलैच्या आसपास पुन्हा पुरवणी परीक्षा देण्याची संधी. 
* दुसऱ्यांदा परीक्षा द्यायची वेळ आल्यास नव्याने शुल्क भरावे लागणार नाही.
* तोंडी परीक्षा दोन वेळेस देण्याची संधी देण्यात आल्याने निकालाच्या कालावधीवर कोणताही परिणाम होणार नाही.  
* परीक्षेनंतर 40 ते 45 दिवसांमधे निकाल लावण्यात येणार. 
* जुलै महिन्यात पुरवणी परीक्षा होऊ शकते.
* परीक्षा देण्यासाठी परिक्षा हॉलमधे जास्तीत जास्त 25 विद्यार्थी असतील आणि  ते झिग-झ्याग पद्धतीने बसतील.
* परीक्षा केंद्र हे विद्यार्थ्यांच्या शाळेतच असेल. परीक्षा देण्यासाठी इतरत्र जावे लागणार नाही.
* प्रॅक्टिकल परिक्षेसाठी बाहेरचे शिक्षक बहीस्थ परीक्षक म्हणून यावेळेस नसतील, तर  त्याच शाळेतील  शिक्षक अंत्यस्थ आणि बहीस्थ परीक्षक म्हणून काम करतील. 
* मुख्य परीक्षेसाठी परीक्षक त्याच महाविद्यालयातील असतील की बाहेरचे याबाबत अद्याप निर्णय व्हायचा आहे.
* दहावी आणि 12 वीच्या या परीक्षा एकूण अभ्यासक्रमाच्या 75 टक्के अभ्यासक्रमावर घेण्यात येतील.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Embed widget