एक्स्प्लोर

Rain Update: आधी पाण्याअभावी पिकं वाळली, आता तुफान पावसानं उरलीसुरली पिकं वाहून गेली; लातूरमध्ये मुसळधार

औसा तालुक्यातील अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली.  संध्याकाळी सातनंतर औसा तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं.  साडेसात वाजेपासून नऊ वाजेपर्यंत पावसाने तालुक्यातील अनेक गावांना अक्षरशः झोडपून काढलं.

Maharashtra Rain  : राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. मात्र, राज्यात काही ठिकाणी पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. लातूरमध्ये (Latur Rain Updates) गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसानं जोर धरला आहे. शनिवारी मध्यरात्री लातूर शहर आणि परिसरात पावसानं तुफान बॅटिंग केल्यानंतर काल रविवारी औसा तालुक्यातील अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली.  संध्याकाळी सातनंतर औसा तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं.  साडेसात वाजेपासून नऊ वाजेपर्यंत पावसाने तालुक्यातील अनेक गावांना अक्षरशः झोडपून काढलं.

तपसेचिंचोली, लाडवाडी, लामजना, गाडवेवाडी, तांबरवाडी, बेलकुंड  येथे वीजांच्या कडकडाटासह ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. कमी कालावधीमध्ये झालेल्या या तुफान पावसामुळे उरलीसुरली पिके धोक्यात आली आहेत. या पावसानं शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. 20 ते 25  दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळं पिके वाळून जात होती. पावसाची शेतकरी चातकाप्रमाणे वाट पाहत होता. आता पाऊस आला, मात्र तो इतका तुफान आला की पिके वाहून जाताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. 

25 दिवसांच्या खंडानंतर लातूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना काही वेळ दिलासाही मिळाला. ऑगस्ट महिन्यातील 25 दिवस पाऊसच नव्हता. तर अति पावसाने जुलै महिन्यात पिके पिवळी पडली होती, मात्र ऑगस्ट महिन्यात पाऊस नसल्यामुळे पिकांनी माना टाकल्या होत्या. अशा विचित्र स्थितीत अडकलेल्या शेतकऱ्याला मध्यरात्रीच्या पावसाने दिला दिलासा मिळाला. मात्र आता पुन्हा ढगफुटीसारख्या पावसाने शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. 

लातूर जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर सोयाबीनचे पिक घेतले जाते. खरीपातील मुख्य पीकच सोयाबीन समजले जाते. जिल्ह्यात संपूर्ण जुलै महिन्यात पावसाने एक दिवसही खंड न घेता दररोज हजेरी लावली होती. त्यात जिल्हाभरातील मोठे शेती क्षेत्र हे हलक्या प्रतीच्या जमिनीचे आहे. याच कारणामुळे जास्त झालेलं पाणी किंवा पावसाने उघडी दिल्यानंतर या जमिनीवरच्या पिकांचे नुकसान होते. यंदाच्या हंगामात  सुरुवातीपासून सोयाबीनवर संकटाची मालीकाच सुरु आहे. अतिवृष्टी झाल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. पेरणी झाल्यानंतर झालेल्या जोरदार पावसामुळे काही भागातील सोयाबीन वाहून गेले होते. काही दिवसानंतर दमट वातावरणात गोगलगाईचे संकट येऊन सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

महागड्या औषधांची फवारणी... 

जुलै महिन्यात झालेल्या संततधार रिमझिम पावसामुळे पाणी साचून खरीपाची पिके पूर्णतः वाया गेली आहेत. ढगाळ वातावरणात सूर्यप्रकाश न मिळाल्याने उंचवट्यावरील आणि निचरा होणाऱ्या जमीनीतील पिकांचीही वाढ खुंटली. त्यानंतर येलो मोझॅकचे नवे संकट आल्यामुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीनच नुकसान झाले. अशावेळी पाऊस उघडण्याची शेतकरी वाट पाहत होता. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर पाऊस उघडला, तेंव्हा आठ दिवस बरे वाटले. या काळात शेतकऱ्यांनी सोयाबीनवर पडणाऱ्या रोगापासून संरक्षण करण्यासाठी महागामोलाची औषधे घेऊन फवारणी केली. 

Palghar Rain: पालघर जिल्ह्यात काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस
पालघर जिल्ह्यात काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. तर एका भल्या मोठ्या झाडावर वीज पडली. त्यामुळे झाडाच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या. तर बाजूला असलेल्या घरांवर झाडाच्या फांद्या पडल्याने काही घरांचं नुकसान झालं.

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 ऑगस्ट 2026 | सोमवार
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
Embed widget