Deepak Kesarkar : "आम्ही भाजपासोबत फॉर्म्युलावर चालत नाही, तर महायुतीमध्ये मैत्रीवर चालतो" दीपक केसरकरांचा हल्लाबोल
Deepak Kesarkar : दीपक केसरकर म्हणाले, मनोज जरांगे यांच्या बद्दल मला आदर आहे, पण कोणी काय बोलावं याला सुद्धा लिमिट आहे.
Deepak Kesarkar : आगामी निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनाही आपापल्या तयारीत व्यस्त आहेत. यावर "आम्ही भाजपासोबत फॉर्म्युलावर चालत नाही तर महायुतीमध्ये मैत्रीवर चालतो" अशा प्रतिक्रिया मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिलीय. आम्हाला 48 पैकी 45 सीट जिंकायचे आहे. निष्क्रिय सरकार आणि काम करणारे सरकार हे लोकांना लवकरच कळेल, जे लोक बिल्डरला विकले गेले असेल, त्यांनी विकले जावे. आम्ही बिल्डरला विकले गेलेले लोक नाहीत असा टोला केसरकरांनी विरोधकांना लगावलाय.
जरांगेंनी कायदे तज्ज्ञांकडून काही गोष्टी समजून घ्याव्या - केसरकर
दीपक केसरकर म्हणाले, मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या बद्दल मला आदर आहे, पण कोणी काय बोलावं याला सुद्धा लिमिट आहे. मराठवाड्यात कुणबी दाखले द्यायला सुरुवात केली. आम्ही जे नोटिफिकेशन काढले ते कायम करायचं ही त्यांची मागणी आहे. आलेल्या हरकतींवर विचार करून अध्यादेश काढावा लागतो. ही जर कायदेशीर प्रक्रिया त्यांना माहीत नसेल, तर आमचं नोटिफिकेशन रद्द होईल. कायदे तज्ज्ञांकडून या गोष्टी समजून घ्याव्या
मंत्र्यांच्या बंगले खर्चावर केसरकर म्हणाले...
राज्यातील महायुती सरकारच्या मंत्र्यांपैकी अनेकांनी शासकीय बंगल्यात वास्तव्याला येण्याआधी बंगल्यांचे नूतनीकरण करून घेतले होते. मात्र, मागील पाच महिन्यांत नूतनीकरणावर तब्बल 30 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे, यावर दीपक केसरकरांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की, महाराष्ट्र वैभवशाली राज्य आहे. लहान लहान गोष्टी घ्यायच्या आणि लोकांमध्ये गैरसमज निर्माण करायचा. महाविकास आघाडीच्या काळात किती मंत्रांच्या घरावर खर्च झाला याचा सुद्धा तपशील मी तुम्हाला देईल. बंगल्यावर खर्च करणे ही तो सुद्धा मेंटेनन्स साठी ही एक कंटिन्यूअस प्रोसेस असते आणि हे काम पीडब्ल्यूडी करतं असं ते म्हणाले.
"काँग्रेस सोबत जाऊन उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार गमावले"
उद्धव ठाकरे हे बुलढाणा दौऱ्यावर असून 24 फेब्रुवारीपासून सुरु होणारे मनोज जरांगे यांचे आंदोलन लक्षात घेता उद्धव ठाकरे यांनी आपला 24 तारखेचा हिंगोली दौरा रद्द केल्याची माहिती मिळत आहे. यावर केसरकर म्हणाले, कोणालाही न भेटता पॅलेस पॉलिटिक्स करायचं यात सगळं त्यांनी गमावलं आहे. काँग्रेस सोबत जाऊन बाळासाहेबांचे विचार गमावले आहेत. भाजप सेनेतील मैत्री बाळासाहेबांनी निर्माण केलेली आहे. अजित पवार आल्यामुळे याला अधिक मजबूती प्राप्त झाली आहे असं केसरकर यावेळी म्हणालेत.
विनायक राऊतांनी मंत्रिपदासाठी माझ्याकडे पैसे मागितले - केसरकर
केसरकर पुढे म्हणाले, विनायक राऊत यांनी मला सांगितलं की, आमच्याकडे एक जागृत देवस्थान आहे, तिथे येऊन सांगा की, तुम्हाला मंत्री पदासाठी पैसे मागितले. मी त्यांना सांगतो, आज मी त्या जागृत देवस्थानाला जाणार आहे. सगळ्यांसमोर मी सांगेल की तुम्ही पैसे मागितले होते. जो मनुष्य सच्चा असतो तो कशाला घाबरत नाही आणि पैसे दिले नाही, म्हणून तुम्ही मला मंत्रिपद दिलं नाही, त्याची मला काळजी नाही. जेव्हा पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले होते, उद्या येणाऱ्या सरकारमध्ये तुम्ही मंत्री असाल.तेव्हा मी स्वतः सांगितलं होतं, मी कोकणी म्हणून शाळेत स्वाभिमानी आहे. तुमच्या हाताखाली मंत्री होणार नाही. खोके बोलणारे स्वतः खोके मागत असतात उद्धव ठाकरे माणुसकी विसरतात म्हणून लोक त्यांच्यापासून लांब जातात.
हेही वाचा>>>
Deepak Kesarkar : शिक्षण मंत्र्यांच्या मतदारसंघात त्यांनी न केलेल्या कामांचा बॅनर, दिपक केसरकरांचा बॅनर सोशल मीडियावर व्हायरल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
and tablets