एक्स्प्लोर

Shivsena : महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाची सुनावणी नव्या सरन्याधीशांच्याच काळात, तारीख देऊनही सुनावणी न होण्याचा दुर्मिळ प्रकार 

Maharashtra Political Crisis : या सुनावणीसंबंधित घटनापीठामध्ये कोण असणार हे अद्याप निश्चित करण्यात आलं नाही. त्यामुळे ही गोष्टही नव्या सरन्याधीशांच्याच अधिकारात ठरण्याची शक्यता आहे. 

नवी दिल्ली: महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाची सुनावणी आज होणार म्हणून सगळ्यांचं लक्ष सुप्रीम कोर्टाकडे असताना ही सुनावणी झालीच नाही. आता हे प्रकरण नव्या सरन्याधीशांच्याच काळात ऐकलं जाणार हे निश्चित आहे. सोमवारी याबाबत शिवसेनेचे वकील मेन्शनिंग करतील, त्यानंतरच घटनापीठ कधीपासून काम करतेय हे कळेल. 

महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाचं प्रकरण थंड बासनात जाणार का? सुप्रीम कोर्टात आज या प्रकरणाची सुनावणी न झाल्यानं पुन्हा ही शक्यता वाढलीय. त्यात सरन्यायाधीश रमण्णा हे शुक्रवारी 26 ऑगस्टला निवृत्त होतायत. त्यामुळे आता हे सगळं प्रकरण नव्या सरन्यायाधीशांसमोरच जाण्याची शक्यता आहे. 

मागच्या सुनावणीत हे प्रकरण 25 तारखेला लिस्ट करा असं स्वत: सरन्यायाधीशांनीच सांगितलेलं होतं. त्यानंतरही हे प्रकरण त्या तारखेला ने येणं हे काहीसं आश्चर्यकारक आहे. उद्या सरन्यायाधीश रमण्णा यांच्या कामकाजाचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आता त्यांच्यापुढे हे प्रकरण मेन्शन न करता थेट सोमवारीच 29 ऑगस्टला मेन्शन होऊ शकतं. 

याचा अर्थ स्पष्ट आहे की हे प्रकरण घटनापीठ ऐकेल हे तर सरन्यायाधीश रमण्णा यांनी सांगितलं. पण या घटनापीठात कोण कोण असणार, ते कधीपासून काम करणार हे मात्र नव्या सरन्याधीशांच्याच अधिकारात ठरण्याची शक्यता आहे. 

सुप्रीम कोर्टात हे प्रकरण सुरु असतानाच निवडणूक आयोगातही कार्यवाही सुरु राहणार का हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे. तूर्तास तरी निवडणूक आयोगानं दोन दिवस काही निर्णय घेऊ नये असं कोर्टानं म्हटले होतं. पण ही स्थगिती किती काळ कायम राहणार यावर बरंच काही अवलंबून आहे. 

नव्या घटनापीठाचं कामकाज कधी सुरु होणार याबद्दल आता अनिश्चितता आहे. सोमवारपासून देशाचे नवे सरन्यायाधीश म्हणून उदय लळीत कारभार पाहणार आहेत. त्यामुळे आता नव्या सरन्यायाधीशांच्या काळात हे घटनापीठ काम करेल. पण हे घटनापीठ किती वेगानं काम करतं यावर बरंच काही अवलंबून असेल. 

सत्तासंघर्षात आतापर्यंत काय-काय घडलं? 

26 जून : अपात्रतेच्या नोटिशीला शिंदे गटाचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान
27 जून : बंडखोर आमदारांना न्यायालयाचा तात्पुरता दिलासा
29 जून : उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
30 जून : मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी घेतली शपथ, शिंदे यांची निवड आणि विधानसभा अध्यक्ष निवडीला शिवसेनेचं आव्हान
11 जुलै : सुनावणी टळली, प्रकरण 'जैसे थेच'
20 जुलै : प्रकरण घटनापीठाकडे  सोपवण्याचे संकेत देत सुनावणी पार पडली
31 जुलै : सुनावणी पुन्हा लांबणीवर
3 ऑगस्ट : न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद
23 ऑगस्ट : प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्यात आलं.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विश्वविजेत्यासाठी मुंबई पुन्हा थांबणार, सुरक्षेसाठी मुंबई पोलीस सज्ज, वाहतूक मार्गात बदल
विश्वविजेत्यासाठी मुंबई पुन्हा थांबणार, सुरक्षेसाठी मुंबई पोलीस सज्ज, वाहतूक मार्गात बदल
Vivek Oberoi : बॉलिवूडच्या लॉबिंगचा बळी ठरलो, विवेक ओबेरॉयचा धक्कादायक आरोप; म्हणाला अशा वेळी फक्त दोनच पर्याय उरतात...
बॉलिवूडच्या लॉबिंगचा बळी ठरलो, विवेक ओबेरॉयचा धक्कादायक आरोप; म्हणाला अशा वेळी फक्त दोनच पर्याय उरतात...
राहुल गांधींचा दावा खोटा, शहीद अग्निवीरच्या कुटुंबाला आतापर्यंत 98 लाखांची मदत, लष्काराची माहिती
राहुल गांधींचा दावा खोटा, शहीद अग्निवीरच्या कुटुंबाला आतापर्यंत 98 लाखांची मदत, लष्काराची माहिती
Team India: अखेर जे बघण्यासाठी डोळे आसुसले होते तो क्षण आला... रोहित शर्माने एअरपोर्टवर उतरताच वर्ल्डकप उंचावला
रोहित शर्माने गर्दीच्या दिशेने पाहून विश्वचषक उंचावला अन् दिल्ली एअरपोर्टवर एकच जल्लोष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India in Delhi : T20 World Cup घेऊन येणाऱ्या टीम इंडियाच्या स्वागतासाठी खास केक | T20 Wolrd CupABP Majha 06.30 PM Headlines ABP Majha 04 July 2024 Marathi News ABP MajhaTeam India in Delhi : T20 World Cup च्या विजयानंतर टीम इंडिया भारतात, विमान दिल्लीत लँडTop 100 Headlines Superfast News 6AM 04 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विश्वविजेत्यासाठी मुंबई पुन्हा थांबणार, सुरक्षेसाठी मुंबई पोलीस सज्ज, वाहतूक मार्गात बदल
विश्वविजेत्यासाठी मुंबई पुन्हा थांबणार, सुरक्षेसाठी मुंबई पोलीस सज्ज, वाहतूक मार्गात बदल
Vivek Oberoi : बॉलिवूडच्या लॉबिंगचा बळी ठरलो, विवेक ओबेरॉयचा धक्कादायक आरोप; म्हणाला अशा वेळी फक्त दोनच पर्याय उरतात...
बॉलिवूडच्या लॉबिंगचा बळी ठरलो, विवेक ओबेरॉयचा धक्कादायक आरोप; म्हणाला अशा वेळी फक्त दोनच पर्याय उरतात...
राहुल गांधींचा दावा खोटा, शहीद अग्निवीरच्या कुटुंबाला आतापर्यंत 98 लाखांची मदत, लष्काराची माहिती
राहुल गांधींचा दावा खोटा, शहीद अग्निवीरच्या कुटुंबाला आतापर्यंत 98 लाखांची मदत, लष्काराची माहिती
Team India: अखेर जे बघण्यासाठी डोळे आसुसले होते तो क्षण आला... रोहित शर्माने एअरपोर्टवर उतरताच वर्ल्डकप उंचावला
रोहित शर्माने गर्दीच्या दिशेने पाहून विश्वचषक उंचावला अन् दिल्ली एअरपोर्टवर एकच जल्लोष
Hathras stampede : हाथरसमध्ये नेमकं काय घडलं? 121 जणांना गमावावा लागला जीव
Hathras stampede : हाथरसमध्ये नेमकं काय घडलं? 121 जणांना गमावावा लागला जीव
विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, मनसे पदाधिकाऱ्याने शिवीगाळ केल्याचा निषेध
विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, मनसे पदाधिकाऱ्याने शिवीगाळ केल्याचा निषेध
पुण्यात झिकाचे रुग्ण वाढले; केंद्रीय आरोग्य मंत्रालय सतर्क, राज्यासाठी जारी केली नियमावली
पुण्यात झिकाचे रुग्ण वाढले; केंद्रीय आरोग्य मंत्रालय सतर्क, राज्यासाठी जारी केली नियमावली
जुगार अड्ड्यावर छापा, पोलिसांना घाबरून पळ काढला, 6 जणांचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू 
जुगार अड्ड्यावर छापा, पोलिसांना घाबरून पळ काढला, 6 जणांचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू 
Embed widget