Maharashtra Breaking News Live Updates : कारस्थानी लोकांनी बाळासाहेबांचं हिंदुत्व गोठवलं; उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE

Background
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी सांगितली ही तीन चिन्हं आणि पक्षाची तीन नावं
उद्धव ठाकरे यांनी येत्या निवडणुकीसाठी पक्षाची तीन नावं आणि चिन्हांचे तीन पर्याय दिले आहेत.
तीन चिन्हं
1. उगवता सूर्य
2. त्रिशूल
3. मशाल
पक्षाची तीन नावं
1. शिवसेना बाळासाहेब ठाकरे
2. शिवसेना प्रबोधनकार ठाकरे
3. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
Uddhav Thackeray : मी कुठेही डगमगलो नाही, माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे; उद्धव ठाकरे
मिंधे गटाचा हेतू हा शिवसेनेला संपवण्याचा आहे, पण मी कुठेही डगमगलो नाही. कारण माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.
Uddhav Thackeray : कारस्थानी लोकांनी बाळासाहेबांचं हिंदुत्व गोठवलं; उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका
काही कारस्थानी लोकांनी बाळासाहेबांचे हिंदुत्व गोठवलं असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर केला आहे. निष्ठा ही विकत घेता येत नाही हे परवाच्या मेळाव्यावरुन स्पष्ट झालं असंही ते म्हणाले.
धुळे : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 44 हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान
धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे याचा फटका शेतकऱ्यांना बसला असून यामुळे हातात तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचा वातावरण निर्माण झाला आहे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 171 गावातील 44 हजार 538 शेतकऱ्यांना फटका बसला असून जवळपास 44 हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे यात कापूस सोयाबीन मका यासह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढला असून कापूस पूर्णपणे सडून गेल्याने शेतकऱ्यांवर या अतिवृष्टीमुळे संकट ओढावले आहे.शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची प्रतीक्षा लागली असून त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
धुळे : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 44 हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान
धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे याचा फटका शेतकऱ्यांना बसला असून यामुळे हातात तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचा वातावरण निर्माण झाला आहे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 171 गावातील 44 हजार 538 शेतकऱ्यांना फटका बसला असून जवळपास 44 हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे यात कापूस सोयाबीन मका यासह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढला असून कापूस पूर्णपणे सडून गेल्याने शेतकऱ्यांवर या अतिवृष्टीमुळे संकट ओढावले आहे.शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची प्रतीक्षा लागली असून त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

