एक्स्प्लोर

Maharashtra News Updates 13th April 2023 : सोलापूर: मंगळवेढा तालुक्यातील सिद्धापूर भीमा नदी पात्रात बुडून नेपाळ येथील चौघांचा मृत्यू

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra News Updates 13th April 2023 : सोलापूर: मंगळवेढा तालुक्यातील सिद्धापूर भीमा नदी पात्रात बुडून नेपाळ येथील चौघांचा मृत्यू

Background

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात 13 एप्रिलचा दिवस एका दुःखद घटनेमुळे नोंद केला गेलाय. 13 एप्रिल 1919 हा असा दिवस होता, जेव्हा अमृतसर येथिल जालियनवाला बाग येथे शांततापूर्ण मेळाव्यासाठी जमलेल्या हजारो भारतीयांवर ब्रिटीशांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. बैसाखीच्या सणाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे भारताचा इतिहास बदलला गेला. तसेच आजच्याच दिवशी म्हणजे 13 एप्रिल 1699 रोजी शिखांचे दहावे गुरु गोविंद सिंग यांनी खालसा पंथाची स्थापना केली. 

1699 : गुरु गोविंद सिंग यांनी खालसा दलाची स्थापना केली (Dal Khalsa) 

बैसाखीच्या सणाच्या दिवशी, 13 एप्रिल 1699 रोजी शिखांचे दहावे गुरू गोविंद सिंह (Guru Gobind Singh) यांनी खालसा दलाची स्थापना केली. खालसा दलाची स्थापना ही शीख धर्माच्या इतिहासातील महत्वाची घटना होती. शिखांचे नववे गुरु तेगबहादुर यांच्यानंतर श्री गुरु गोविंद सिंह हे 11 नोव्हेंबर 1675 रोजी शिखांचे दहावे गुरु म्हणून गादीवर विराजमान झाले होते. 

श्री गुरु गोविंद सिंग दररोज गुरुवाणीचे पठण करून आपल्या भक्तांना आणि अनुयायांना त्याचा सविस्तर अर्थ सांगत असत. धर्म आणि समाजाच्या संरक्षणासाठी गुरु गोविंद सिंह यांनी 1699 मध्ये खालसा दलाची स्थापना केली. खालसा पंथाच्या माध्यमातून त्यांनी जातीय भेद नष्ट करुन समानता प्रस्थापित केली. शीख बांधवामध्ये आत्म-सन्मानाची भावना वाढीस लावण्याचे महत्वपूर्ण काम श्री गुरु गोविंद सिंग यांनी केले. श्री गुरु गोविंद सिंहजी यांनी 42 वर्षे शत्रूविरुद्ध सामना केला. 1708 मध्ये त्यांनी नांदेड येथील सचखंड परिसरात आपला देह ठेवला. त्याच परिसरात सचखंड गुरुद्वारा आहे. 

1890 : दादासाहेब तोरणे यांचा जन्मदिन

मराठी चित्रपटाचे आद्य प्रवर्तक अशी ओळख असलेल्या रामचंद्र गोपाळ तोरणे उर्फ दादासाहेब तोरणे (Dadasaheb Torne) यांचा जन्म 13 एप्रिल 1890 रोजी झाला. भारतातील पहिले चलचित्र असलेल्या 'भक्त पुंडलिक'ची निर्मिती त्यांनी केली. 

1919 : जालियनवाला बाग हत्याकांड (Jallianwala Bagh) 

भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात 13 एप्रिल हा दिवस महत्त्वाचा आहे. आजच्याच दिवशी म्हणजे 13 एप्रिल 1919 रोजी, अमृतसरमधील जालियनवाला बाग (Jallianwala Bagh Massacre) या ठिकाणी शांततेने आंदोलन करण्यासाठी एकत्र जमलेल्या भारतीयांवर ब्रिटिश अधिकारी जनरल डायरने गोळीबार केला. या गोळीबारात शेकडो भारतीयांना आपला जीव गमवावा लागला. 

सन 1919 साली ब्रिटिश सरकार रौलेट कायदा आणण्याच्या तयारीत होते. या कायद्यामुळे कोणत्याही भारतीयला फक्त संशयावरुन, कोणताही खटला दाखल न करता तुरुंगात टाकण्याचा अधिकार ब्रिटिशांना मिळणार होता. भारतीयांनी या कायद्याला कडाडून विरोध केला. पण त्याला न जुमानता 8 मार्चपासून हा कायदा लागू करण्यात आला. याच्या निषेधार्थ ठिकठिकाणी आंदोलनं, निदर्शने सुरू झाली.

रौलेट कायद्याच्या विरोधात महात्मा गांधी यांनी 6 एप्रिल रोजी देशव्यापी आंदोलन घोषित केलं. त्यावेळी अमृतसरचे लोकप्रिय नेते डॉ. सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या या अटकेचा निषेध करण्यासाठी लोकांनी आंदोलन सुरू केलं. त्याच्या विरोधात ब्रिटिशांनी पंजाबमध्ये मार्शल लॉ पुकारला आणि कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी ब्रिगेडियर जनरल डायर यांच्याकडे सोपवली.

13 एप्रिल रोजी अमृतसरमधील जालियनवाला बाग येथे रौलेट कायदा मागे घेण्यासाठी आणि नेत्यांची सुटका करण्यासाठी अमृतसरमधील हजारो लोक जालियनवाला बागेत एकत्र जमले. त्यावेळी या जमावावर जनरल डायरने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात हजाराच्या वर लोकांना आपला जीव गमवावा लागला, अनेकांनी आपला जीव वाचवण्यासाठी त्या ठिकाणच्या विहिरीत उड्या घेतल्या. नंतर या घटनेची चौकशी करण्यासाठी हंटर कमिशनची नियुक्ती करण्यात आली. पण हंटर कमिशनने या गोळीबारात केवळ 379 लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. 

1942 : व्ही. शांताराम प्रभात फिल्म कंपनीतून बाहेर 

प्रभात कंपनीच्या संस्थापकांपैकी एक असलेले व्ही शांताराम (V Shantaram) यांनी मतभेदामुळे 13 एप्रिल 1942 रोजी प्रभात कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला. शांताराम राजाराम वणकुद्रे म्हणजेच व्ही. शांताराम हे एक मराठी-हिंदी चित्रपट निर्माते, आणि दिग्दर्शक होते. प्रभातमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी राजकमल कलामंदिर ही स्वतःची चित्रपट निर्माती कंपनी काढली.

1956 : अभिनेते सतीश कौशिक यांचा जन्म 

दिवंगत अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचा जन्म 13 एप्रिल 1956 रोजी झाला. मिस्टर इंडिया या चित्रपटातील "कॅलेंडर"ची भूमिका त्यांची विशेष लोकप्रिय ठरली. याशिवाय त्यांच्या तेरे नाम, जाने भी दो यारो, हम आपके दिल मे रेहते है या चित्रपटातील विनोदी भूमिका लोकप्रिय ठरल्या. 

1973 : अभिनेते बलराज साहनी यांचे निधन  

धरती के लाल, दो बिघा जमीन, गरम हवा, छोटी बहन आणि काबुलीवाला या चित्रपटातून आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या बलराज सहानी (Balraj Sahni) यांचं 13 एप्रिल 1973 रोजी निधन झालं. 

1984: भारताचे सियाचिनमध्ये ऑपरेशन मेघदूत (Operation Meghdoot) 

पाकिस्तानी सैन्य सियाचीन ग्लेशिअरवर ताबा मिळवण्यासाठी चढाई करणार असल्याची गुप्त माहिती भारतीय गुप्तचर संघटनेला (RAW) मिळाली. सियाचिन हे युद्धाच्या दृष्टीने मोक्याचं ठिकाण असून त्यावर जर पाकिस्तानने (Pakistan) ताबा मिळवला तर भारतासाठी ते धोक्याचं ठरणार होतं. त्यामुळे 13 एप्रिल 1984 रोजी भारतीय सैन्याने सियाचीनमध्ये 'ऑपरेशन मेघदूत' लॉन्च केलं. हाडं गोठवणाऱ्या थंडीत भारतीय सैन्याने जगातील या सर्वोच्च युद्धभूमीवर कब्जा मिळवला. भारताच्या दिशेला सियाचीनचा उभा चढ आहे, यामुळे ऑपरेशन मेघदूत अतिशय कठीण होतं. तर पाकिस्तानच्या बाजूची उंची फार कमी आहे. अशा परिस्थितीतही भारतीय सैनिकांनी पाकिस्तानी सैन्यावर विजय मिळवला. त्यामुळे जगभरातील यशस्वी लढायांमध्ये 'ऑपरेशन मेघदूत'चाही समावेश होतो. हे एक वेगळंच युद्ध होतं, ज्यात भारतीय सैन्याने उणे  60 पासून उणे 70 अंश सेल्सिअस तापमानात सर्वात उंच युद्धभूमीवर जाऊन विजय मिळवला होता. तर पाकिस्तानसाठी हा लाजिरवाणा पराभव होता.

1997: टायगर वुड्सने वयाच्या 21 व्या वर्षी यूएस मास्टर्स चॅम्पियनशिप जिंकली. यासह, सर्वात कमी वयात ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला खेळाडू ठरला.

2000 : अभिनेत्री लारा दत्ताने विश्वसुंदरीचा किताब पटकावला

आजचा दिवस भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा असून याच दिवशी म्हणजे 13 एप्रिल 2000 रोजी लारा दत्ता (Lara Datta) हिने मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकला. त्या आधी तिने फेमिना मिस इंडियाची स्पर्धाही जिंकली होती. लारा दत्ताने नंतर अंदाज या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. 

23:10 PM (IST)  •  13 Apr 2023

Karnataka Election: महाराष्ट्र एकीकरण समितीकडून बेळगाव मतदार संघातून ॲड.अमर येळुरकर यांची उमेदवारी जाहीर

Karnataka Election:  महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव मतदार संघातून ॲड.अमर येळुरकर यांची उमेदवारी घोषित केली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव उत्तर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्यांच्या कडून अर्ज मागवले होते.इच्छुक उमेदवारांचे अर्ज आल्या नंतर निवड समितीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन आणि जनमानसाचा कौल ध्यानात घेऊन उमेदवारी जाहीर केली.

22:10 PM (IST)  •  13 Apr 2023

Solapur News: सोलापूर: मंगळवेढा तालुक्यातील सिद्धापूर भीमा नदी पात्रात बुडून नेपाळ येथील चौघांचा मृत्यू

Solapur News:  मंगळवेढा तालुक्यातील सिद्धापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे असणाऱ्या भीमा नदीच्या पात्रामध्ये नेपाळ देशातील चार जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 

19:45 PM (IST)  •  13 Apr 2023

Mumbai News:  दर्शन सोलंकी आत्महत्या प्रकरण, आरोपी अरमान खत्रीला 15 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Mumbai News:  दर्शन सोलंकी आत्महत्या प्रकरण, आरोपी अरमान खत्रीला 15 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

दर्शन सोलंकी आत्महत्या प्रकरणी आरोपी अरमान खत्रीला १५ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे

मुंबई पोलिसांनी आरोपी अरमान खत्रीविरोधात आणखी दोन कलमे जोडली आहेत

भादंवि 506(2) IPC आणि 3(2)(va) अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, 198 ही दोन नवीन कलमे जोडली 

18:37 PM (IST)  •  13 Apr 2023

Sharad Pawar : शरद पवार आणि काँग्रेसचे राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गेंची भेट

शरद पवार थोड्यावेळात दिल्लीत दाखल होत आहेत, आज त्यांची राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत भेट होणार आहे. अदानी प्रकरणावरून दिलेल्या वक्तव्यानंतर त्यांची ही पहिलीट भेट असेल. उद्या कर्नाटकसह आगामी विधानसभा निवडणुकांबाबत राष्ट्रवादीची रणनीती ठरवण्याबाबतही एक बैठक होण्याची शक्यता आहे. रात्री साडेआठ वाजता खरगेंच्या निवासस्थानी ही भेट होणार आहे. अदानी प्रकरणातल्या वक्तव्यावरून पवारांच्या भूमिकेची चर्चा असताना पवार दिल्लीत काँग्रेस अध्यक्षांच्या भेटीला जाणार आहेत. 

17:55 PM (IST)  •  13 Apr 2023

Ratnagiri News: रत्नागिरी: चिपळूणमधील अलोरे भागांत गारांचा पाऊस, आंबा काजू पिकाला फटका

Ratnagiri News:  रत्नागिरीतील चिपळूण तालुक्यातील अलोरे भागांत दुपारी गारांचा पाऊस पडल्याने गावातील रहिवाशांची धावपळ उडाली. तासभर पडलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा आला. मात्र, काही ठिकाणी आंबा काजू पिकाला फटका बसला आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Police on Worli Hit and Run Case : वरळीत अपघात कसा घडला? पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओRani Lanke Protest | राणी लंकेंनी महिलांनी भरलेला ट्रॅक्टर घेऊन गाठले आंदोलनस्थळ! चक्काजामचा इशाराWorli Hit and Run Car CCTV | वरळी हिट अँड रन प्रकरणी सीसीटीव्ही समोर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
Embed widget