एक्स्प्लोर

Maharashtra Flood | आलमट्टी धरणातून नेमका किती विसर्ग सुरु?

मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतरही आलमट्टी धरणातून तेवढा विसर्ग झाला नाही. मात्र जोपर्यंत विसर्ग वाढवणार नाही तोपर्यंत सांगलीचा पूर ओसरणार नाही, हे देखील खरं आहे.

मुंबई : राज्यात विशेषत: कोल्हापूर आणि सांगलीमध्ये आलमट्टी धरणाच्या फुगवट्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली असं म्हटलं जात आहे. यानंतर आलमट्टी धरणातून पाणी सोडण्यासाठी कर्नाटक सरकारने मंजुरी दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. धरणातून पाच लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग होईल, असं म्हटलं जात होतं. परंतु कर्नाटक सरकारने ही मागणी धुडकावल्याचं कळतं. कारण धरणातून तेवढा विसर्ग झालाच नसल्याची माहिती धरणाच्या अधिकृत वेबसाईटवर दिसत आहे. तर त्याउलट आलमट्टीमधून साडेचार लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग झाल्याचा दावा मुख्यमंत्री कार्यालयाने ट्वीटद्वारे केला आहे. त्यामुळे आलमट्टी धरणातून नेमका किती पाण्याचा विसर्ग झाला हेच स्पष्ट होत नाही. Maharashtra Flood | आलमट्टी धरणातून नेमका किती विसर्ग सुरु? कृष्णा भाग्य जल निगम लिमिटेडच्या वेबसाईटवरील आकडेवारीनुसार, "आज सकाळी 10 वाजता आलमट्टी धरणात 3 लाख 49 हजार 526 क्युसेक पाण्याची आवक सुरु होती आणि 3 लाख 64 हजार 52 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु होता. म्हणजेच जेवढं पाणी धरणात येतंय, जवळपास तेवढ्याच पाण्याचा विसर्ग होत आहे." त्यामुळे सांगलीमधील परिस्थिती जै थेच आहे. सांगलीतील पूर ओसरण्यासाठी आणखी जास्त पाण्याचा विसर्ग होण्याची गरज आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी 5 लाख क्युसेक पाणी विसर्ग करण्याची विनंती कर्नाटक सरकारला केली होती. तर दुसरकडे मुख्यमंत्री कार्यालयाने आलमट्टी धरणातून साडेचार लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग झाल्याचा दावा केला आहे. सीएमओच्या ट्वीटनुसार, आलमट्टी धरणातून सकाळी 10 वाजता 4 लाख 30 हजार 352 क्युसेक पाण्याचा विसर्ग झाला आहे (धरणात येणाऱ्या पाण्यापेक्षा 50 हजार क्युसेक जास्त). आता हा विसर्ग वाढून 4 लाख 50 हजार क्युसेक झाला आहे. वेबसाईट आणि सीएमओचं ट्वीटमध्ये आलमट्टी धरणातून सकाळी दहा वाजता सोडलेल्या पाण्याची आकडेवारी वेगवेगळी आहे. त्यामुळे आज सकाळी आलमट्टी धरणातून नेमका किती पाण्याचा विसर्ग झाला, हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतरही तेवढा विसर्ग झाला नाही. मात्र जोपर्यंत विसर्ग वाढवणार नाही तोपर्यंत सांगलीचा पूर ओसरणार नाही, हे देखील खरं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

NEET Exam : मोठी बातमी! 'नीट' पेपरफुटी रोखण्यासाठी आता थेट लष्कर मैदानात, वायूदलाच्या विमानांनी पोहोचवणार पेपर
मोठी बातमी! 'नीट' पेपरफुटी रोखण्यासाठी आता थेट लष्कर मैदानात, वायूदलाच्या विमानांनी पोहोचवणार पेपर
Sushant Shelar on Dipali sayyad : रुपाली चाकणकरांच्या भूमिकेवरून दीपाली सय्यद यांना धमक्या! सुशांत शेलार म्हणाले,
रुपाली चाकणकरांच्या भूमिकेवरून दीपाली सय्यद यांना धमक्या! सुशांत शेलार म्हणाले, "विरोधकांनी 20 पैसे पर कमेंट..."
Eknath Shinde: फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत तळ ठोकून, अमित शाहांच्या भेटीमागचं नेमकं कारण काय? एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं; म्हणाले...
फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत तळ ठोकून, अमित शाहांच्या भेटीमागचं नेमकं कारण काय? एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं; म्हणाले...
Reel Star Rohini Paradhye Last Reel: मंगळवेढ्याच्या रिलस्टारनं आयुष्य संपवलं, रोहिणी पाराध्येच्या शेवटच्या इन्स्टा रिलमध्ये नेमकं काय?
मंगळवेढ्याच्या रिलस्टारनं आयुष्य संपवलं, रोहिणी पाराध्येच्या शेवटच्या इन्स्टा रिलमध्ये नेमकं काय?

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Jalna : काही मंत्री काम करतात पण 'चालक'च काम करत नाही - मनोज जरांगे पाटील
Mumbai Sanjay Raut PC : रेडे कापून आलेले सरकार कुर्बाणीला विरोध करतंय, मांसाहार करणारच! - संजय राऊत
BMC Sudhar Samiti Special Report : मध्यरात्रीच्या घडामोडी, शिंदेंवर कुरघोडी? | ABP Majha
Vidhanparishad Election Special Report : अंतिम जागावाटपावर तिन्ही पक्षाचं समाधान कधी? | ABP Majha
NCP Meeting Special Report : आव्हानांचा चक्रव्यूह सुनेत्रा पवार कसा भेदणार? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bashir Badr: उर्दू शायरींचे शहंशाह डॉ. बशीर बद्र यांचे निधन; उर्दू साहित्याचा आत्मा हरपला, 14 वर्ष स्मृतिभ्रंशात काढत नश्वर जगाचा निरोप, शायरीतून वेदना, प्रेम अन् जीवनातील कटू सत्य मांडत राहिले
उर्दू शायरींचे शहंशाह डॉ. बशीर बद्र यांचे निधन; उर्दू साहित्याचा आत्मा हरपला, 14 वर्ष स्मृतिभ्रंशात काढत नश्वर जगाचा निरोप, शायरीतून वेदना, प्रेम अन् जीवनातील कटू सत्य मांडत राहिले
Chhatrapati Sambhajinagar : अवघ्या 500 रुपयांसाठी तरुणाचा गेम; 'टपका रे टपका' इन्स्टा रीलमुळे आरोपी गजाआड
अवघ्या 500 रुपयांसाठी तरुणाचा गेम; 'टपका रे टपका' इन्स्टा रीलमुळे आरोपी गजाआड
स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर
स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर
NEET Exam : मोठी बातमी! 'नीट' पेपरफुटी रोखण्यासाठी आता थेट लष्कर मैदानात, वायूदलाच्या विमानांनी पोहोचवणार पेपर
मोठी बातमी! 'नीट' पेपरफुटी रोखण्यासाठी आता थेट लष्कर मैदानात, वायूदलाच्या विमानांनी पोहोचवणार पेपर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मे 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मे 2026 | गुरुवार
Pune Crime:
"गाडी हळू चालवा" म्हणणं पुण्यात दाम्पत्याला पडलं महागात; भररस्त्यात दुचाकी अडवून पती-पत्नीला मारहाण, 3 वर्षाचा चिमुकला देखील जखमी
Vaibhav Sooryavanshi: एलिमिनेटरमध्ये हैदराबाद विरुद्ध वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशीची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांची पोस्ट शेअर करत सूचक इशारा 
वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशीची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांची पोस्ट शेअर करत सूचक इशारा 
खेडमध्ये शिकारीसाठी वापरल्या जाणाऱ्या गावठी बॉम्बचा स्फोट, 13 वर्षीय मुलगा गंभीर जखमी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
खेडमध्ये शिकारीसाठी वापरल्या जाणाऱ्या गावठी बॉम्बचा स्फोट, 13 वर्षीय मुलगा गंभीर जखमी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Embed widget