एक्स्प्लोर

Maharashtra Flood | आलमट्टी धरणातून नेमका किती विसर्ग सुरु?

मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतरही आलमट्टी धरणातून तेवढा विसर्ग झाला नाही. मात्र जोपर्यंत विसर्ग वाढवणार नाही तोपर्यंत सांगलीचा पूर ओसरणार नाही, हे देखील खरं आहे.

मुंबई : राज्यात विशेषत: कोल्हापूर आणि सांगलीमध्ये आलमट्टी धरणाच्या फुगवट्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली असं म्हटलं जात आहे. यानंतर आलमट्टी धरणातून पाणी सोडण्यासाठी कर्नाटक सरकारने मंजुरी दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. धरणातून पाच लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग होईल, असं म्हटलं जात होतं. परंतु कर्नाटक सरकारने ही मागणी धुडकावल्याचं कळतं. कारण धरणातून तेवढा विसर्ग झालाच नसल्याची माहिती धरणाच्या अधिकृत वेबसाईटवर दिसत आहे. तर त्याउलट आलमट्टीमधून साडेचार लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग झाल्याचा दावा मुख्यमंत्री कार्यालयाने ट्वीटद्वारे केला आहे. त्यामुळे आलमट्टी धरणातून नेमका किती पाण्याचा विसर्ग झाला हेच स्पष्ट होत नाही. Maharashtra Flood | आलमट्टी धरणातून नेमका किती विसर्ग सुरु? कृष्णा भाग्य जल निगम लिमिटेडच्या वेबसाईटवरील आकडेवारीनुसार, "आज सकाळी 10 वाजता आलमट्टी धरणात 3 लाख 49 हजार 526 क्युसेक पाण्याची आवक सुरु होती आणि 3 लाख 64 हजार 52 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु होता. म्हणजेच जेवढं पाणी धरणात येतंय, जवळपास तेवढ्याच पाण्याचा विसर्ग होत आहे." त्यामुळे सांगलीमधील परिस्थिती जै थेच आहे. सांगलीतील पूर ओसरण्यासाठी आणखी जास्त पाण्याचा विसर्ग होण्याची गरज आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी 5 लाख क्युसेक पाणी विसर्ग करण्याची विनंती कर्नाटक सरकारला केली होती. तर दुसरकडे मुख्यमंत्री कार्यालयाने आलमट्टी धरणातून साडेचार लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग झाल्याचा दावा केला आहे. सीएमओच्या ट्वीटनुसार, आलमट्टी धरणातून सकाळी 10 वाजता 4 लाख 30 हजार 352 क्युसेक पाण्याचा विसर्ग झाला आहे (धरणात येणाऱ्या पाण्यापेक्षा 50 हजार क्युसेक जास्त). आता हा विसर्ग वाढून 4 लाख 50 हजार क्युसेक झाला आहे. वेबसाईट आणि सीएमओचं ट्वीटमध्ये आलमट्टी धरणातून सकाळी दहा वाजता सोडलेल्या पाण्याची आकडेवारी वेगवेगळी आहे. त्यामुळे आज सकाळी आलमट्टी धरणातून नेमका किती पाण्याचा विसर्ग झाला, हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतरही तेवढा विसर्ग झाला नाही. मात्र जोपर्यंत विसर्ग वाढवणार नाही तोपर्यंत सांगलीचा पूर ओसरणार नाही, हे देखील खरं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 

व्हिडीओ

Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
Embed widget